शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

भर पावसात परीक्षा घेण्याचा IGNOU चा प्रताप, विद्यार्थ्यांचा मनस्ताप

By admin | Updated: June 19, 2015 16:22 IST

मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाण्यातील जनजीवन ठप्प पडले असतानाच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने भर पावसातही परीक्षा घेण्याचा घाट घातला.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १९ - मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाण्यातील जनजीवन ठप्प पडले असतानाच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने भर पावसातही परीक्षा घेण्याचा घाट घातला. विद्यापीठाच्या दिल्ली व मुंबईतील अधिका-यांमधील समन्वयाअभावी ऐन पावसातही या परीक्षा पार पडल्याने विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. तर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेलाच मुकावे लागले. 
मुंबईत गुरुवारी रात्रीपासून पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. शुक्रवारी सकाळपासून तिन्ही मार्गांवरील लोकल सेवाही ठप्प असून रस्त्यांवरही पाणी साचल्याने रस्त्यांवरील वाहतुकही मंदावली आहे. दुपारी असलेली समुद्रातील भरती व मुसळधार पाऊस या पार्श्वभूमीवर मुंबई व ठाण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आवाहन  प्रशासनाने केले होते. तर मुंबई विद्यापीठानेही आजच्या सर्व लेखी व तोंडी परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. मात्र इंदिरा गांधी विद्यापीठाला मुंबईतील परिस्थितीचा विसरच प़ड़ला. 
शुक्रवारी सकाळी मुक्त विद्यापीठाच्या सोमेय्या महाविद्यालयातील केंद्रावर नियोजित वेळेतच परीक्षा पार पडल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. काही जण परीक्षा संपण्याच्या काही मिनीटांपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचले. तर अनेकांना परीक्षेलाच मुकावे लागले. याविरोधात एका विद्यार्थ्यांनी स्थानिक अधिका-यांकडे लेखी तक्रारही दिली आहे. मुंबईतील जनजीवन ठप्प पडले असताना विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला पाहिजे हवा होता असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दिल्लीतील अधिका-यांकडून काहीची आदेश न आल्याने आम्ही नियोजीत वेळेतच परीक्षा घेतल्या असे विद्यापीठाच्या सोमेय्या केंद्रातील अधिका-यांनी सांगितले.