शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

घोलवड, बोर्डी रोड रेल्वे स्थानके दुर्लक्षित

By admin | Updated: January 20, 2017 03:25 IST

पश्चिम रेल्वेवरील विरार नंतर आठ नवीन स्थानकांची भर पडणार असल्याने विरार ते डहाणू रोड दरम्यानच्या प्रवाशांनी त्याचे स्वागत केले

अनिरुद्ध पाटील,

बोर्डी- पश्चिम रेल्वेवरील विरार नंतर आठ नवीन स्थानकांची भर पडणार असल्याने विरार ते डहाणू रोड दरम्यानच्या प्रवाशांनी त्याचे स्वागत केले आहे. मात्र, डहाणू रोडनंतरच्या घोलवड तसेच बोर्डी रोड रेल्वे स्थानकांची दुरावस्था सुधारण्यासाठी प्रयत्न आवश्यक असताना रेल्वे मंत्रालयाने दुजाभाव केल्याची टीका महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नागरिकांनी केली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविणाच्या दृष्टीने विरार ते डहाणू रोड दरम्यान चौपदरीकरण हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे या पट्यात लोकलच्या जादा फेऱ्या वाढण्यासह आठ नवीन स्थानकांची भर पडणार असल्याने एकूण सतरा स्थानके होतील. मात्र, डहाणू रोड नंतरची स्थिती पाहता हे चित्र नकारात्मक असून येथील प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. येथील नागरिकांनी अनेकदा घोलवड आणि बोर्डी रोड या स्थानकांमध्ये पायाभूत सुविधेसह धीम्या गाड्यांची संख्या वाढविणे तसेच जलद गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली आहे. घोलवड रेल्वे स्थानकात केवळ एका जलद गाडीला थांबा असून शटल तसेच प्यासेंजर गाड्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे. तर घोलवड पल्याडच्या बोर्डी रोड रेल्वे स्थानकाची निर्मिती होऊन बावीस वर्षाचा दीर्घ कालावधी उलटूनही स्थिती अत्यंत विदारक आहे. दिवसाकाठी केवळ चार गाड्या थांबतात शिवाय प्रवाशांना गाडीत चढण्या-उतरण्या करिता प्लॅटफॉर्म, शेड, स्वच्छता गृह, कायम स्वरूपी तिकीट खिडकीचा अभाव आहे. अन्य पर्याय नसल्याने येथील नागरिक नाईलाजस्तव जीव मुठीत घेईन धोक्याचा मार्ग चोखाळत आहेत. दरम्यान, मागील दहा वर्षात या भागात मोठ्या संख्याने शिक्षण, पर्यटन, कृषी, मासेमारी आणि औद्योगिक विकास झाला आहे. तथापि प्रवाशी संख्याही झपाट्याने वाढली आहे.>डहाणू रोड ते वापी दरम्यान गाड्यांची संख्या वाढविणे आणि स्थानकांची स्थिती सुधारणे आवश्यक आहे. उंबरगाव, भिलाड, वापी हा औद्योगिक पट्टा विकसीत झाला आहे. जिल्हयाप्रमाणेच मुंबईपासून नागरिक रोजचा प्रवास करतात. त्या मुळे रेल्वे मंत्रालयकडे वर्षभरपासून पाठपुरावा करण्यात आला असून सकारात्म निर्णय अपेक्षित आहे. - मकरंद चन्ने अध्यक्ष, पालघर जिल्हा कॉंग्रेस, सोशल मीडिया सेल स्थानिकांसह आदिवासींच्या विकासाचे धोरण राबवायचे असल्यास सीमा भागातील स्थानकांची स्थिती सुधारणे आवश्यक आहे. - विनीत राऊत, झाई ग्रामपंचायत