शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

घोलवड, बोर्डी रोड रेल्वे स्थानके दुर्लक्षित

By admin | Updated: January 20, 2017 03:25 IST

पश्चिम रेल्वेवरील विरार नंतर आठ नवीन स्थानकांची भर पडणार असल्याने विरार ते डहाणू रोड दरम्यानच्या प्रवाशांनी त्याचे स्वागत केले

अनिरुद्ध पाटील,

बोर्डी- पश्चिम रेल्वेवरील विरार नंतर आठ नवीन स्थानकांची भर पडणार असल्याने विरार ते डहाणू रोड दरम्यानच्या प्रवाशांनी त्याचे स्वागत केले आहे. मात्र, डहाणू रोडनंतरच्या घोलवड तसेच बोर्डी रोड रेल्वे स्थानकांची दुरावस्था सुधारण्यासाठी प्रयत्न आवश्यक असताना रेल्वे मंत्रालयाने दुजाभाव केल्याची टीका महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नागरिकांनी केली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविणाच्या दृष्टीने विरार ते डहाणू रोड दरम्यान चौपदरीकरण हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे या पट्यात लोकलच्या जादा फेऱ्या वाढण्यासह आठ नवीन स्थानकांची भर पडणार असल्याने एकूण सतरा स्थानके होतील. मात्र, डहाणू रोड नंतरची स्थिती पाहता हे चित्र नकारात्मक असून येथील प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. येथील नागरिकांनी अनेकदा घोलवड आणि बोर्डी रोड या स्थानकांमध्ये पायाभूत सुविधेसह धीम्या गाड्यांची संख्या वाढविणे तसेच जलद गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली आहे. घोलवड रेल्वे स्थानकात केवळ एका जलद गाडीला थांबा असून शटल तसेच प्यासेंजर गाड्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे. तर घोलवड पल्याडच्या बोर्डी रोड रेल्वे स्थानकाची निर्मिती होऊन बावीस वर्षाचा दीर्घ कालावधी उलटूनही स्थिती अत्यंत विदारक आहे. दिवसाकाठी केवळ चार गाड्या थांबतात शिवाय प्रवाशांना गाडीत चढण्या-उतरण्या करिता प्लॅटफॉर्म, शेड, स्वच्छता गृह, कायम स्वरूपी तिकीट खिडकीचा अभाव आहे. अन्य पर्याय नसल्याने येथील नागरिक नाईलाजस्तव जीव मुठीत घेईन धोक्याचा मार्ग चोखाळत आहेत. दरम्यान, मागील दहा वर्षात या भागात मोठ्या संख्याने शिक्षण, पर्यटन, कृषी, मासेमारी आणि औद्योगिक विकास झाला आहे. तथापि प्रवाशी संख्याही झपाट्याने वाढली आहे.>डहाणू रोड ते वापी दरम्यान गाड्यांची संख्या वाढविणे आणि स्थानकांची स्थिती सुधारणे आवश्यक आहे. उंबरगाव, भिलाड, वापी हा औद्योगिक पट्टा विकसीत झाला आहे. जिल्हयाप्रमाणेच मुंबईपासून नागरिक रोजचा प्रवास करतात. त्या मुळे रेल्वे मंत्रालयकडे वर्षभरपासून पाठपुरावा करण्यात आला असून सकारात्म निर्णय अपेक्षित आहे. - मकरंद चन्ने अध्यक्ष, पालघर जिल्हा कॉंग्रेस, सोशल मीडिया सेल स्थानिकांसह आदिवासींच्या विकासाचे धोरण राबवायचे असल्यास सीमा भागातील स्थानकांची स्थिती सुधारणे आवश्यक आहे. - विनीत राऊत, झाई ग्रामपंचायत