शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

श्याम मानवांच्या भुताटकीकडे अंधश्रद्धा समजून दुर्लक्ष करा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 3, 2015 10:55 IST

श्याम मानव विरुद्ध सनातन संस्था असा वाद सध्या पेटलेला असताना यामध्ये शिवसेना उतरली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून श्याम मानव यांच्यावर तुफान टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३ - श्याम मानव विरुद्ध सनातन संस्था असे वाक्-युद्ध सध्या पेटलेले असताना यामध्ये शिवसेना उतरली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून श्याम मानव यांच्यावर तुफान टीका केली आहे. श्याम मानवांनी सनातनसारख्या संस्थांमुळे भारताचा अफगाणिस्तान होईल अशी भीती व्यक्त केली होती. त्याचा संदर्भ देत महाराष्ट्रातील अनेक बिळांत छुपे पाकिस्तानी वळवळत आहेत. या सगळ्यांमुळे महाराष्ट्राचा अफगाणिस्तान आधीच झालाय व अशा हिरव्या दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी श्याम मानव वगैरे भुताखेतांकडून कधीच झाली नाही, अशा शब्दांमध्ये आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
 
सामनाच्या अग्रलेखातील मुद्दे:
 
हिंदू धर्माचा प्रचार, प्रसार करणार्‍या संस्था व व्यक्तींना खतम करायचे असा अफझलखानी विडा उचलणार्‍यांची मोठी यादी आहे. त्या यादीत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या श्याम मानवांचे नाव सध्या आघाडीवर आहे. धर्म व अध्यात्म क्षेत्रातील आपले संत-महात्मे असतील (वाटल्यास त्यांना ‘बुवा’ म्हणा) नाही तर आता सनातनच्या निमित्ताने जे चालले आहे तो सर्व प्रकार म्हणजे हिंदुत्वाच्या प्रचारकांचा कोंडमारा करणारा आहे. सनातन संस्थेवर वेळीच बंदी न घातल्यास महाराष्ट्राचा अफगाणिस्तान होईल, अशी भीती या श्याम मानव नामक भुतास वाटत आहे. अशा भुतांची पैदास सध्या वाढू लागली आहे. हिंदुत्वविरोधी भुतांना हवा तसा नंगानाच करण्याची मुभा आपल्या देशातील तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याने दिली आहे व त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करून ही भुते प्रसिद्धी मिळवत असतात. तोच त्यांच्या पोटापाण्याचा उद्योग असल्याने त्यांच्या रोजगाराची साधने बुडू नयेत असे दयाळू हिंदुत्ववाद्यांना वाटते. काही बुवा, महाराज असतील किंवा ‘सनातन’सारख्या संघटना असतील. आम्ही काही त्यांचे वकीलपत्र घेतलेले नाही, पण ज्याप्रकारे कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांना साधा जामीनही मिळू दिला जात नाही हासुद्धा तालिबानी प्रकार नाही काय? त्यांच्यावर जे काही आरोप ठेवले आहेत त्यांचा तपास, चौकशा, खटले सुरूच राहतील, पण जामीन नाकारणे ही न्याय्य हक्कांची पायमल्ली आहे.
 
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुस्लिम महिलांनी निवडणुकीच्या, किंबहुना राजकारणाच्या फंदातच पडू नये असा एक फतवा काढण्यात आला आहे. ‘मज्लिसे-शुरा-उलेमा-ए-कोल्हापूर’ या संस्थेच्या मौलवींनी हा फतवा जारी केला आहे. हा देखील ‘अफगाणिस्तान’ होत असल्याचा पुरावा आहे. हिंदुस्थानात काही ठिकाणी दहशतवादी ‘इसिस’चे झेंडे फडकवले जात आहेत. आझाद मैदानावरील अमर जवान ज्योतीवर लाथा मारणारी अवलाद महाराष्ट्राचे अफगाणिस्तान करण्याचे स्वप्न पाहात आहे व त्यासाठी कामाला लागली आहे. मात्र या भयंकर लोकांविरोधात ‘ब्र’ काढण्याची हिंमत या हिंदुत्वविरोधी भुताटकीत अजिबात नाही. ओवेसीचे ‘एमआयएम’ ज्याप्रकारे देशात जहर पसरवत आहे तो प्रकार देशाला अफगाणिस्तानच्या दिशेने नेणाराच आहे. तेव्हा ‘एमआयएम’वर बंदी घाला अशी मागणी सनातनबरोबर जोडली असती तर या भुताटकीस सध्याच्या पितृपंधरवड्यात खर्‍या नि:पक्षपाताचे पुण्य लाभले असते, पण हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारकांवरच तुटून पडायचे व आपली भुताटकी जिवंत ठेवायची हीच या लोकांची उलटी खोपडी आहे. त्यामुळे या भुताटकीस कधीच मोक्ष मिळणार नाही! ही अशी भुते नाचतच राहतील. हिंदूंनी त्याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करावे.