शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
3
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
4
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
5
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
6
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
7
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
8
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
9
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
10
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
11
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
12
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
13
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
14
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
15
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
16
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
17
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
18
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
19
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
20
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
Daily Top 2Weekly Top 5

३५० कोटींच्या वसुलीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: September 10, 2015 03:05 IST

भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) व लोकलेखा समिती यांनी विक्रीकर वसुलीत हयगय झाल्याने ३१ प्रकरणांत राज्य सरकारचा सुमारे ३५० कोटी रुपयांचा महसूल अप्राप्त असल्याबाबत

- संदीप प्रधान,  मुंबईभारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) व लोकलेखा समिती यांनी विक्रीकर वसुलीत हयगय झाल्याने ३१ प्रकरणांत राज्य सरकारचा सुमारे ३५० कोटी रुपयांचा महसूल अप्राप्त असल्याबाबत ठपका ठेवून पाच वर्षे उलटली तरीही राज्याच्या विक्रीकर विभागाने ही रक्कम वसूल करण्याकरिता कुठलीही हालचाल केलेली नाही. सरकारचा कर बुडवणारे काही व्यापारी, कंपन्यांचे मालक हे आपली मालमत्ता विकून विदेशात निघून गेल्याचे काही प्रकरणांत उघड झाले आहे.राज्य सरकारच्या वित्त विभागातील सूत्रांनुसार, आतापर्यंत वसूल न झालेल्या विक्रीकराच्या रकमेचा कॅग व लोकलेखा समितीने केलेला दावा विचारात घेतला तर ही रक्कम किमान ५० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र काही प्रकरणे आता इतकी जुनी झाली आहेत, की त्यामधील वसुलीवर विभागाने पाणी सोडल्यात जमा आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) लागू झाल्यावर राज्य सरकार अशा सर्वच प्रकरणांमधील वसुलीवर तुळशीपत्र ठेवणार किंवा कसे, ही बाब महत्त्वाची आहे.राज्यात गेली १५ वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना लोकलेखा समितीचे अध्यक्षपद विरोधी पक्ष या नात्याने भाजपाकडे होते. विक्रीकर वसुलीत हयगय झालेली जी प्रकरणे कॅगने निदर्शनास आणली त्यामधील मोठ्या रकमेच्या वसुलीत लोकलेखा समितीने संबंधित अधिकारी, सचिव यांना बोलावून चौकशी केली. आता राज्यातील भाजपा सरकारकडून या रकमेच्या वसुलीकरिता प्रयत्न होताना दिसत नाहीत. कॅगने २००९-१० मध्ये ३१ प्रकरणात ३५० कोटी रुपयांची वसुली झाली नसल्याचा ठपका ठेवल्यावर लोकलेखा समितीनेही या गंभीर बाबीसंबंधी तीव्र नाराजी प्रकट केली होती. आता लोकलेखा समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे असून, अशा प्रकरणांबाबत समितीकडून विचारणा केली जात आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत यापैकी एकाही प्रकरणात वसुली झालेली नाही, याकडे वित्त विभागातील सूत्रांनी लक्ष वेधले. मुंबईत मालमत्ता असूनही केले दुर्लक्ष बॅरन इंडिया लि., बॅरन इंटरनॅशनल लि., बॅरन इलेक्ट्रॉनिक्स या तीन कंपन्यांनी एकूण ११४ कोटी रुपयांचा विक्रीकर बुडवल्याकडे कॅगने लक्ष वेधले होते. २०१० मध्ये जेव्हा ही बाब निदर्शनास आणली गेली तेव्हा मुंबई या कंपनीच्या मालमत्ता होत्या. मात्र विक्रीकर विभागाने दिल्लीतील कॅनॉट प्लेसच्या जिल्हाधिकारी कार्यालयास व दिल्लीतील विक्रीकर विभागाकडे पत्रव्यवहार करून या कंपन्यांच्या दिल्लीत काही मालमत्ता आहेत किंवा कसे, अशी विचारणा केली. कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे, की मुंबईत असलेल्या मालमत्ता ताब्यात घेऊन थकबाकी वसुलीची प्रक्रिया करण्याचे सोडून विक्रीकर विभाग दिल्लीतील मालमत्ता धुंडाळत बसला. अशा हलगर्जीपणामुळे काही थकबाकीदार मालमत्ता विकून विदेशात पळून गेले किंवा काही थकबाकीदारांच्या मालमत्ता बँकांनी त्यांच्या वसुलीकरिता ताब्यात घेतल्या.