शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

हॉटेलच्या अतिक्रमणाकडेही दुर्लक्ष

By admin | Updated: June 9, 2016 03:00 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हॉटेलचालकांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हॉटेलचालकांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. व्यावसायिकांना देखभाल शाखा सुरक्षा रक्षकांनी अभय दिले आहे. खाद्यपदार्थ तयार करण्याची परवानगी नसलेल्या स्टॉलचालकांनीही अनधिकृत खानावळ सुरू केल्या असून, स्वच्छतेचे सर्व नियमही धाब्यावर बसविले आहेत. बाजार समितीमध्ये देखभाल शाखा, सुरक्षा रक्षक व प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण घोटाळा झाला आहे. व्यापाऱ्यांनी गाळ्यांवर पोटमाळे व वाढीव एक मजल्याचे बांधकाम केले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त हॉटेलचालकांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. धान्य मार्केटमध्ये बाजार समितीने दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागा हॉटेलचालकांनी व्यापली आहे. काहींनी एक मजल्याचे वाढीव बांधकाम केले आहे. आतापर्यंत बाजार समिती प्रशासनाने वारंवार त्यांना नोटीस दिल्या, परंतु प्रत्यक्षात अतिक्रमण कधीच काढलेले नाही. नोटीस देवून तडजोडी केल्या जात असल्याची चर्चा मार्केटमध्ये आहे. बिनधास्तपणे मोकळ्या जागेचा वापर करणाऱ्यांवर काहीच कारवाई होत नाही. सर्वाधिक अतिक्रमण फळ मार्केटमध्ये झाले आहे. येथे तयार खाद्यपदार्थ विक्रीसाठी एपीएमसीने परवानगी दिली आहे. परंतु प्रत्यक्षात सर्वांनी अनधिकृत खानावळ सुरू केली आहे. मार्केटमध्ये पश्चिम बंगाल व काही प्रमाणात बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्य करत आहेत. या कामगारांसाठी अनधिकृत खानावळ सुरू झाल्या आहेत. अनधिकृत कँटीनच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य असते. प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. त्याच ठिकाणी हे कामगार जेवण करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. फळ मार्केटमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात चार वर्षांपूर्वी प्रशासनाने जोरदार मोहीम सुरू केली होती. अनधिकृत शेड काढले. सिलिंडर जप्त केले होते. हॉटेल चालकांबरोबर प्रशासनाचे मतभेद झाले होते. यामुळेच त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू केली होती. प्रशासनाच्या मागण्या पूर्ण केल्यानंतरही कारवाई होत असल्याने हॉटेलचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी झालेल्या भांडणातून अधिकाऱ्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रारही एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये केली होती. परंतु नंतर काही दिवसांमध्ये हॉटेल चालकांचे अतिक्रमण जैसे थे झाले. तेव्हापासून पुन्हा कधीच कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व अतिक्रमणाला अभय देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. >फळ मार्केटमध्येसर्वाधिक अतिक्रमण धान्य मार्केटमध्ये बाजार समितीने दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागा हॉटेलचालकांनी व्यापली आहे. बाजार समिती प्रशासनाने वारंवार त्यांना नोटीस दिल्या, परंतु प्रत्यक्षात अतिक्रमण कधीच काढलेले नाही. सर्वाधिक अतिक्रमण फळ मार्केटमध्ये झाले आहे. येथे तयार खाद्यपदार्थ विक्रीसाठी परवानगी दिली आहे.