शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

तासगाव पाहिजे तर मिरजेवर पाणी सोडा!

By admin | Updated: July 8, 2014 00:38 IST

कोणी कोणत्या जागा लढवायच्या याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना शिवसेनेने तासगाव-कवठेमहांकाळ हवे असेल तर मिरजेवर पाणी सोडावे लागेल

अतुल कुलकर्णी - मुंबई
कोणी कोणत्या जागा लढवायच्या याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना शिवसेनेने तासगाव-कवठेमहांकाळ हवे असेल तर मिरजेवर पाणी सोडावे लागेल अशी अधिकृत भूमिका सोमवारी जाहीर केल्याने युतीत खळबळ उडाली आहे. हे करत असताना तासगाव-कवठेमहांकाळसह इस्लामपूर, शिराळा, खानापूर-आटपाटी, पलूस-कोरेगाव हे पाचही विधानसभा मतदारसंघ शिवसेनाच लढवेल, असेही शिवसेनेने जाहीर करून टाकले आहे.
या अचानक झालेल्या राजकीय खेळीमुळे गृहमंत्र्यांना पराभूत करण्याची भाषा करणारे व भाजपाच्या तिकिटावर सांगलीतून निवडून आलेल्या खा. संजयकाका पाटील यांच्या मनसुब्यांना जबर धक्का बसला आहे. शिवाय शिवसेनेने आर.आर. पाटील यांना आस्मान दाखवण्याची भाषा करताना त्यांचीच पाठराखण करत राजकीय संदेश दिल्याची चर्चाही रंगली आहे.
सांगलीतील तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विद्यमान गृहमंत्री आर.आर. पाटील यांना पाडण्याकरता भाजपाने अजित घोरपडे यांची उमेदवारी घोषित झाल्याच्या बातम्या विविध चित्रवाहिन्यांवरून सुरू झाल्या. त्याचा खुलासा करण्याच्या नावाखाली शिवसेनेचे नेते व पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क नेते दिवाकर रावते यांनी या मतदारसंघावर हक्क सांगत भाजपावर जोरदार राजकीय कुरघोडी केली आहे.
 गृहमंत्र्यांना हरविण्याचे काम शिवसेनाच करणार आहे, असे सांगत भाजपा आग्रही असेलच तर मिरज मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडा, असेही रावते यांनी म्हटले आहे. मिरजेतून भाजपाचे सुरेश खाडे गेल्या वेळी 54 हजार मतांनी निवडून आले होते. आर.आर. पाटील आणि अजित घोरपडे यांच्यात असलेल्या राजकीय ‘सख्या’चा फायदा घेत घोरपडेंना भाजपाची उमेदवारी दिल्याच्या बातम्या पसरल्यानेच हा खुलासा केल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे युतीतील बिघाडी पुढे आल्याचे स्पष्ट झाले आहे.