शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

...तर निवडणुकीत वेगळा विचार करू!

By admin | Updated: June 13, 2016 02:15 IST

गेल्या निवडणुकीत उपसभापतिपदाचा दिलेला शब्द भाजपाने पाळला नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे.

वडगाव मावळ : गेल्या निवडणुकीत उपसभापतिपदाचा दिलेला शब्द भाजपाने पाळला नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे. भाजपा आमचा असाच उपयोग करून घेणार असेल, तर आगामी पंचायत समिती निवडणुकीत वेगळा विचार करू, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.मार्च २०१२ मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा-शिवेसेनेची युती होती. भाजपाचे सहा, राष्ट्रवादीचे दोन, अपक्ष आणि शिवसेनेचा एक असे दहा सदस्य निवडून आले होते. भाजपाला बहुमत मिळाले. परंतु सभापतिपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव असल्यामुळे पहिले सभापतिपद देण्यावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद होता. ज्ञानेश्वर दळवी यांना पहिले सभापतिपद देण्याचे जाहीर झाल्यानंतर भाजपातील काही नाराज सदस्य आणि शिवसेना व अपक्ष सदस्य एकत्र येऊन सभापतिपदासाठी दावेदारी करू लागले. हे पाहून भाजपातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या वरसोली गणातून निवडून आलेल्या आशा देशमुख यांना घरी जाऊन तुम्हाला चार वर्षांनंतर उपसभापतिपद देऊ असे आश्वासन दिले. परंतु आता चार वर्षे उलटूनही भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे शिवसैनिक नाराज असून, भाजपा आमचा असाच उपयोग करून घेत असेल, तर आगामी पंचायत समिती निवडणुकीत वेगळा विचार करू, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी दिला आहे. या संदर्भात खांडभोर यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहारही केला होता. त्यालाही उत्तर मिळाले नाही. दरम्यान, शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे यांनीही पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबरोबर चर्चा केली होती. परंतु भाजपा नेत्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत मावळात राजकीय वर्तुळात वेगळे चित्र पाहण्यास मिळण्याची मोठी शक्यता आहे. (वार्ताहर)>२०१२ च्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपा-शिवसेना अशी कोणतीही युती नव्हती. आम्ही दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या. त्यामध्ये आम्हाला बहुमत मिळाले होते. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला शब्द देण्याचा प्रश्नच येत नाही. तरीदेखील त्यांनी बसून चर्चा करावी. चर्चा केल्यास हादेखील प्रश्न मार्गी लावू. आशा देशमुख भाजपामध्ये प्रवेश करणार होत्या. त्यांनी प्रवेश केला असता तर पक्षाने या आधीच त्यांचा विचार केला असता, असे भाजपाचे प्रभारी भास्कर म्हाळस्कर यांनी सांगितले.