शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

...तर निवडणुकीत वेगळा विचार करू!

By admin | Updated: June 13, 2016 02:15 IST

गेल्या निवडणुकीत उपसभापतिपदाचा दिलेला शब्द भाजपाने पाळला नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे.

वडगाव मावळ : गेल्या निवडणुकीत उपसभापतिपदाचा दिलेला शब्द भाजपाने पाळला नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे. भाजपा आमचा असाच उपयोग करून घेणार असेल, तर आगामी पंचायत समिती निवडणुकीत वेगळा विचार करू, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.मार्च २०१२ मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा-शिवेसेनेची युती होती. भाजपाचे सहा, राष्ट्रवादीचे दोन, अपक्ष आणि शिवसेनेचा एक असे दहा सदस्य निवडून आले होते. भाजपाला बहुमत मिळाले. परंतु सभापतिपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव असल्यामुळे पहिले सभापतिपद देण्यावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद होता. ज्ञानेश्वर दळवी यांना पहिले सभापतिपद देण्याचे जाहीर झाल्यानंतर भाजपातील काही नाराज सदस्य आणि शिवसेना व अपक्ष सदस्य एकत्र येऊन सभापतिपदासाठी दावेदारी करू लागले. हे पाहून भाजपातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या वरसोली गणातून निवडून आलेल्या आशा देशमुख यांना घरी जाऊन तुम्हाला चार वर्षांनंतर उपसभापतिपद देऊ असे आश्वासन दिले. परंतु आता चार वर्षे उलटूनही भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे शिवसैनिक नाराज असून, भाजपा आमचा असाच उपयोग करून घेत असेल, तर आगामी पंचायत समिती निवडणुकीत वेगळा विचार करू, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी दिला आहे. या संदर्भात खांडभोर यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहारही केला होता. त्यालाही उत्तर मिळाले नाही. दरम्यान, शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे यांनीही पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबरोबर चर्चा केली होती. परंतु भाजपा नेत्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत मावळात राजकीय वर्तुळात वेगळे चित्र पाहण्यास मिळण्याची मोठी शक्यता आहे. (वार्ताहर)>२०१२ च्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपा-शिवसेना अशी कोणतीही युती नव्हती. आम्ही दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या. त्यामध्ये आम्हाला बहुमत मिळाले होते. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला शब्द देण्याचा प्रश्नच येत नाही. तरीदेखील त्यांनी बसून चर्चा करावी. चर्चा केल्यास हादेखील प्रश्न मार्गी लावू. आशा देशमुख भाजपामध्ये प्रवेश करणार होत्या. त्यांनी प्रवेश केला असता तर पक्षाने या आधीच त्यांचा विचार केला असता, असे भाजपाचे प्रभारी भास्कर म्हाळस्कर यांनी सांगितले.