शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

...तर निवडणुकीत वेगळा विचार करू!

By admin | Updated: June 13, 2016 02:15 IST

गेल्या निवडणुकीत उपसभापतिपदाचा दिलेला शब्द भाजपाने पाळला नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे.

वडगाव मावळ : गेल्या निवडणुकीत उपसभापतिपदाचा दिलेला शब्द भाजपाने पाळला नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे. भाजपा आमचा असाच उपयोग करून घेणार असेल, तर आगामी पंचायत समिती निवडणुकीत वेगळा विचार करू, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.मार्च २०१२ मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा-शिवेसेनेची युती होती. भाजपाचे सहा, राष्ट्रवादीचे दोन, अपक्ष आणि शिवसेनेचा एक असे दहा सदस्य निवडून आले होते. भाजपाला बहुमत मिळाले. परंतु सभापतिपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव असल्यामुळे पहिले सभापतिपद देण्यावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद होता. ज्ञानेश्वर दळवी यांना पहिले सभापतिपद देण्याचे जाहीर झाल्यानंतर भाजपातील काही नाराज सदस्य आणि शिवसेना व अपक्ष सदस्य एकत्र येऊन सभापतिपदासाठी दावेदारी करू लागले. हे पाहून भाजपातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या वरसोली गणातून निवडून आलेल्या आशा देशमुख यांना घरी जाऊन तुम्हाला चार वर्षांनंतर उपसभापतिपद देऊ असे आश्वासन दिले. परंतु आता चार वर्षे उलटूनही भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे शिवसैनिक नाराज असून, भाजपा आमचा असाच उपयोग करून घेत असेल, तर आगामी पंचायत समिती निवडणुकीत वेगळा विचार करू, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी दिला आहे. या संदर्भात खांडभोर यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहारही केला होता. त्यालाही उत्तर मिळाले नाही. दरम्यान, शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे यांनीही पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबरोबर चर्चा केली होती. परंतु भाजपा नेत्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत मावळात राजकीय वर्तुळात वेगळे चित्र पाहण्यास मिळण्याची मोठी शक्यता आहे. (वार्ताहर)>२०१२ च्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपा-शिवसेना अशी कोणतीही युती नव्हती. आम्ही दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या. त्यामध्ये आम्हाला बहुमत मिळाले होते. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला शब्द देण्याचा प्रश्नच येत नाही. तरीदेखील त्यांनी बसून चर्चा करावी. चर्चा केल्यास हादेखील प्रश्न मार्गी लावू. आशा देशमुख भाजपामध्ये प्रवेश करणार होत्या. त्यांनी प्रवेश केला असता तर पक्षाने या आधीच त्यांचा विचार केला असता, असे भाजपाचे प्रभारी भास्कर म्हाळस्कर यांनी सांगितले.