शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

स्वाभिमान असेल तर सत्तेपासून दूर व्हा!

By admin | Updated: July 11, 2015 14:25 IST

पवारांचा शिवसेनेला सल्ला : सिंधुदुर्ग दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद

मालवण : बाळासाहेब असताना शिवसेनेत स्वाभिमान होता. आताच्या नेतृत्वाकडे तो आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र, जर स्वाभिमान असेल, तर त्यांनी सत्तेपासून दूर व्हायला हवे, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मालवण तारकर्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. ‘भाजप’चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई येथे केलेल्या वक्तव्याबाबत ते बोलत होते. शरद पवार यांनी शुक्रवारी एक दिवसाचा सिंधुदुर्ग दौरा केला. मालवण तारकर्ली येथे त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, सरचिटणीस अमित सामंत, युवकचे अध्यक्ष अबीद नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्षडॉ. विश्वास साठे, मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर उपस्थित होते. महाराष्ट्रात भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली नाही याची भाजप अध्यक्ष अमित शहा यांना खंत वाटत आहे. मात्र, एकहाती सत्तेचे वक्तव्य शिवसेनेला इशाराच आहे. भाजप शिवसेनेला बरोबर घेऊन सत्तेत बसले असले, तरी शिवसेनेचा खेळ केला जात आहे. शिवसेनेतील हरवलेला स्वाभिमान जागृत झाला, तर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागतील, असेही पवार म्हणाले. सरकारकडून जनहिताचे निर्णय नाहीतचराज्याच्या अनेक भागात यावर्षी जुलै महिन्यातील सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे कोकणसह सर्वच भागातील जनता पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत राज्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाला वेगळे धोरण आखावे लागेल. आपण पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांना याबाबत पत्राद्वारे सविस्तर कळविले आहे. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थितीची माहिती दिली आहे. मात्र, अद्याप शेतकरी हिताचा एकही निर्णय झालेला नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.खासदार, आमदार मच्छिमारांची भूमिका मांडतीलयेथील जनतेला भेडसावणाऱ्या पर्ससीन मासेमारी व जाचक ‘सीआरझेड’ कायदा याबाबत पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार प्रश्न मांडतील. तसेच संसदेत राष्ट्रवादीचे खासदार आणि आपण स्वत: आग्रही भूमिका घेऊ व जनता व शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यास शासनास भाग पाडू. येथील जनतेला न्याय देणे यालाच आमचे प्राधान्य राहील, असेही पवार म्हणाले.(वार्ताहर)एका वर्षातच घोटाळ््यांचा विक्रम केलाखोटी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आली. एका वर्षातच 'अच्छे दिन' काय असतात, ते सर्वांना कळले. सत्तेचा गैरवापर कसा होतो ते काही महिन्यांतच पाहायला मिळाले. देशात राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये सरकारची लक्तरे दररोज बाहेर पडत आहेत. एका वर्षात घोटाळ्यांचा विक्रम करण्याची कामगिरी शासनकर्त्यांनी केली.