शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमान असेल तर सत्तेपासून दूर व्हा!

By admin | Updated: July 11, 2015 14:25 IST

पवारांचा शिवसेनेला सल्ला : सिंधुदुर्ग दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद

मालवण : बाळासाहेब असताना शिवसेनेत स्वाभिमान होता. आताच्या नेतृत्वाकडे तो आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र, जर स्वाभिमान असेल, तर त्यांनी सत्तेपासून दूर व्हायला हवे, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मालवण तारकर्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. ‘भाजप’चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई येथे केलेल्या वक्तव्याबाबत ते बोलत होते. शरद पवार यांनी शुक्रवारी एक दिवसाचा सिंधुदुर्ग दौरा केला. मालवण तारकर्ली येथे त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, सरचिटणीस अमित सामंत, युवकचे अध्यक्ष अबीद नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्षडॉ. विश्वास साठे, मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर उपस्थित होते. महाराष्ट्रात भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली नाही याची भाजप अध्यक्ष अमित शहा यांना खंत वाटत आहे. मात्र, एकहाती सत्तेचे वक्तव्य शिवसेनेला इशाराच आहे. भाजप शिवसेनेला बरोबर घेऊन सत्तेत बसले असले, तरी शिवसेनेचा खेळ केला जात आहे. शिवसेनेतील हरवलेला स्वाभिमान जागृत झाला, तर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागतील, असेही पवार म्हणाले. सरकारकडून जनहिताचे निर्णय नाहीतचराज्याच्या अनेक भागात यावर्षी जुलै महिन्यातील सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे कोकणसह सर्वच भागातील जनता पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत राज्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाला वेगळे धोरण आखावे लागेल. आपण पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांना याबाबत पत्राद्वारे सविस्तर कळविले आहे. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थितीची माहिती दिली आहे. मात्र, अद्याप शेतकरी हिताचा एकही निर्णय झालेला नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.खासदार, आमदार मच्छिमारांची भूमिका मांडतीलयेथील जनतेला भेडसावणाऱ्या पर्ससीन मासेमारी व जाचक ‘सीआरझेड’ कायदा याबाबत पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार प्रश्न मांडतील. तसेच संसदेत राष्ट्रवादीचे खासदार आणि आपण स्वत: आग्रही भूमिका घेऊ व जनता व शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यास शासनास भाग पाडू. येथील जनतेला न्याय देणे यालाच आमचे प्राधान्य राहील, असेही पवार म्हणाले.(वार्ताहर)एका वर्षातच घोटाळ््यांचा विक्रम केलाखोटी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आली. एका वर्षातच 'अच्छे दिन' काय असतात, ते सर्वांना कळले. सत्तेचा गैरवापर कसा होतो ते काही महिन्यांतच पाहायला मिळाले. देशात राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये सरकारची लक्तरे दररोज बाहेर पडत आहेत. एका वर्षात घोटाळ्यांचा विक्रम करण्याची कामगिरी शासनकर्त्यांनी केली.