शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर दोन हात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 05:18 IST

विधानसभा निवडणुकीच्या काळात दिल्लीत शिवसेना संपविण्याची भाषा केली गेली. आमच्या अस्तित्वाशी लढायचे असेल तर थेट मैदानात उतरा, कपट-कारस्थाने कसली करता

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या काळात दिल्लीत शिवसेना संपविण्याची भाषा केली गेली. आमच्या अस्तित्वाशी लढायचे असेल तर थेट मैदानात उतरा, कपट-कारस्थाने कसली करता, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी भाजपाला थेट आव्हान देत मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला हुकूमशाहीकडे नेत असल्याचे टीकास्त्रही उद्धव यांनी सोडले.वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शिवसेनेचा राज्यव्यापी पदाधिकारी मेळावा झाला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली. देशात चीनप्रमाणे हुकूमशाही येतेय की काय असे वाटू लागले आहे. मात्र, आमचे स्वातंत्र्य गमावून विकास आम्हाला नको. तसा विकास तर ब्रिटिशांनीही केला होता. हा देश असली हुकूमशाही स्वीकारणार नाही, अशा शब्दांत उद्धव यांनी मोदी यांच्या धोरणांचा समाचार घेतला.उद्धव म्हणाले की, केवळ आश्वासने आणि घोषणा देऊन जनतेला भुलवले जात आहे. निवडणुकांच्या ‘जुमल्यां’वरच यांचे ‘इमले’ उभे राहिले आहेत. नोटाबंदीला जनतेचा पाठिंबा असल्याचे फक्त भासवले जात आहे. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीनंतर ज्या योजना जाहीर केल्या त्या जुन्याच आहेत, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी ही गत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. लोक जिवंत आहेत, हेच अच्छे दिन समजायचे का, असा तिरकस प्रश्नही उद्धव यांनी विचारला. जिल्हा बँकेत भ्रष्टाचार होईल म्हणून नोटाबंदीनंतर त्यांना टाळे लावले. मोठ्या बँकांनी पैसे बुडवले, शिक्षा मात्र जिल्हा बँकांना. ललित मोदी, विजय मल्ल्यासारखी मंडळी पळाली तेव्हा तुम्ही झोपा काढल्या का, असा बोचरा सवालही उद्धव यांनी केला. (प्रतिनिधी)सर्वोच्च न्यायालयाने जात, धर्म आणि भाषेच्या आधारावर मत मागता येणार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. त्याचा उल्लेख करत हिंदुत्व आमची ओळख आणि चेहरा आहे आणि आम्ही तो सोडणार नाही. तसेच लाचार होऊन युती करणार नाही आणि युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर असला प्रकारही मान्य नाही. शिवसैनिकांनी धनुष्यावरच लढायला हवे, असे उद्धव म्हणाले.नोटाबंदीला जनतेचा पाठिंबा असल्याचे फक्त भासवले जात आहे. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीनंतर ज्या योजना जाहीर केल्या त्या जुन्याच आहेत, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी ही गत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. लोक जिवंत आहेत, हेच अच्छे दिन समजायचे का, असा तिरकस प्रश्नही उद्धव यांनी विचारला. केंद्रीय अर्थसंकल्प रोखाराष्ट्रपतींनी अर्थसंकल्प फेब्रुवारीत मांडण्यापासून केंद्र सरकारला रोखावे. पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच फेब्रुवारीत अर्थसंकल्प सादर करण्याचा डाव आहे. अर्थसंकल्पातून आश्वासनांची भूल पाडण्यात मोदी यशस्वी होतील. त्यामुळे सेना खासदारांनी राष्ट्रपतींना अर्थसंकल्प निवडणुकांपूर्वी तो सादर होऊ न देण्याची मागणी करावी, असा आदेश उद्धव यांनी दिला.