शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

चुकीची कामे कराल तर निधी नाही

By admin | Updated: May 5, 2017 04:03 IST

कंत्राटदारधार्जिणी कामे करून निधीची लयलूट करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. चुकीची कामे करणाऱ्या नगरपालिकांना निधीच

मुंबई : नगरपालिकांमध्ये कंत्राटदारधार्जिणी कामे करून निधीची लयलूट करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. चुकीची कामे करणाऱ्या नगरपालिकांना निधीच दिला जाणार नाही, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. पहिल्या नगरविकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट नगरपरिषदा, सर्वोत्कृष्ट नगरपरिषदा, तसेच महापालिकांच्या विशेष पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, चांगली कामगिरी करणाऱ्या नगरपालिकांचा सत्कार केला जाईल. मात्र, चुकीचे काम करणाऱ्यांच्या निधीवर नक्कीच संक्रांत येईल. सर्व नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीतील मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे. या माध्यमातून शंभर टक्के मालमत्तांना करांच्या कक्षेत आणले जाईल. यामुळे शहरांना विकासासाठी अधिकचा निधी उपलब्ध होऊ शकेल. सध्या जवळपास ४० टक्के मालमत्ता या करकक्षेबाहेर आहेत. त्यांना करकक्षेत आणल्यानंतर कर कमीही करता येऊ शकेल. विविध शहरांचे १४६ प्रकल्प आठ वर्षांपासून प्रलंबित होते. हे प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत ४६ प्रकल्पांसाठी गेल्या वर्षी तीन हजार कोटी रुपये, या वर्षी ५० प्रकल्पांसाठी तीन हजार कोटी दिले आहेत. नगरपालिका प्रशासनासाठी एक उत्कृष्ट असे वेबपोर्टल तयार करण्यात येणार असून त्याद्वारे सर्व नगरपालिका प्रशासकीय कामकाज सुलभरीत्या करू शकतील, सेवा हमी कायद्यांतर्गतच्या विविध सेवा या वेबपोर्टलवर अर्ज करून प्राप्त करता येतील. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर यांनी नगरपालिका प्रशासनात चांगले काम केले आहे, असेही गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. या कार्यक्रमास गृह (शहरे) तसेच नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार राज पुरोहित, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नगर विकास-२ विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक वीरेंद्र सिंग उपस्थित होते. प्रास्ताविक मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी केले. आभार विरेंद्र सिंह यांनी मानले. (विशेष प्रतिनिधी) विभाग आणि पुरस्कारार्थी नगरपालिका अशाअ वर्ग नगरपालिका : नागपूर व अमरावती विभाग : वर्धा, जि. वर्धा; नाशिक व औरंगाबाद विभाग : उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद; कोकण व पुणे विभाग : अंबरनाथ, जि. ठाणे.ब वर्ग नगरपालिका : नागपूर विभाग : प्रथम क्रमांक - उमरेड, जि. नागपूर; द्वितीय क्रमांक - बल्लारपूर, जि. चंद्रपूर; अमरावती विभाग : प्रथम क्रमांक - वाशिम, जि. वाशिम; द्वितीय क्रमांक - उमरखेड, जि. यवतमाळ; औरंगाबाद विभाग : प्रथम क्रमांक - हिंगोली, जि. हिंगोली; द्वितीय क्रमांक - वैजापूर, जि. औरंगाबाद; नाशिक विभाग : प्रथम क्रमांक - शिरपूर वरवाडे, जि. धुळे; द्वितीय क्रमांक - संगमनेर, जि. अहमदनगर; कोकण विभाग : प्रथम क्रमांक - खोपोली, जि. रायगड; द्वितीय क्रमांक - रत्नागिरी, जि. रत्नागिरी आणि चिपळूण, जि. रत्नागिरी यांना विभागून; पुणे विभाग : प्रथम क्रमांक - पंढरपूर, जि. सोलापूर; द्वितीय क्रमांक : विटा, जि. सांगली.क वर्ग नगरपालिका : नागपूर विभाग : प्रथम क्रमांक - मौदा नगरपंचायत, जि. नागपूर; द्वितीय क्रमांक : खापा, जि. नागपूर; अमरावती विभाग : प्रथम क्रमांक - शेंदूरजनघाट, जि. अमरावती; द्वितीय क्रमांक : दारव्हा, जि. यवतमाळ आणि पांढरकवडा, जि. यवतमाळ यांना विभागून; औरंगाबाद विभाग : प्रथम क्रमांक - तुळजापूर, जि. उस्मानाबाद; द्वितीय क्रमांक : पाथरी, जि. परभणी; नाशिक विभाग : प्रथम क्रमांक - त्र्यंबक, जि. नाशिक; द्वितीय क्रमांक : देवळाली प्रवरा, जि. अहमदनगर; कोकण विभाग : प्रथम क्रमांक - वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग; द्वितीय क्रमांक : मालवण, जि. सिंधुदुर्ग; पुणे विभाग : प्रथम क्रमांक - पाचगणी, जि. सातारा; द्वितीय क्रमांक : आष्टा, जि. सांगली.यापैकी सर्वोत्कृष्ट नगरपालिका म्हणून पुढील नगरपालिकांची निवड करण्यात आली तसेच त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अ वर्ग : अंबरनाथ, जि. ठाणे ब वर्ग : उमरेड, जि. नागपूर तसेच शिरपूर वरवाडे. क वर्ग : वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग. तसेच विविध विभागांत उत्कृष्ट काम केलेल्या महानगरपालिकांना विशेष पुरस्कारही या वेळी देण्यात आले. नवी मुंबई : सर्वाधिक वसुली व कचरा वर्गीकरणामध्ये सर्वोत्तम कामगिरी, ठाणे : सर्वाधिक वसुली, धुळे : सर्वाधिक वसुली, अकोला : उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न, पुणे : हागणदारीमुक्ती कार्यक्रम अत्युत्कृष्ट कामगिरी, मीरा-भार्इंदर : प्रकल्प व्यवस्थापनामध्ये सर्वोत्तम कामगिरी, नागपूर : प्रकल्प व्यवस्थापनामध्ये सर्वोत्तम कामगिरी.कार्यक्रमात उत्कृष्ट अ वर्ग नगरपरिषदांना प्रत्येकी चार कोटी रुपयांचा पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. उत्कृष्ट ब वर्ग नगरपरिषदेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार तीन कोटी रुपयांचा, तर द्वितीय पुरस्कार दोन कोटी रुपये आणि उत्कृष्ट क वर्ग नगरपरिषदेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा, तर द्वितीय पुरस्कार दोन कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले.