शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
7
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
8
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
9
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
10
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
11
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
12
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
13
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
14
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
15
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
16
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
17
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
18
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
19
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
20
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!

उपाययोजना न केल्यास जनभावना भडकेल

By admin | Updated: September 6, 2015 00:51 IST

राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असून, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जटील बनला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना न केल्यास जनभावना भडकून

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असून, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जटील बनला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना न केल्यास जनभावना भडकून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिला. दुष्काळाबाबत योग्य ती माहितीच शासनाकडे नसल्याचा आरोप करीत मुख्यमंत्र्यांना सत्तेचे गांभीर्य नसल्याची टीकाही त्यांनी केली. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर शनिवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, शासनाने रोजगार हमीअंतर्गत कामे सुरूकेली पाहिजेत़ अनेक पाणी योजना, वीजबिलाची थकबाकी असल्याने त्या बंद पडल्या आहेत़ ही वसुली स्थगित करून त्यांना वीजपुरवठा सुरू केला पाहिजे़ ग्रामीण भागातील करच माफ करावेत, पण सध्या किमान स्थगिती तरी दिली पाहिजे. दुष्काळी परिस्थितीचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. केवळ फीमाफी करून चालणार नाही, तर त्यांच्या राहण्या-जेवण्याचीही व्यवस्था करण्याची गरज आहे. हे अधिकार जिल्हाधिकारी - तहसीलदार स्तरापर्यंत मिळाले तर कार्यवाही सोपी होईल. सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नसल्याचा आरोप करताना पवार यांनी चारा छावण्यांबाबत काढलेल्या अधिसूचनेचा दाखला दिला़ ते म्हणाले, की शासनाने फक्त बीड, लातूर आणि उस्मानाबाद येथे छावण्या सुरू करण्याचे परिपत्रक काढले. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांना भेटून परिस्थितीची कल्पना दिली. एक महिना वाट पाहू़ आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही. मात्र काहीच निर्णय घेतला नाही तर संकटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी जनावरांसह आंदोलन हाती घ्यावे लागेल़ ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना आलेल्या धमकीपत्राविषयी ते म्हणाले, की कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका घेण्याच्या वृत्तीमुळे राज्यातील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे़ केंद्र आणि राज्यात सत्तांतरानंतर अशा प्रवृत्तीचा आत्मविश्वास वाढला असल्याची टीका त्यांनी केली़ (प्रतिनिधी)राज ठाकरेंकडे दूरदृष्टी राज ठाकरे यांच्या टीकेला पवारांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, की राज ठाकरे हे अत्यंत दूरदर्शी आणि जनतेची अखंड सेवा करणारे नेतृत्व आहे. उद्या भूकंप झाला तरी त्याला ते राष्ट्रवादीला जबाबदार धरतील, असे ते म्हणाले.सरकार-संघात फरक नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीला हजेरी लावल्याबद्दल ते म्हणाले, की सरकार आणि संघ यात आपण फरक मानत नाही़ ते सरकारचाच एक भाग आहे. बिहार निवडणुकीत मुलायमसिंह यादव यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी २२ सप्टेंबरला दिल्लीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्याकडे बैठक आहे़ त्यात काय ते ठरेल, असे त्यांनी सांगितले.चारा छावण्यांचा पेचआजपर्यंत सहकारी साखर कारखाने आणि विविध संस्था चारा छावण्या उभारत होत्या. मात्र या वर्षी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चारा छावण्या उभारू नयेत, सरकारनेच या छावण्या चालवाव्यात, असे सांगत शरद पवार यांनी सरकारला पेचात पकडले आहे. मुख्यमंत्र्यांनी पूर्वी चारा कोणी खाल्ला, असा सवाल करून हेतूबद्दल शंका घेतली होती. शंकेला जागा नको, सरकारला छावण्या उभारण्यासाठी कार्यकर्ते मदत करतील; परंतु स्वत: उभारणार नाहीत, असे पवार यांनी म्हटले आहे.