शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

उपाययोजना न केल्यास जनभावना भडकेल

By admin | Updated: September 6, 2015 00:51 IST

राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असून, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जटील बनला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना न केल्यास जनभावना भडकून

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असून, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जटील बनला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना न केल्यास जनभावना भडकून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिला. दुष्काळाबाबत योग्य ती माहितीच शासनाकडे नसल्याचा आरोप करीत मुख्यमंत्र्यांना सत्तेचे गांभीर्य नसल्याची टीकाही त्यांनी केली. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर शनिवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, शासनाने रोजगार हमीअंतर्गत कामे सुरूकेली पाहिजेत़ अनेक पाणी योजना, वीजबिलाची थकबाकी असल्याने त्या बंद पडल्या आहेत़ ही वसुली स्थगित करून त्यांना वीजपुरवठा सुरू केला पाहिजे़ ग्रामीण भागातील करच माफ करावेत, पण सध्या किमान स्थगिती तरी दिली पाहिजे. दुष्काळी परिस्थितीचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. केवळ फीमाफी करून चालणार नाही, तर त्यांच्या राहण्या-जेवण्याचीही व्यवस्था करण्याची गरज आहे. हे अधिकार जिल्हाधिकारी - तहसीलदार स्तरापर्यंत मिळाले तर कार्यवाही सोपी होईल. सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नसल्याचा आरोप करताना पवार यांनी चारा छावण्यांबाबत काढलेल्या अधिसूचनेचा दाखला दिला़ ते म्हणाले, की शासनाने फक्त बीड, लातूर आणि उस्मानाबाद येथे छावण्या सुरू करण्याचे परिपत्रक काढले. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांना भेटून परिस्थितीची कल्पना दिली. एक महिना वाट पाहू़ आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही. मात्र काहीच निर्णय घेतला नाही तर संकटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी जनावरांसह आंदोलन हाती घ्यावे लागेल़ ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना आलेल्या धमकीपत्राविषयी ते म्हणाले, की कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका घेण्याच्या वृत्तीमुळे राज्यातील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे़ केंद्र आणि राज्यात सत्तांतरानंतर अशा प्रवृत्तीचा आत्मविश्वास वाढला असल्याची टीका त्यांनी केली़ (प्रतिनिधी)राज ठाकरेंकडे दूरदृष्टी राज ठाकरे यांच्या टीकेला पवारांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, की राज ठाकरे हे अत्यंत दूरदर्शी आणि जनतेची अखंड सेवा करणारे नेतृत्व आहे. उद्या भूकंप झाला तरी त्याला ते राष्ट्रवादीला जबाबदार धरतील, असे ते म्हणाले.सरकार-संघात फरक नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीला हजेरी लावल्याबद्दल ते म्हणाले, की सरकार आणि संघ यात आपण फरक मानत नाही़ ते सरकारचाच एक भाग आहे. बिहार निवडणुकीत मुलायमसिंह यादव यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी २२ सप्टेंबरला दिल्लीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्याकडे बैठक आहे़ त्यात काय ते ठरेल, असे त्यांनी सांगितले.चारा छावण्यांचा पेचआजपर्यंत सहकारी साखर कारखाने आणि विविध संस्था चारा छावण्या उभारत होत्या. मात्र या वर्षी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चारा छावण्या उभारू नयेत, सरकारनेच या छावण्या चालवाव्यात, असे सांगत शरद पवार यांनी सरकारला पेचात पकडले आहे. मुख्यमंत्र्यांनी पूर्वी चारा कोणी खाल्ला, असा सवाल करून हेतूबद्दल शंका घेतली होती. शंकेला जागा नको, सरकारला छावण्या उभारण्यासाठी कार्यकर्ते मदत करतील; परंतु स्वत: उभारणार नाहीत, असे पवार यांनी म्हटले आहे.