शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

'जमत नसेल तर वसंतदादा साखर कारखाना चालवायला द्या'

By admin | Updated: September 28, 2016 19:56 IST

वसंतदादा कारखान्यावर वर्षाला कोट्यवधीचा तोटाच लादणार असाल, तर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्या, अशी मागणी संतप्त सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याकडे बुधवारी केली.

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 28 - स्वत:च्या खासगी संस्था नफ्यात चालवत असाल आणि वसंतदादा कारखान्यावर वर्षाला कोट्यवधीचा तोटाच लादणार असाल, तर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्या, अशी मागणी संतप्त सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याकडे बुधवारी केली. वर्षभर बिले मिळत नाहीत आणि विचारणा केल्यानंतर उत्तरेही व्यवस्थित दिली जात नाहीत, अशा तक्रारीही सभासदांनी मांडल्या. दरम्यान, अध्यक्ष विशाल पाटील यांनी, यंदा उसाला प्रतिटन २५०० रुपये देण्याचा मानस असल्याचे जाहीर केले.वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. सभेला कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून हजारो सभासद उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीसच कवठेपिरान (ता. मिरज) येथील चंद्रशेखर बुटाले म्हणाले की, प्रत्येक सभेत कारखाना व्यवस्थित चालविला जात नसल्याबद्दल आम्ही तक्रारी करतो. वसंतदादा घराण्यावर विश्वास ठेवून सभासद ऊस घालत आहेत. परंतु, कारखाना प्रशासन आणि संचालक मंडळाने सभासदांची निराशा केली आहे. वेळेवर बिले मिळत नाहीत. दिलेले धनादेशही वठत नाहीत. तुम्हाला कारखाना व्यवस्थित चालविताच येत नसेल, तर तो अन्य संस्थांकडे चालविण्यास द्या.अंकलखोप (ता. पलूस) येथील अनिल पाटील म्हणाले की, वर्षाला कारखान्याचा तोटा वाढवून सभासदांची फसवणूक करण्यापेक्षा तो चालवायला द्या.त्यांच्या सुरात अन्य सभासदांनीही सूर मिसळून, कारखान्याच्या तोट्याबाबत आणि ऊस उत्पादकांच्या बिलाबाबत कारखाना संचालक व प्रशासनाने गांभीर्याने निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.सभासदांच्या संतप्त भावनांवर संचालक मंडळाची बाजू मांडताना विशाल पाटील म्हणाले की, दालमिया आणि रेणुका शुगर समूहाशी माझे चांगले संबंध आहेत. त्यांच्याशी मी दोनवेळा चर्चाही केली आहे. कारखाना चालवायला देण्याची सभासदांची इच्छा असेल, तर माझा त्यामध्ये कोणताच अडथळा असणार नाही. परंतु, वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. कारखान्यावर कर्जाचा बोजा आजचा नसून पूर्वीपासूनचा आहे. २७० कोटीच्या कर्जाचे व्याज वीस ते पंचवीस कोटी होत असल्यामुळे, तोटा वाढतच आहे. यात आताच्या संचालक मंडळाचा काहीच दोष नाही.ते म्हणाले की, यंदा गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन २५०० रुपयांपर्यंत दर द्यावा लागणार आहे. उसाची कमतरता आणि साखरेचे वाढलेले दर यामुळे ते शक्य होईल. या हंगामामध्ये कारखाना एन.पी.ए.मधून बाहेर पडल्यामुळे जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा सुरळीत होईल.यामुळे येत्या गळीत हंगामात बिल देण्यासाठी काहीच अडचण निर्माण होणार नाही. उसाचे गाळप झाल्यानंतर आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.त्यानंतर दिनकर पाटील-साळुंखे यांनी थकीत बिलांची रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह देण्याची मागणी केली.सभेत हणमंतराव पाटील, बबन गावडे, महादेव मोहिते, बाळासाहेब चौगुले, अण्णासाहेब पाटील, अमरनाथ पाटील, प्रभाकर पाटील, मीनाक्षी पाटील, विठ्ठल शिंदे, प्रदीप शिंदे यांनी संचालक मंडळाला थकीत बिलाबाबत जाब विचारला. १३ नोव्हेंबरपासून वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष कारखान्याने साजरे करावे, अशी मागणी सदस्यांनी केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक वारंवार बदलू नका, असेही सुनावण्यात आले.थकीत बिले दोन दिवसात देणारऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांनी थकीत ऊस बिलांची जोरदार मागणी केली. ऊस उत्पादकांना १० आॅक्टोबरपर्यंत बिले मिळाली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील यांनी सांगितले. मात्र ऊस उत्पादकांची जुनी थकीत बिले येत्या दोन दिवसात देण्यात येतील, असे आश्वासन विशाल पाटील यांनी दिले. त्यावर हे आश्वासन तरी अध्यक्षांनी पाळावे, अशी खोचक टीका सभासदांनी केली.सभासदांचे प्रश्न आणि अध्यक्षांची क्षमायापूर्वी सभासदांना साखर देण्याचे जाहीर केले असले तरी साखरच मिळालेली नाही. उसाची बिले दोन वर्षांपासून मिळत नाहीत. धनादेश दिले जातात, प्रत्यक्षात ते वटतच नाहीत. या समस्यांनी शेतकरी व सभासद हतबल झाला, तरी अध्यक्ष आणि प्रशासन गांभीर्याने दखल का घेत नाही, असा संतप्त सवाल सभासदांनी केला. सभासदांच्या प्रत्येक प्रश्नावर विशाल पाटील, ह्यतुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी क्षमा मागतोह्ण, असे सांगत होते. नंतर काही सभासदांनी प्रश्न विचारणे थांबवून सभाच बंद करा, असे सुनावले आणि ते उठूनही गेले.