शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

'जमत नसेल तर वसंतदादा साखर कारखाना चालवायला द्या'

By admin | Updated: September 28, 2016 19:56 IST

वसंतदादा कारखान्यावर वर्षाला कोट्यवधीचा तोटाच लादणार असाल, तर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्या, अशी मागणी संतप्त सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याकडे बुधवारी केली.

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 28 - स्वत:च्या खासगी संस्था नफ्यात चालवत असाल आणि वसंतदादा कारखान्यावर वर्षाला कोट्यवधीचा तोटाच लादणार असाल, तर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्या, अशी मागणी संतप्त सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याकडे बुधवारी केली. वर्षभर बिले मिळत नाहीत आणि विचारणा केल्यानंतर उत्तरेही व्यवस्थित दिली जात नाहीत, अशा तक्रारीही सभासदांनी मांडल्या. दरम्यान, अध्यक्ष विशाल पाटील यांनी, यंदा उसाला प्रतिटन २५०० रुपये देण्याचा मानस असल्याचे जाहीर केले.वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. सभेला कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून हजारो सभासद उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीसच कवठेपिरान (ता. मिरज) येथील चंद्रशेखर बुटाले म्हणाले की, प्रत्येक सभेत कारखाना व्यवस्थित चालविला जात नसल्याबद्दल आम्ही तक्रारी करतो. वसंतदादा घराण्यावर विश्वास ठेवून सभासद ऊस घालत आहेत. परंतु, कारखाना प्रशासन आणि संचालक मंडळाने सभासदांची निराशा केली आहे. वेळेवर बिले मिळत नाहीत. दिलेले धनादेशही वठत नाहीत. तुम्हाला कारखाना व्यवस्थित चालविताच येत नसेल, तर तो अन्य संस्थांकडे चालविण्यास द्या.अंकलखोप (ता. पलूस) येथील अनिल पाटील म्हणाले की, वर्षाला कारखान्याचा तोटा वाढवून सभासदांची फसवणूक करण्यापेक्षा तो चालवायला द्या.त्यांच्या सुरात अन्य सभासदांनीही सूर मिसळून, कारखान्याच्या तोट्याबाबत आणि ऊस उत्पादकांच्या बिलाबाबत कारखाना संचालक व प्रशासनाने गांभीर्याने निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.सभासदांच्या संतप्त भावनांवर संचालक मंडळाची बाजू मांडताना विशाल पाटील म्हणाले की, दालमिया आणि रेणुका शुगर समूहाशी माझे चांगले संबंध आहेत. त्यांच्याशी मी दोनवेळा चर्चाही केली आहे. कारखाना चालवायला देण्याची सभासदांची इच्छा असेल, तर माझा त्यामध्ये कोणताच अडथळा असणार नाही. परंतु, वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. कारखान्यावर कर्जाचा बोजा आजचा नसून पूर्वीपासूनचा आहे. २७० कोटीच्या कर्जाचे व्याज वीस ते पंचवीस कोटी होत असल्यामुळे, तोटा वाढतच आहे. यात आताच्या संचालक मंडळाचा काहीच दोष नाही.ते म्हणाले की, यंदा गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन २५०० रुपयांपर्यंत दर द्यावा लागणार आहे. उसाची कमतरता आणि साखरेचे वाढलेले दर यामुळे ते शक्य होईल. या हंगामामध्ये कारखाना एन.पी.ए.मधून बाहेर पडल्यामुळे जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा सुरळीत होईल.यामुळे येत्या गळीत हंगामात बिल देण्यासाठी काहीच अडचण निर्माण होणार नाही. उसाचे गाळप झाल्यानंतर आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.त्यानंतर दिनकर पाटील-साळुंखे यांनी थकीत बिलांची रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह देण्याची मागणी केली.सभेत हणमंतराव पाटील, बबन गावडे, महादेव मोहिते, बाळासाहेब चौगुले, अण्णासाहेब पाटील, अमरनाथ पाटील, प्रभाकर पाटील, मीनाक्षी पाटील, विठ्ठल शिंदे, प्रदीप शिंदे यांनी संचालक मंडळाला थकीत बिलाबाबत जाब विचारला. १३ नोव्हेंबरपासून वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष कारखान्याने साजरे करावे, अशी मागणी सदस्यांनी केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक वारंवार बदलू नका, असेही सुनावण्यात आले.थकीत बिले दोन दिवसात देणारऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांनी थकीत ऊस बिलांची जोरदार मागणी केली. ऊस उत्पादकांना १० आॅक्टोबरपर्यंत बिले मिळाली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील यांनी सांगितले. मात्र ऊस उत्पादकांची जुनी थकीत बिले येत्या दोन दिवसात देण्यात येतील, असे आश्वासन विशाल पाटील यांनी दिले. त्यावर हे आश्वासन तरी अध्यक्षांनी पाळावे, अशी खोचक टीका सभासदांनी केली.सभासदांचे प्रश्न आणि अध्यक्षांची क्षमायापूर्वी सभासदांना साखर देण्याचे जाहीर केले असले तरी साखरच मिळालेली नाही. उसाची बिले दोन वर्षांपासून मिळत नाहीत. धनादेश दिले जातात, प्रत्यक्षात ते वटतच नाहीत. या समस्यांनी शेतकरी व सभासद हतबल झाला, तरी अध्यक्ष आणि प्रशासन गांभीर्याने दखल का घेत नाही, असा संतप्त सवाल सभासदांनी केला. सभासदांच्या प्रत्येक प्रश्नावर विशाल पाटील, ह्यतुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी क्षमा मागतोह्ण, असे सांगत होते. नंतर काही सभासदांनी प्रश्न विचारणे थांबवून सभाच बंद करा, असे सुनावले आणि ते उठूनही गेले.