शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

प्राण गेले तरी बेहत्तर, रेतीउपसा करू देणार नाही

By admin | Updated: November 19, 2016 03:19 IST

वसईच्या पाचूबंदर आणि किल्लाबंदर समुद्रात क्रुझरने रेतीउत्खनन करण्याची परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली

शशी करपे,

वसई- वसईच्या पाचूबंदर आणि किल्लाबंदर समुद्रात क्रुझरने रेतीउत्खनन करण्याची परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्याला येथील मच्छीमारांनी कडाडून विरोध केला आहे. प्राण गेले तरी बेहत्तर, पण रेतीउपसा करू देणार नाही, असा एल्गार मच्छीमारांनी केला आहे. त्यामुळे वसईत पुन्हा एकदा रेतीविरोधातील आंदोलन चिघळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.वसई तालुक्यातील रेतीबंदरातून रेती उत्खननाला बंदी घातली असतानाही रेतीचे चोरटे उत्खनन आणि वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. याविरोधात रेती व्यावसायिकांनी हाय वे रोखून मोठे आंदोलन केले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई तहकूब केली होती. हा वाद ताजा असतानाच आता जिल्हाधिकारी कार्यालयातून वसईच्या खाडीत यांत्रिक पद्धतीने रेतीउत्खनन करण्याची परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे मच्छीमार गावांमधून विरोध सुरु झाला आहे.वसई तालुक्यात पाचूबंदर, किल्लाबंदर ही मच्छीमारांची मोठी गावे आहेत. येथील खाडीत होणाऱ्या बेकायदा रेतीउत्खननाविरोधात गावकरी गेल्या १६ वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. बेसुमार रेतीउत्खननामुळे समुद्रकिनारा उद्ध्वस्त झाला आहे. पूर्वी किनाऱ्यावर दोनशेहून अधिक बोटी ठेवता येत होत्या. आता दोन-चार बोटी ठेवण्याइतपतही किनारा शिल्लक राहिलेला नाही. त्याचबरोबर किनाऱ्यावर जागाच नसल्याने मासळी सुकवण्याची पर्यायी जागा नसल्याने सुकी मासळीचा व्यवसाय ठप्प झाला आहे. पावसाळ्यात मोठ्या उधाणात दरवर्षी गावात पाणी शिरू लागले आहे. त्यामुळे राहत्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. रेतीउत्खननाविरोधात गावकऱ्यांनी अनेक आंदोलने केली. रेतीउत्खनन करणाऱ्या बोटी पकडून पोलिसांच्या हवाली केल्या आहेत. त्यामुळे संघर्षही निर्माण होत होता. परंतु महसूल, पोलीस, कस्टम आणि मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी काहीच कारवाई करीत नव्हती. न्यायासाठी कोळी युवा शक्ती, वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेसह आणखी एका संस्थेच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने चिंता व्यक्त करून बेकायदा रेतीउपसा होणार नाही, याकडे लक्ष ठेवण्याचे आदेश संबंधित खात्याला दिले होते. परंतु, त्यानंतरही रेतीउपसा सुरुच आहे.>एकही ड्रेजर फिरू देणार नाहीमहसूल खात्याने वसई खाडीत भार्इंदर रेल्वे पुलाच्या पश्चिमेकडे यांत्रिक पद्धतीने क्रुझरच्या माध्यमातून रेतीउपसा करण्यास परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. याची माहिती मिळताच कोळी युवा शक्ती आणि वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेच्या पदाधिकारी अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन रेतीउपशाला परवानगी देण्यास विरोध केला. गावकऱ्यांचा विरोध डावलून रेतीउपशाला परवानगी दिल्यास या ठिकाणी रक्तरंजित आंदोलन होईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. रेतीउपशाला परवानगी दिली जात असल्याची माहिती मिळताच पाचूबंदर-किल्लाबंदर गावातील मच्छीमार एकवटले आहेत. वसईच्या खाडीत एकही डेजर फिरू देणार नाही. त्यासाठी प्राण गेले तरी चालतील, असा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.>जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष फक्त महसुलाकडेवसईच्या खाडीत नेव्हीगेशन (नौकानयन) योग्य प्रकारे होत नाही. नेव्हीगेशन सुकर व्हावे, असे सरकारचे धोरण असल्याने रेतीउपसा करणे गरजेचे आहे, असे कारण पुढे करीत यांत्रिक पध्दतीने रेतीउपसा करण्याची परवानगी देण्याचे कुटील कारस्थान केले जात आहे. रेतीउत्खनन व्हावे किंंवा होऊ नये, याबाबत मेरीटाइम बोर्डाने शिफारस करायची असते, असे महसूलचे अधिकारी सांगत आहेत. महसुलाच्या नावाखाली धनदांडग्यांच्या फायद्यासाठी गावकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यासाठी प्राण गेले तरी चालतील, पण विरोध करणार, अशी संतप्त प्रतिक्रिया वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेचे चेअरमन संजय कोळी यांनी लोकमतकडे व्यक्त केली.>वसईच्या खाडीत यांत्रिक पद्धतीने रेतीउपसा झाल्यास रेल्वे पुलांना धोका निर्माण होणार आहे. त्याचबरोबर पाचूबंदर-किल्लाबंदर ही गावे पालघर जिल्ह्याच्या नकाशावरून कायमचीच पुसली जाण्याची भीती आहे. याविरोधात मच्छीमार एकवटला असून कोणत्याही स्थितीत खाडीत क्रुझर अथवा डुबीने रेतीउपसा करु द्यायचा नाही, असा निर्धार केला आहे. हा विरोध डावलून परवानगी दिली गेली तर वसईच्या खाडीत रक्तरंजित संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही. - दिलीप पाठक, अध्यक्ष कोळी युवा शक्ती.