शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

शनी चौथ-यावर महिलांना प्रवेश नाकारायचा असेल तर तसा कायदा करा - उच्च न्यायालय

By admin | Updated: March 30, 2016 16:46 IST

शनिशिंगणापूर मंदिरात चौथ-यावर महिलांना प्रवेश देण्यावरुन वाद सुरु असताना अशाप्रकारे बंदी घालता येऊ शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हंटलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ३० - शनिशिंगणापूर मंदिरात चौथ-यावर महिलांना प्रवेश देण्यावरुन वाद सुरु असताना अशाप्रकारे बंदी घालता येऊ शकत नसल्याचं मुंबई  उच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. ज्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश दिला जातो त्याठिकाणी महिलांना बंदी घालणं चुकीचं असल्याचं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे. जर महिलांना शनि शिंगणापूर येथे प्रवेश नाकारायचा असेल तर तसा कायदा करा असे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
 
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी न्यायालयात याचिका केली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपलं मत मांडलं आहे. कायद्याने महिलांना कुठेही प्रवेश नाकारला जाऊ शकत नसताना शनी शिंगणापूरला महिलांना प्रवेश कसा नाकारला जातो? असा सवाल मुंबई उच्च न्यायालायने राज्य सरकारला विचारला आहे. न्यायालयाने याप्रकरणी राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागवलं असून दोन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
 
मंदिरात जाऊन दर्शन घेणे हा महिलांचा अधिकार आहे आणि त्यांची सुरक्षा ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. शनि शिंगणापूर येथे महिलांना मंदिरात प्रवेश नाकारला जात असेल आणि यावरुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर कारवाई करावी असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
 
शनीशिंगणापूर मंदिरातील शनी चौथ-यावर महिलांना प्रवेश देण्यावरुन गेले अनेक दिवस वाद सुरु आहेत. एका महिलेने चौथ-यावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर हा वाद पेटला होता. भुमाता ब्रिगेडने देखील आंदोलन करत चौथ-यावर जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गावकरी, मंदिर प्रशासन आणि काही संघटनांनी याला विरोध दर्शवला होता. भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेटदेखील घेतली होती.