शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

विरोध झाला तरी समृद्धी मार्ग करणारच

By admin | Updated: May 9, 2017 02:18 IST

शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठीच समृद्धी मार्गाचे नियोजन आहे. कोणी कितीही विरोध केला तरी सरकार हा मार्ग करणारच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठीच समृद्धी मार्गाचे नियोजन आहे. कोणी कितीही विरोध केला तरी सरकार हा मार्ग करणारच आहे. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सोमवारी येथे स्पष्ट केले.साईदर्शनानंतर ते म्हणाले की, २० जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समृद्धी मार्गाचा फायदा होणार आहे. त्यासाठी तीन लाख शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यापैकी पाचशे ते हजार शेतकऱ्यांचाच विरोध आहे. त्यांच्याशी चर्चा करून सरकार तोडगा काढणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत समृद्धी मार्ग पूर्णत्वास जाण्यासाठी सरकार कटीबध्द आहे. या मार्गावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाचशे मीटरच्या आत दारुच्या दुकानास परवानगी दिली जाणार नाही.राज्यातील बाह्यवळण रस्ते असणाऱ्या शहरांतून जाणारे राज्यमार्ग व महामार्ग वर्ग करण्यासंबधी स्थानिक महापालिका अथवा नगरपालिकांनी मागणी केल्यास त्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यासंबधी सरकार सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंबंधी सरकार सकारात्मक आहे. मात्र त्यापूर्वी शेती क्षेत्रात सिंचन व पायाभूत सुविधा निर्माण करून देणे आवश्यक आहे. राज्यात भाजपाचे सरकार आल्यावर चार हजार कोटी खर्च करून ११ हजार गावांत जलसंधारणाची कामे करून पाणी साठे निर्माण केल्याने गेल्यावर्षी राज्यातील शेतीचे उत्पन्न ४० हजार कोटी झाले. यंदा त्यात वाढ होऊन ते ५० हजार कोटींवर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यात ३ लाख तूर खरेदी केली जात होती. आमच्या काळात त्यात वाढ करून ५१ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.