शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विरोध झाला तरी समृद्धी मार्ग करणारच

By admin | Updated: May 9, 2017 02:18 IST

शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठीच समृद्धी मार्गाचे नियोजन आहे. कोणी कितीही विरोध केला तरी सरकार हा मार्ग करणारच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठीच समृद्धी मार्गाचे नियोजन आहे. कोणी कितीही विरोध केला तरी सरकार हा मार्ग करणारच आहे. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सोमवारी येथे स्पष्ट केले.साईदर्शनानंतर ते म्हणाले की, २० जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समृद्धी मार्गाचा फायदा होणार आहे. त्यासाठी तीन लाख शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यापैकी पाचशे ते हजार शेतकऱ्यांचाच विरोध आहे. त्यांच्याशी चर्चा करून सरकार तोडगा काढणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत समृद्धी मार्ग पूर्णत्वास जाण्यासाठी सरकार कटीबध्द आहे. या मार्गावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाचशे मीटरच्या आत दारुच्या दुकानास परवानगी दिली जाणार नाही.राज्यातील बाह्यवळण रस्ते असणाऱ्या शहरांतून जाणारे राज्यमार्ग व महामार्ग वर्ग करण्यासंबधी स्थानिक महापालिका अथवा नगरपालिकांनी मागणी केल्यास त्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यासंबधी सरकार सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंबंधी सरकार सकारात्मक आहे. मात्र त्यापूर्वी शेती क्षेत्रात सिंचन व पायाभूत सुविधा निर्माण करून देणे आवश्यक आहे. राज्यात भाजपाचे सरकार आल्यावर चार हजार कोटी खर्च करून ११ हजार गावांत जलसंधारणाची कामे करून पाणी साठे निर्माण केल्याने गेल्यावर्षी राज्यातील शेतीचे उत्पन्न ४० हजार कोटी झाले. यंदा त्यात वाढ होऊन ते ५० हजार कोटींवर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यात ३ लाख तूर खरेदी केली जात होती. आमच्या काळात त्यात वाढ करून ५१ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.