शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

घोटाळे असतील, तर संघर्ष का केला नाही?

By admin | Updated: September 6, 2014 10:53 IST

घोटाळेबाज नेत्यांच्या विरोधात प्रत्येक मतदारसंघात तुम्ही काय केले, किती संघर्ष यात्र काढल्या, कोणती आंदोलने केली, अशी उलटतपासणी शहा यांनी केली.

भाजपा कोअर कमिटी : अमित शहांचा राज्यातील नेत्यांना सवाल
संदीप प्रधान - मुंबई
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने गेल्या 15 वर्षात 11 लाख 88 हजार कोटी रुपयांचे घोटाळे केल्याची यादी भाजपाच्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कोअर कमिटीच्या बैठकीत सादर केली खरी, पण अशा घोटाळेबाज नेत्यांच्या विरोधात प्रत्येक मतदारसंघात तुम्ही काय केले, किती संघर्ष यात्रा काढल्या, कोणती आंदोलने केली, अशी उलटतपासणी शहा यांनी केली. लोकसभा निवडणूक निकालातील यशामुळे आलेली सुस्ती आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आलेले शैथिल्य यातून तत्काळ बाहेर पडण्याची सूचनाही त्यांनी केली. केवळ मोदी लाटेवर अवलंबून राहू नका असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सत्ताधा:यांनी आदर्श घोटाळ्यापासून अगदी दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या शेणाचा घोटाळा करण्यार्पयत अनेक घोटाळे केले असल्याची जंत्री भाजपा नेत्यांनी पक्षाध्यक्ष शहा यांना सादर केली. घोटाळ्याची ही रक्कम बरीच मोठी असल्याचे निदर्शनास आणले. त्यावर शहा म्हणाले की, सरकारचे घोटाळे गंभीर आहेत. मात्र त्याच्या विरोधात तुम्ही काय केले? पंकजा मुंडे यांच्या सध्या सुरू असलेल्या संघर्ष यात्रेचा उल्लेख करून घोटाळे करणा:या मंत्री व नेत्यांच्या मतदारसंघात असे काही आंदोलन करून लोकांपर्यंत हे घोटाळे पोहोचवले का? केवळ दूरचित्रवाहिनीला मुलाखती देऊन आणि टीका करून तुमची जबाबदारी संपत नाही. गेल्या काही दिवसांत कोणते कार्यक्रम हाती घेतले, असा जाब विचारला.
 
माथूर करणार सेनेसोबत चर्चा
शिवसेनेबरोबर जागावाटपाची चर्चा करण्याकरिता ओम माथूर यांना शहा यांनी नियुक्त केले आहे. निवडणूक घोषित झाल्यावर किमान पंधरा दिवस आपला मुक्काम महाराष्ट्रात राहील, असेही शहा यांनी स्पष्ट केले आहे. शहा यांच्या मुंबई दौ:यानंतर आता भाजपाचा कार्यकर्ता सक्रिय होईल, असा विश्वास एका नेत्याने व्यक्त केला.
 
महाराष्ट्रात अनुकूल वातावरण असले तरी लोकसभा निवडणूक निकालानंतर येथील भाजपा कार्यकर्ता सध्या हवेत आहे. शिवाय सरकारविरोधात संघर्ष करणारा गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नेता गमावल्याने काही कार्यकर्ते अजून शोकाकुल आहेत. असेच वातावरण राहिले तर अनुकूल वातावरण असूनही अपेक्षित यश लाभणार नाही, असा सावधानतेचा इशाराही शहा यांनी दिला.