शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

घोटाळे असतील, तर संघर्ष का केला नाही?

By admin | Updated: September 6, 2014 10:53 IST

घोटाळेबाज नेत्यांच्या विरोधात प्रत्येक मतदारसंघात तुम्ही काय केले, किती संघर्ष यात्र काढल्या, कोणती आंदोलने केली, अशी उलटतपासणी शहा यांनी केली.

भाजपा कोअर कमिटी : अमित शहांचा राज्यातील नेत्यांना सवाल
संदीप प्रधान - मुंबई
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने गेल्या 15 वर्षात 11 लाख 88 हजार कोटी रुपयांचे घोटाळे केल्याची यादी भाजपाच्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कोअर कमिटीच्या बैठकीत सादर केली खरी, पण अशा घोटाळेबाज नेत्यांच्या विरोधात प्रत्येक मतदारसंघात तुम्ही काय केले, किती संघर्ष यात्रा काढल्या, कोणती आंदोलने केली, अशी उलटतपासणी शहा यांनी केली. लोकसभा निवडणूक निकालातील यशामुळे आलेली सुस्ती आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आलेले शैथिल्य यातून तत्काळ बाहेर पडण्याची सूचनाही त्यांनी केली. केवळ मोदी लाटेवर अवलंबून राहू नका असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सत्ताधा:यांनी आदर्श घोटाळ्यापासून अगदी दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या शेणाचा घोटाळा करण्यार्पयत अनेक घोटाळे केले असल्याची जंत्री भाजपा नेत्यांनी पक्षाध्यक्ष शहा यांना सादर केली. घोटाळ्याची ही रक्कम बरीच मोठी असल्याचे निदर्शनास आणले. त्यावर शहा म्हणाले की, सरकारचे घोटाळे गंभीर आहेत. मात्र त्याच्या विरोधात तुम्ही काय केले? पंकजा मुंडे यांच्या सध्या सुरू असलेल्या संघर्ष यात्रेचा उल्लेख करून घोटाळे करणा:या मंत्री व नेत्यांच्या मतदारसंघात असे काही आंदोलन करून लोकांपर्यंत हे घोटाळे पोहोचवले का? केवळ दूरचित्रवाहिनीला मुलाखती देऊन आणि टीका करून तुमची जबाबदारी संपत नाही. गेल्या काही दिवसांत कोणते कार्यक्रम हाती घेतले, असा जाब विचारला.
 
माथूर करणार सेनेसोबत चर्चा
शिवसेनेबरोबर जागावाटपाची चर्चा करण्याकरिता ओम माथूर यांना शहा यांनी नियुक्त केले आहे. निवडणूक घोषित झाल्यावर किमान पंधरा दिवस आपला मुक्काम महाराष्ट्रात राहील, असेही शहा यांनी स्पष्ट केले आहे. शहा यांच्या मुंबई दौ:यानंतर आता भाजपाचा कार्यकर्ता सक्रिय होईल, असा विश्वास एका नेत्याने व्यक्त केला.
 
महाराष्ट्रात अनुकूल वातावरण असले तरी लोकसभा निवडणूक निकालानंतर येथील भाजपा कार्यकर्ता सध्या हवेत आहे. शिवाय सरकारविरोधात संघर्ष करणारा गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नेता गमावल्याने काही कार्यकर्ते अजून शोकाकुल आहेत. असेच वातावरण राहिले तर अनुकूल वातावरण असूनही अपेक्षित यश लाभणार नाही, असा सावधानतेचा इशाराही शहा यांनी दिला.