शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

घोटाळे असतील, तर संघर्ष का केला नाही?

By admin | Updated: September 6, 2014 10:53 IST

घोटाळेबाज नेत्यांच्या विरोधात प्रत्येक मतदारसंघात तुम्ही काय केले, किती संघर्ष यात्र काढल्या, कोणती आंदोलने केली, अशी उलटतपासणी शहा यांनी केली.

भाजपा कोअर कमिटी : अमित शहांचा राज्यातील नेत्यांना सवाल
संदीप प्रधान - मुंबई
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने गेल्या 15 वर्षात 11 लाख 88 हजार कोटी रुपयांचे घोटाळे केल्याची यादी भाजपाच्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कोअर कमिटीच्या बैठकीत सादर केली खरी, पण अशा घोटाळेबाज नेत्यांच्या विरोधात प्रत्येक मतदारसंघात तुम्ही काय केले, किती संघर्ष यात्रा काढल्या, कोणती आंदोलने केली, अशी उलटतपासणी शहा यांनी केली. लोकसभा निवडणूक निकालातील यशामुळे आलेली सुस्ती आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आलेले शैथिल्य यातून तत्काळ बाहेर पडण्याची सूचनाही त्यांनी केली. केवळ मोदी लाटेवर अवलंबून राहू नका असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सत्ताधा:यांनी आदर्श घोटाळ्यापासून अगदी दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या शेणाचा घोटाळा करण्यार्पयत अनेक घोटाळे केले असल्याची जंत्री भाजपा नेत्यांनी पक्षाध्यक्ष शहा यांना सादर केली. घोटाळ्याची ही रक्कम बरीच मोठी असल्याचे निदर्शनास आणले. त्यावर शहा म्हणाले की, सरकारचे घोटाळे गंभीर आहेत. मात्र त्याच्या विरोधात तुम्ही काय केले? पंकजा मुंडे यांच्या सध्या सुरू असलेल्या संघर्ष यात्रेचा उल्लेख करून घोटाळे करणा:या मंत्री व नेत्यांच्या मतदारसंघात असे काही आंदोलन करून लोकांपर्यंत हे घोटाळे पोहोचवले का? केवळ दूरचित्रवाहिनीला मुलाखती देऊन आणि टीका करून तुमची जबाबदारी संपत नाही. गेल्या काही दिवसांत कोणते कार्यक्रम हाती घेतले, असा जाब विचारला.
 
माथूर करणार सेनेसोबत चर्चा
शिवसेनेबरोबर जागावाटपाची चर्चा करण्याकरिता ओम माथूर यांना शहा यांनी नियुक्त केले आहे. निवडणूक घोषित झाल्यावर किमान पंधरा दिवस आपला मुक्काम महाराष्ट्रात राहील, असेही शहा यांनी स्पष्ट केले आहे. शहा यांच्या मुंबई दौ:यानंतर आता भाजपाचा कार्यकर्ता सक्रिय होईल, असा विश्वास एका नेत्याने व्यक्त केला.
 
महाराष्ट्रात अनुकूल वातावरण असले तरी लोकसभा निवडणूक निकालानंतर येथील भाजपा कार्यकर्ता सध्या हवेत आहे. शिवाय सरकारविरोधात संघर्ष करणारा गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नेता गमावल्याने काही कार्यकर्ते अजून शोकाकुल आहेत. असेच वातावरण राहिले तर अनुकूल वातावरण असूनही अपेक्षित यश लाभणार नाही, असा सावधानतेचा इशाराही शहा यांनी दिला.