शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

शिवसेनेने पाठिंबा काढल्यास सरकार अल्पमतात येईल

By admin | Updated: February 9, 2017 23:27 IST

महापालिकांच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात येईल.

ऑनलाइन लोकमतबारामती/काटेवाडी, दि. 9 - महापालिकांच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात येईल. शिवसेनेनेसह विरोधकांचे संख्याबळ त्या वेळी १५० असेल. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापसह अन्य डाव्या पक्षांचा समावेश आहे. सध्या सरकार जाईल की राहील, अशी अवस्था असल्याचे भाकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास भाजपाचे १३८ आमदार राहतील. त्यावर सरकार टिकणार कसे, अशी टिप्पणीदेखील त्यांनी केली. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर पवार यांनी बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार शुभारंभाच्या सभेत वरील भाकीत केले. त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. भाजपाच्या डोक्यात सत्ता भिनली आहे. त्यांचे मित्रपक्षदेखील नाराज आहेत. शिवसेनेचे मंत्रीदेखील आम्हाला कोणी विचारत नाही, असे सांगतात. राज्यमंत्र्यांना तर अधिकारच ठेवले नाही. निर्णय घेताना भाजपा विचारात घेत नाही, अशी खंत आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला, तर सरकार अल्पमतात येईल. तेव्हा अन्य कोणतेही पक्ष त्यांना पाठिंबा देणार नाहीत, असे सांगून ते मोकळे झाले.भाजपा-शिवसेनेचे सरकार शेतकरीविरोधी आहे. यांना शेतक-यांचे काही देणेघेणे नाही. उत्तर प्रदेश निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकार आश्वासनांच्या घोषणा देत आहे. उत्तर प्रदेशात भाजपा सरकार आल्यास शून्य टक्के व्याजदराने कर्ज आणि कर्जमाफी देण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मग महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असताना येथील शेतकऱ्यांची कर्जमाफी का करीत नाही, असा सवाल त्यांनी केला. सरकार फक्त घोषणा करीत आहे. दलाल, गुंडांना पक्षात प्रवेश देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांना काही निर्णय घेता येत नाही. ज्यांना काही कळत नाही, त्यांना त्यांच्याकडे किंमत आहे. तेच निर्णय घेतात, हेच खरे राज्याचे दुर्दैव आहे, असा टोलाही त्यांनी मारला. बाळासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, सभापती करण खलाटे, गुलाबराव देवकाते आदींची भाषणे झाली. राजेंद्र पवार, संभाजी होळकर, प्रशांत काटे, बाळासाहेब तावरे, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, योगेश जगताप, वनिता बनकर, गौरी काटे उपस्थित होत्या.