शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

शिवसेनेने पाठिंबा काढल्यास सरकार अल्पमतात येईल

By admin | Updated: February 9, 2017 23:27 IST

महापालिकांच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात येईल.

ऑनलाइन लोकमतबारामती/काटेवाडी, दि. 9 - महापालिकांच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात येईल. शिवसेनेनेसह विरोधकांचे संख्याबळ त्या वेळी १५० असेल. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापसह अन्य डाव्या पक्षांचा समावेश आहे. सध्या सरकार जाईल की राहील, अशी अवस्था असल्याचे भाकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास भाजपाचे १३८ आमदार राहतील. त्यावर सरकार टिकणार कसे, अशी टिप्पणीदेखील त्यांनी केली. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर पवार यांनी बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार शुभारंभाच्या सभेत वरील भाकीत केले. त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. भाजपाच्या डोक्यात सत्ता भिनली आहे. त्यांचे मित्रपक्षदेखील नाराज आहेत. शिवसेनेचे मंत्रीदेखील आम्हाला कोणी विचारत नाही, असे सांगतात. राज्यमंत्र्यांना तर अधिकारच ठेवले नाही. निर्णय घेताना भाजपा विचारात घेत नाही, अशी खंत आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला, तर सरकार अल्पमतात येईल. तेव्हा अन्य कोणतेही पक्ष त्यांना पाठिंबा देणार नाहीत, असे सांगून ते मोकळे झाले.भाजपा-शिवसेनेचे सरकार शेतकरीविरोधी आहे. यांना शेतक-यांचे काही देणेघेणे नाही. उत्तर प्रदेश निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकार आश्वासनांच्या घोषणा देत आहे. उत्तर प्रदेशात भाजपा सरकार आल्यास शून्य टक्के व्याजदराने कर्ज आणि कर्जमाफी देण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मग महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असताना येथील शेतकऱ्यांची कर्जमाफी का करीत नाही, असा सवाल त्यांनी केला. सरकार फक्त घोषणा करीत आहे. दलाल, गुंडांना पक्षात प्रवेश देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांना काही निर्णय घेता येत नाही. ज्यांना काही कळत नाही, त्यांना त्यांच्याकडे किंमत आहे. तेच निर्णय घेतात, हेच खरे राज्याचे दुर्दैव आहे, असा टोलाही त्यांनी मारला. बाळासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, सभापती करण खलाटे, गुलाबराव देवकाते आदींची भाषणे झाली. राजेंद्र पवार, संभाजी होळकर, प्रशांत काटे, बाळासाहेब तावरे, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, योगेश जगताप, वनिता बनकर, गौरी काटे उपस्थित होत्या.