शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

शिवसेनेने पाठिंबा काढल्यास सरकार अल्पमतात येईल

By admin | Updated: February 9, 2017 23:27 IST

महापालिकांच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात येईल.

ऑनलाइन लोकमतबारामती/काटेवाडी, दि. 9 - महापालिकांच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात येईल. शिवसेनेनेसह विरोधकांचे संख्याबळ त्या वेळी १५० असेल. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापसह अन्य डाव्या पक्षांचा समावेश आहे. सध्या सरकार जाईल की राहील, अशी अवस्था असल्याचे भाकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास भाजपाचे १३८ आमदार राहतील. त्यावर सरकार टिकणार कसे, अशी टिप्पणीदेखील त्यांनी केली. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर पवार यांनी बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार शुभारंभाच्या सभेत वरील भाकीत केले. त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. भाजपाच्या डोक्यात सत्ता भिनली आहे. त्यांचे मित्रपक्षदेखील नाराज आहेत. शिवसेनेचे मंत्रीदेखील आम्हाला कोणी विचारत नाही, असे सांगतात. राज्यमंत्र्यांना तर अधिकारच ठेवले नाही. निर्णय घेताना भाजपा विचारात घेत नाही, अशी खंत आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला, तर सरकार अल्पमतात येईल. तेव्हा अन्य कोणतेही पक्ष त्यांना पाठिंबा देणार नाहीत, असे सांगून ते मोकळे झाले.भाजपा-शिवसेनेचे सरकार शेतकरीविरोधी आहे. यांना शेतक-यांचे काही देणेघेणे नाही. उत्तर प्रदेश निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकार आश्वासनांच्या घोषणा देत आहे. उत्तर प्रदेशात भाजपा सरकार आल्यास शून्य टक्के व्याजदराने कर्ज आणि कर्जमाफी देण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मग महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असताना येथील शेतकऱ्यांची कर्जमाफी का करीत नाही, असा सवाल त्यांनी केला. सरकार फक्त घोषणा करीत आहे. दलाल, गुंडांना पक्षात प्रवेश देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांना काही निर्णय घेता येत नाही. ज्यांना काही कळत नाही, त्यांना त्यांच्याकडे किंमत आहे. तेच निर्णय घेतात, हेच खरे राज्याचे दुर्दैव आहे, असा टोलाही त्यांनी मारला. बाळासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, सभापती करण खलाटे, गुलाबराव देवकाते आदींची भाषणे झाली. राजेंद्र पवार, संभाजी होळकर, प्रशांत काटे, बाळासाहेब तावरे, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, योगेश जगताप, वनिता बनकर, गौरी काटे उपस्थित होत्या.