शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

गरज भासल्यास धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेणार

By admin | Updated: October 13, 2014 13:30 IST

राज्यात काँग्रेसला चांगले वातावरण असून निकालानंतर गरज भासल्यास धर्मनिरक्षपेक्ष पक्षांना सोबत घेण्यात येईल, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

 अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचा ट्रेंड विधानसभा निवडणुकीत नाही. आता निश्‍चित वेगळी परिस्थिती असून राष्ट्रवादीसोबत असणारी आघाडी फुटल्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. राज्यात काँग्रेसला चांगले वातावरण असून निकालानंतर गरज भासल्यास धर्मनिरक्षपेक्ष पक्षांना सोबत घेण्यात येईल, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. नगर येथे पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. अल्पसंख्याक, मागसवर्गीय, दलित आणि शेतकरी हे पक्षाचे पाठबळ असल्याने काँग्रेसला अडचण नाही. काँग्रेसच्या उमेदवारांच्या लढती या मतदारसंघनिहाय परिस्थितीनुसार लढविल्या जात आहेत. आघाडी असताना ज्यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. सभागृहाचे काम बंद पाडले. त्यांना आज पक्षात घेवून त्यांनी उमेदवार्‍या दिल्या असल्याची टीका त्यांनी भाजपाचे नाव न घेता केली.जिल्ह्यात स्टार प्रचारकांची उणीव भासली या प्रश्नांवर बोलतांना थोरात यांनी राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना गल्लीत येण्यास र्मयादा पडतात. तशी अपेक्षाही चुकीची आहे. पूर्वी आचारसंहितेचा कालावधी दीड महिन्यांपेक्षा अधिक असायचा, आता ३६ दिवसांत पूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे वेळेची र्मयादा पडते.

जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडे तीन जागा असून त्या जागा या निवडणुकीत कायम राहणार असून त्यात वाढ होईल, असा विश्‍वास थोरात यांनी व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादीवरील भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द झालेले नसल्याने त्यावर भाष्य करणे चुकीचे ठरेल, असे ते म्हणाले.