शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मुस्लिमांनी ठरवल्यासच दहशतवादाचा नायनाट

By admin | Updated: January 13, 2015 04:55 IST

भारत व इंडोनेशिया हे दोन्ही मुस्लिमबहुल देश असून, या देशांतील मुस्लिमांनी निश्चय केला तरच जगातील दहशतवादाचा नायनाट होऊ शकेल

नाशिक : भारत व इंडोनेशिया हे दोन्ही मुस्लिमबहुल देश असून, या देशांतील मुस्लिमांनी निश्चय केला तरच जगातील दहशतवादाचा नायनाट होऊ शकेल, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते व आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी येथे ‘वेणुनाद’ या विश्वविक्रमी कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांशी बोलताना केले.ते म्हणाले, सध्या दहशतवादामुळे सगळे जग त्रस्त आहे. पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ल्याविरोधात हजारो लोक जमले होते. दहशतवाद समूळ नष्ट करायचा असल्यास भारत व इंडोनेशिया या दोन मुस्लिमबहुल देशांतील मुस्लिमांना तसा निश्चय करायला हवा. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणावर चिंता व्यक्त करीत केंद्र व राज्यातील नवे सरकार नद्यांच्या स्वच्छतेत पुढाकार घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संगीत, साहित्य, आयुर्वेद या बाबी म्हणजेच भारतीय संस्कृती असून, तरुणाईने देशाच्या संस्कृतीचा सन्मान न केल्यास भारत नष्ट होईल, असे ते म्हणाले.देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आल्यानंतर हिंदुत्वाचे प्रस्थ वाढते आहे का, या प्रश्नावर रविशंकर यांनी केंद्र सरकारची पाठराखण केली. ते म्हणाले, हिंदुत्ववादी नेते आधीही होते आणि आताही आहेत. त्यांच्याशी केंद्र सरकारचे काही देणेघेणे नाही. अध्यात्मातूनच राजकारणाची स्वच्छता होऊ शकेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. (प्रतिनिधी)