शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

...तर मोदींना फरफटत नेले असते!

By admin | Updated: May 9, 2014 01:09 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यात बुधवारी कडाक्याचे वाग्युद्ध जुंपले.

बुग्जे बुग्जे (प. बंगाल) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यात बुधवारी कडाक्याचे वाग्युद्ध जुंपले. एकाने दुसर्‍यावर शरसंधान करावे व दुसर्‍याने लगेच पुढच्या सभेत त्याचा पलटवार करावा, असे दोन्ही नेत्यांच्या रात्री उशिरापर्यंत झालेल्या प्रत्येकी तीन प्रचारसभांमध्ये पाहायला मिळाले. गेले काही दिवस मोदींविरुद्ध सुरु केलेली जोरदार हल्लेबाजी बुग्जे बुग्जे येथील सभेतही सुरुच ठेवताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ज्यांनी दंगली घडवून आणल्या त्यांना पंतप्रधान होण्याचा काहीही अधिकार नाही. मोदींना अटक करण्याचीही त्यांनी मागणी केली. अल्पसंख्य समाजाचे प्राबल्य असलेल्या बुग्जे बुग्जे, मेतियाबुर्ज आणि बेहासातील चौराष्ट्र येथे ममतादीदींनी मोदींमवर चौफेर हल्ला चढविला. ममता बॅनर्जी यांच्या आपल्याला अटक करण्याच्या मनसुब्याची लगेच खिल्ली उडवीत मोदी म्हणाले, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांना मला तुरुंगात पाठवायचेच असेल तर त्यासाठी दोर खरेदीसाठी निविदा मागविण्यावर खर्च करम्याची तसदीही त्यांनी घेऊ नये. कुठल्या तुरुंगात जायचेय ते त्यांनी फक्त सांगावे, मी स्वत:हून तेथे जाईन! मी इथेच आहे.तुरुंगात गेल्यावर सर्वप्रथम बंगाली शिकण्याचे काम करीन. मोदींनी आपले वक्तव्य हसण्यावारी नेल्याचे दिसल्यानंतर पुढच्या सभेत ममता बॅनर्जी म्हणाल्या, ते एवढे बोलल्यावर त्यांना तुरंगात टाकणे तेवढे सोपे नाही. केंद्र सरकार माझ्या हातात असते तर मी मोदींच्या मुसक्या आवळून त्यांना रस्त्यातून फरफटत नेले असते! दंगली घडविणार्‍यास पंतप्रधानपदावर बसण्याचा हक्क नाही, अशी डरकाळी फोडत ममता म्हणाल्या, त्यांना तशी संधी मिळेल की नाही यावर आव्हान स्वीकारायला मी तयार आहे. पण मी सांगते की त्यांना ती संधी कधीच मिळणार नाही. काही काळजी करू नका. काही पैसेवाले मोदींना पंतप्रधानपदासाठी गॅस भरलेल्या फुग्यासारखे फुगवीत आहेत. १६ मे रोजी तो गॅसचा फुगा फुटेल व मतपेट्या उघडतील तेव्हा त्यात फक्त दोन फुलेच (तृणमूलचे निवडणूक चिन्ह) दिसतील. याला कृष्णनगर येथील सभेत प्रत्युत्तर देताना मोदी म्हणाले की, बांगलादेशातून येणार्‍या घुसखोरांचा मुद्दा ममतादींनी स्वत:च २००५ मध्ये उपस्थित केला होता. आता तो मी हाती घेतला म्हणून त्या माझ्यावर रागवलेल्या दिसतात. पण खरे तर तुमचे (श्रोत्यांचे) माझ्यावरचे वाढते प्रेम पाहून त्यांचा पारा चढला आहे. त्या माझ्याबद्दल काय बोलतात ते (बंगाली येत नसल्याने) मला कळत नाही. पण दीदी तुमचा प्रत्येक शब्द हा माझ्यासाठी आशिर्वादच आहे! (वृत्तसंस्था)

मोदी गाढव आहेत!

बांगलादेशी घुसखोरांवरून मोदींवर आसूड ओढताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, मोदींच्या मते बांगलादेशातून आलेले सर्वच घुसखोर आहेत. हे ठरविणारे ते कोण? असे विधान करण्याएवढी हिम्मत त्यांच्यात आली तरी कुठून? आता ते मतुआ जमातीबद्दल बोलतात व हे लोक भारताचे नागरिक नसल्याचे सांगतात. ते गाढव आहेत. बंगालचा कोणी अपमान केल्यास मी खपवून घेणार नाही.