शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मोदींची जन्मकुंडली होती, तर सत्तेचा संसार मांडताना ती तपासली का नाही?

By admin | Updated: February 12, 2017 19:40 IST

पंतप्रधान मोदींची जन्मकुंडली शिवसेनेकडे होती तर केंद्रात आणि राज्यात त्यांच्यासोबत सत्तेचा संसार मांडताना ती तपासली का नाही?

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. १२ - पंतप्रधान मोदींची जन्मकुंडली शिवसेनेकडे होती तर केंद्रात आणि राज्यात त्यांच्यासोबत सत्तेचा संसार मांडताना ती तपासली का नाही?, असा खोचक प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.विखे पाटील यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी खुलताबाद आणि कन्नड तालुक्यांचा दौरा केला. या प्रचार दौ-यामध्ये गल्ले बोरगाव आणि चिखलठाण येथे जाहीर सभा करताना त्यांनी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, भाजपा आणि शिवसेनेमधील भांडण म्हणजे केवळ सत्तेसाठी सुरू असलेला संघर्ष आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या अनेक आश्वासनांपासून घेतलेला यू-टर्न पाहता ही एक जुमलेबाज पार्टी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आता लोकंही बीजेपी म्हणजे बडी जुमलेबाज पार्टी असल्याचे बोलू लागले आहेत. अशा लोकविरोधी पक्षाची जन्मकुंडली शिवसेनेकडे होती तर सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी ती तपासून घ्यायला हवी होती.चार दिवसांपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. सध्या सुरू असलेल्या स्वाभिमानाच्या गप्पा लक्षात घेता शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर राजीनामे फेकायला गेले की काय, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु शिवसेनेने राजीनामे न देता शेतकरी कर्जमाफीची मागणी करणे म्हणजे निव्वळ बनवाबनवी होती. राज्यात आचारसंहिता लागू असताना कर्जमाफीचा निर्णय होणे शक्य नाही, हे न समजण्यासाठी जनता दुधखुळी नाही. मागील दोन वर्षांत शेतकरी कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळात गप्प बसणारी शिवसेना आता आचारसंहितेच्या काळात कर्जमाफीची मागणी करते, हा स्टंट नव्हे तर आणखी काय आहे ?, अशी संतप्त विचारणा विरोधी पक्षनेते यांनी केली.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाने तेथील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. परंतु याच भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातील शेतक-यांना दिलेल्या सात-बारा कोरा करण्याच्या आश्वासनाचा विसर पडलेला आहे. मागील दोन वर्षात महाराष्ट्रात सहा हजारांहून अधिक शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या तरी येथील शेतक-यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात भाजप निर्णय घेत नाही. परंतु उत्तर प्रदेशची निवडणूक असल्यामुळे तेथील शेतक-यांना कर्जमाफीचे जाहीर आश्वासन दिले जाते, ही या राज्यातील शेतक-यांची मोठी फसवणूक आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळेल इतका हमीभाव देण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. शेतक-यांना दिलेला तो शब्दही भाजपाने पाळलेला नाही. निवडणूक आली की, मोठ-मोठी आश्वासने देण्याची सवय भाजप शिवसेनेला झाली आहे. बिहारच्या निवडणुकीपूर्वी तेथील मतदारांना प्रभावित करण्यासाठी मोदींनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. परंतु निवडणुकीनंतर भाजप सरकारने आंबेडकरांच्या स्मारकाची एक विटही रचलेली नाही, याकडे विखे पाटील यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी मोदींनी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. हे सुद्धा मतदारांना भुरळ घालण्यासाठी केलेले काम आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्मारकांच्या भूमिपूजनाचे इव्हेंट करण्यासाठी मोदींना वेळ आहे. परंतु महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांना वेळ मिळू नये, हे दुर्दैव असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.