शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

उद्योग न उभारल्यास जमीन परत

By admin | Updated: January 17, 2015 05:34 IST

औद्योगिक वापराकरिता अकृषिक परवानगी घेतल्यानंतर त्या जमिनीवर पाच वर्षांच्या आत उद्योग न उभारल्यास त्या जमिनी परत घेतल्या जातील,

मुंबई : औद्योगिक वापराकरिता अकृषिक परवानगी घेतल्यानंतर त्या जमिनीवर पाच वर्षांच्या आत उद्योग न उभारल्यास त्या जमिनी परत घेतल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत करावयाच्या उपाययोजनांचा आढावा सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, औद्योगिक वापराकरिता अकृषिक परवाना मिळाल्यानंतर पाच वर्षांत उद्योग उभारावा, त्यानंतर पाच वर्षांपर्यंत विलंब झाल्यास संबंधिताकडून दंड वसूल करावा, त्यानंतरही उद्योग उभा न राहिल्यास सदर जमीन शेतकऱ्याला परत करावी किंवा इतर उद्योजकांना ती उपलब्ध करून द्यावी. सेवा क्षेत्राशी संबंधित कामे बाह्यस्रोताद्वारे करण्यात यावीत. राज्यात सुमारे साडेतीन कोटी असंघटित कामगार आहेत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळाची स्थापना करावी, माथाडी कामगार कायद्याच्या तरतुदींचा होणारा गैरवापर थांबावा यासाठी कामगार कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.मेक इन महाराष्ट्रांतर्गत राज्यात १० मोठ्या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. त्यातून ४२८५ रोजगार निर्मिती होईल. येत्या काळात ८ हजार ४५६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून १२ मोठे उद्योग उभे राहणार असून, या माध्यमातून ११ हजार ८०० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पर्यावरण विषयक मंजुरीचे नवे धोरण येत्या तीन महिन्यांत जाहीर केले जाईल, अशी माहिती पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अजय मेहता यांनी दिली. (प्रतिनिधी)