शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

उद्योग न उभारल्यास जमीन परत

By admin | Updated: January 17, 2015 05:34 IST

औद्योगिक वापराकरिता अकृषिक परवानगी घेतल्यानंतर त्या जमिनीवर पाच वर्षांच्या आत उद्योग न उभारल्यास त्या जमिनी परत घेतल्या जातील,

मुंबई : औद्योगिक वापराकरिता अकृषिक परवानगी घेतल्यानंतर त्या जमिनीवर पाच वर्षांच्या आत उद्योग न उभारल्यास त्या जमिनी परत घेतल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत करावयाच्या उपाययोजनांचा आढावा सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, औद्योगिक वापराकरिता अकृषिक परवाना मिळाल्यानंतर पाच वर्षांत उद्योग उभारावा, त्यानंतर पाच वर्षांपर्यंत विलंब झाल्यास संबंधिताकडून दंड वसूल करावा, त्यानंतरही उद्योग उभा न राहिल्यास सदर जमीन शेतकऱ्याला परत करावी किंवा इतर उद्योजकांना ती उपलब्ध करून द्यावी. सेवा क्षेत्राशी संबंधित कामे बाह्यस्रोताद्वारे करण्यात यावीत. राज्यात सुमारे साडेतीन कोटी असंघटित कामगार आहेत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळाची स्थापना करावी, माथाडी कामगार कायद्याच्या तरतुदींचा होणारा गैरवापर थांबावा यासाठी कामगार कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.मेक इन महाराष्ट्रांतर्गत राज्यात १० मोठ्या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. त्यातून ४२८५ रोजगार निर्मिती होईल. येत्या काळात ८ हजार ४५६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून १२ मोठे उद्योग उभे राहणार असून, या माध्यमातून ११ हजार ८०० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पर्यावरण विषयक मंजुरीचे नवे धोरण येत्या तीन महिन्यांत जाहीर केले जाईल, अशी माहिती पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अजय मेहता यांनी दिली. (प्रतिनिधी)