शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

...तर हेपॅटायटिसला लागेल ब्रेक - बच्चन

By admin | Updated: August 2, 2016 02:20 IST

गरोदर महिलांनी बाळंतपणानंतर हेपिटायटिसचे इंजेक्शन घेण्यासाठी जनजागृतीची गरज आहे.

मुंबई : गरोदर महिलांनी बाळंतपणानंतर हेपिटायटिसचे इंजेक्शन घेण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. अंगणवाडी आरोग्य सेविकांनी या महिलांचे प्रबोधन केल्यास ते खूप उपयुक्त ठरेल, असे मत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मातांमधून बाळांना होणाऱ्या हेपिटायटिसच्या लागणीला ब्रेक लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. हेपिटायटिसचे दूत म्हणून कार्यरत असलेल्या अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात ही भावना व्यक्त केली आहे. भारतातून हेपिटायटिसच्या समूळ उच्चांटनासाठी आपले संपूर्ण सहकार्य असेल, आपल्या हाकेला आपण नेहमीच उपलब्ध असू, अशी ठाम ग्वाहीदेखील बच्चन यांनी या वेळी दिली. भारतातून २०२०पर्यंत हेपिटायटिस-सी आणि २०८०पर्यंत हेपिटायटीस बीचे समूळ उच्चाटन करण्याची घोषणा या वेळी करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्यमंत्री अनुप्रिया पटेल, केंद्रीय आरोग्य संचालक डॉ. जगदीश प्रसाद तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींचीही उपस्थिती होती. या वेळी डॉ. अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, हेपिटायटिसची इंजेक्शन तयार करणाऱ्या उत्पादकांची बैठक घेतली आहे. २०१८पर्यंत लागणविरहित हेपिटायटिसची इंजेक्शन निर्मितीचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे ध्येय आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारताला दरवर्षी ४० कोटी हेपिटायटिस बी लस आणि ६ कोटी हेपिटायटिस सी लसींची गरज आहे. भारतात एचआयव्ही आणि मलेरियामुळे मृत्युदर घटला असला तरी हेपिटायटिसमुळे मृत्युदरात वाढ होत असल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)