शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

हृदय रुग्णांना स्वस्तात स्टेंट दिले नाही तर रुग्णालयांवर कारवाई

By admin | Updated: February 17, 2017 19:05 IST

देशात सुमारे सहा कोटी लोकांना हृदयविकार असून दरवर्षी पाच लाख हृदयशस्त्रक्रिया होतात, हे ध्यानात घेऊन केंद्र सरकारने या रुग्णांसाठीच्या स्टेंटच्या किंमती खूप कमी केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - देशात सुमारे सहा कोटी लोकांना हृदयविकार असून दरवर्षी पाच लाख हृदयशस्त्रक्रिया होतात, हे ध्यानात घेऊन केंद्र सरकारने या रुग्णांसाठीच्या स्टेंटच्या किंमती खूप कमी केल्या आहेत. रुग्णालयांनी रुग्णांना स्वस्तात स्टेंट उपलब्ध करून दिले नाहीत तर सरकार या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करेल व त्यांचा परवानाही रद्द करेल, असा इशारा केंद्रीय रसायन व खतमंत्री अनंतकुमार यांनी शुक्रवारी दिला.
अनंतकुमार मुंबई भारतीय जनता पार्टी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार व भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.
अनंतकुमार यांनी सांगितले की, लोकांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारने गेल्या अडीच वर्षात १४५० औषधांच्या किंमती नियंत्रणात आणल्या असून त्यामुळे रुग्णांची पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने हृदय उपचारासाठी गरजेच्या असलेल्या स्टेंटच्या किंमतींवर नियंत्रण आणले आहे. त्यामुळे पंचेचाळीस हजार ते साठ हजार रुपयांना मिळणारा स्टेंट साडेसात हजार रुपयांना मिळेल तर दोन लाख रुपयांचा वेगळ्या प्रकारचा स्टेंट तीस हजार रुपयांना मिळेल. रुग्णालयांनी स्वस्तात स्टेंट उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यांनी स्टेंटची जादा किंमत आकारली तर वाढीव रक्कम वसूल करणे, फौजदारी कारवाई करणे व रुग्णालयाचा परवाना रद्द करणे या उपायांचा अवलंब सरकार करेल.
ते म्हणाले की, स्टेंटची आयात अथवा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांच्या प्रमाणातील आयात अथवा निर्मिती पुढील एक वर्ष चालू ठेवणे आवश्यक आहे. किंमत कमी झाली म्हणून आयात अथवा निर्मिती थांबवली तर त्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल.
राज्यात जनतेला स्वस्तात औषधे मिळावीत यासाठी जेनेरिक औषधांची एक हजार दुकाने सुरू करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी होईल. प्लॅस्टिक उद्योग व रसायन उद्योगाला मोठ्या संख्येने कुशल मनुष्यबळ मिळावे व तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राज्यात प्लॅस्टिक व रसायनशास्त्राच्या प्रगत शिक्षण संस्था सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी होती तशीच भाजपाच्या बाजूची लाट आपल्याला मुंबईत दिसत असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जनता भाजपाला स्पष्ट बहुमताने विजयी करेल.