शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

‘एफआरपी’चे तुकडे पाडाल तर अराजकता

By admin | Updated: October 28, 2015 02:10 IST

कायद्याने शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक असताना, दोन-तीन टप्प्यांत ‘एफआरपी’चे पैसे देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्यता देणार असतील

कोल्हापूर : कायद्याने शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक असताना, दोन-तीन टप्प्यांत ‘एफआरपी’चे पैसे देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्यता देणार असतील, तर राज्यात ऊसदरावरून अराजकता माजेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. कायद्याचे पालन करण्यास सांगणारेच कायदा मोडण्यास निघाले, तर सामान्य माणसाने न्याय कोणाकडे मागायचा? ज्यांना कायद्यात दुरुस्ती करण्याचाही अधिकार नाही, तर मग कायदा बदलणारे देवेंद्र फडणवीस कोण? असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘एफआरपी’चा कायदा हा केंद्रातील तत्कालीन कॉँग्रेस सरकारने केलेला आहे. तो करताना ऊसाच्या भाव गृहीतकावर निश्चित केला जातो. तो बाजारातील साखरेच्या भावाशी निगडित नाही, ही मूलभूत चूक झाली आहे. त्यामुळे या कायद्यात बदल करणे गरजेचे असून, जर साखर कारखान्यांच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन दोन-तीन टप्प्यांत एफआरपी देत असतील तर त्यास हरकत नसल्याचे मत व्यक्त केले होते.ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकरी व कारखानदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणारे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करणे उचित नव्हते. (प्रतिनिधी)