शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

शेतकरी कर्जमुक्त नाही झाला तर राज्यात भूकंप, उद्धव ठाकरेंचा इशारा

By admin | Updated: June 15, 2017 14:37 IST

शेतकरी कर्जमुक्त नाही झाला तर राज्यात भूकंप येईल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे

ऑनलाइन लोकमत
शेगाव, दि. 15 - शेतकरी कर्जमुक्त नाही झाला तर राज्यात भूकंप येईल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. "सरकारने जी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे त्याची अंमलबाजावणी करण्याची ताकद आणि बुद्धी सरकारला देवो अशी प्रार्थना करतो", असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. तसंच कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे मनसुबे पुर्ण होऊ देणार नाही असंही बोलले आहेत. शेगावमधील पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. 
 
"आपला कृषीप्रधान देश आहे, मात्र शेतक-यांना सर्वात तुच्छतेची वागणूक दिली जाते", अशी खंत यावेळी उद्दव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.  "देशभरात शेतक-यांचा जो उद्रेक दिसतोय ती ठिणगी महाराष्ट्रात पडल्याचा आनंद", असल्याचं उद्धव ठाकरे बोलले आहेत. "साले" म्हणणाऱ्यांना शेतकरी रडवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंसहित शेतक-यांवर टीका करणा-यांना टोला हाणला आहे. "आंदोलन पेटण्यापूर्वी सरकारने निर्णय घेतला याचा आनंद आहे. सत्तेत असतानाही आम्ही विरोधात उभे राहिलो", असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. 
 
"शेतक-यांनो तुम्ही दुबळे आहोत असं समजू नका, एकजुटीला तडा देऊ नका नाहीतर हाताशी आलेला घास निघून जाईल", असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. तसंच शिवसेना तसा तो जाऊ देणार नाही असंही ठणकावून सांगितलं. "शेतकरी कर्जमाफी करताना असे निकष ठरवू नका ज्यामुळे शेतक-याला काहीच लाभ मिळणार नाही", असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी तयार असल्याचं वक्तव्य केल्याच्या प्रश्नावर बोलताना "मुख्यमंत्र्यांना शेतकरी कर्जाचा विषय बाजूला ठेवायचा असल्याने मध्यावधी निवडणुकांचा विषय काढला असावा", असा टोला हाणला. "एवढा पैसा असेल तर तो शेतक-यांना द्या. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत तुमचे मनसुबे पुर्ण होऊ देणार नाही", असा इशाराचा मुख्यमंत्र्यांना दिला आहे,