शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

...तर लोकशाही टिकणार नाही, जावेद अख्तर : दाभोलकर स्मृतीदिनानिमित्त निषेध जागर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 04:38 IST

परिवर्तनवाद्यांना मागे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. इतरांचे चूक आणि आपले बरोबर, अशी धारणा असेल तर लोकशाही टिकू शकत नाही. हवेत विष पेरले की ते प्रत्येक श्वासात भिनते; तसे समाजात वाईट संस्कार पेरले जात आहेत.

पुणे : परिवर्तनवाद्यांना मागे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. इतरांचे चूक आणि आपले बरोबर, अशी धारणा असेल तर लोकशाही टिकू शकत नाही. हवेत विष पेरले की ते प्रत्येक श्वासात भिनते; तसे समाजात वाईट संस्कार पेरले जात आहेत. अभिव्यक्तीवर बंधने घातली जात आहेत. धर्माच्या आडून सत्ता राबवू पाहणाऱ्यानी प्रश्न विचारण्याचा हक्क हिरावून घेतला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी, लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी सद्यस्थितीवर टिप्पणी केली.डॉ. दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निषेध जागराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जावेद अख्तर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, शैला दाभोलकर हे उपस्थित होते. आमचा आवाज, हाच देशाचा आवाज आहे, असे कोणी म्हणू लागले तर आपण सावध व्हायला हवे, असे ते म्हणाले.डॉक्टर गेल्यावर चळवळीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, ज्ञानाची शिदोरी घेऊन प्रत्येक जण चळवळीत सहभागी झाला. डॉक्टरांनी कायम विवेकवादाचा नकाशा डोळ्यांंसमोर ठेवला. त्यांना अनेकांनी साथ दिली. मला त्यांचा ४२ वर्षांचा सहवास लाभला. हाच आनंद सोबत घेऊन मी पुढे काम करत राहणार आहे. - शैला दाभोलकरआज जग बदलले आहे, विज्ञान-तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. मात्र, समाजावरचा धार्मिक बाबींचा पगडा कमी झालेला नाही. धर्म हा लालसा आणि भीती या दोन बाबींवर चालतो. तो प्रश्न विचारण्याची मुभा देत नाही. श्रद्धा असेल तर सर्वधर्म मानायला काय हरकत आहे, असा सवालही अख्तर यांनी केला.मुसळधार पावसात ‘जबाब दो’ आंदोलनडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे रविवारी सकाळी मुसळधार पावसात निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ. दाभोलकर यांच्यासह कॉ. गोविंद पानसरे व प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्याना कधी पकडणार याची विचारणा करणाºया घोषणा देत ‘जबाब दो’चा पुकार यात करण्यात आला.भर पावसामध्ये छत्र्या, रेनकोट घेऊन मोठया संख्येने कार्यकर्ते मोर्चासाठी आले होते. सकाळी साडेसात वाजता महर्षी शिंदे पुलावरून मोर्चाला सुरूवात झाली. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढावा, कॉ. मुक्ता मनोहर, अंनिसचे सरचिटणीस हमीद दाभोलकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, रंगकर्मी अतुल पेठे, प्रधान सचिव मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर यांच्यासह अनेक मान्यवर मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.साताऱ्याच्या सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या चौकशी अहवालात गंभीर आणि धक्कादायक निरीक्षणे नोंदविल्याने अंनिसच्या घोटाळ्याची तीव्र्रता व सत्यता सिद्ध झाली आहे. त्यामुळे अंनिस आणि डॉ. हमीद दाभोलकर यांचे पितळ उघडे पडले असून इतरांना ‘जवाब दो’ म्हणणाºया तथाकथित विवेकवाद्यांनी राज्याच्या जनतेला जवाब द्यायला हवा, असे मत प्रवक्ते अभय वर्तक यांनी व्यक्त केले. अंनिसची नोंदणी रद्द करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने आंदोलन केले.