शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

वर्षभरात कर्ज घटले तर राजकारण सोडेन!

By admin | Updated: December 9, 2015 01:21 IST

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात सर्वात सक्षम आहे. राज्याची ताकद आहे म्हणूनच कर्ज मिळते. राज्यांना उत्पन्नाच्या २४ टक्केपर्यत कर्ज घेता येते.

नागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात सर्वात सक्षम आहे. राज्याची ताकद आहे म्हणूनच कर्ज मिळते. राज्यांना उत्पन्नाच्या २४ टक्केपर्यत कर्ज घेता येते. राज्य सरकारवर १९ टक्के कर्ज आहे. परंतु या बाबतीत केंद्र सरकारचा विचार करता टक्केवारीच्या तुलनेत राज्यावरील कर्ज कमीच आहे. भाजप -शिवसेना युती सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात राज्याच्या डोक्यावरील कर्ज एक रुपयाने जरी कमी झाले असेल तर मी राजकारण सोडेन, असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी युती सरकारला मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. तुमच्याच कार्यकाळात कर्ज वाढल्याचा विरोधकांचा आरोप असल्याबाबत विचारणा करता चव्हाण म्हणाले, सरकार कुणाचेही असो, कर्ज काढावेच लागते. त्यामुळे काँॅॅग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्याच्या डोक्यावर कर्ज वाढल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोपच चुकीचा आहे. सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी) रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु यामुळे राज्यातील महापालिकांचे ७५०० कोटीचे उत्पन्न बुडाले. हा निर्णय घेताना एलबीटीच्या बदल्यात पर्यायी उत्पन्नाचे स्रोत देण्यात आले नाही. यामुळे आर्थिक स्थिती बिकट झाल्याने महापालिकांपुढे कर्मचाऱ्यांना वेतन कसे द्यावे, असा प्रश्न उभा ठाकला आहे.