शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू तर पत्नीचा भूकबळी !

By admin | Updated: June 9, 2014 03:13 IST

पोटची मुले सोडून गेल्यानंतर आयुष्याची अखेर एकाकीपणे जगत असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा हृदयद्रावक मृत्यू झाला.

नागपूर : पोटची मुले सोडून गेल्यानंतर आयुष्याची अखेर एकाकीपणे जगत असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा हृदयद्रावक मृत्यू झाला. वृद्धाचा उष्माघाताने तर पत्नीचा भूकबळी गेला, असा पोलिसांचा संशय आहे. वृद्धेचा भूक आणि तहान असह्य होऊन मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर वसाहतीत ही घटना उघडकीस आली.रशीद मोहंमद नजीर मोहंमद (६२) आणि त्यांची पत्नी बिल्किस बानो रशीद मोहंमद (६१) असे या दुर्दैवी वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. ते गेल्या दोन-तीन महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहात होते. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात दुर्गंधी सुटल्याने शेजाऱ्यांनी शनिवारी गिट्टीखदान पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी दार उघडताच वृद्ध दाम्पत्याचे मृतदेहच त्यांना दिसले. प्राप्त माहितीनुसार रशीद मोहंमद हे पूर्वी ट्रकचालक होते. तेच कुटुंबाचा एकमेव आधार होते. बिल्किस बानो या दोन्ही डोळ्यांनी आंधळ््या होत्या. दोन मुलांपैकी एक ट्रकचालक तर दुसरा खासगी कंपनीत नोकरी करतो. दोघेही विवाहित आहेत. लहान मुलगा आठ-दहा दिवसांतून एकदा या दाम्पत्याला केवळ पाहून जात होता. चार-पाच दिवसांपूर्वीच वृद्ध रशीद मोहंमद यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. अन्नपाणी देणाराच गेल्याने भूक आणि तहानेने व्याकूळ होऊन वृद्ध बिल्किस बानो हिचाही मृत्यू झाला असावा, असे पोलिसांचे मत आहे. शवविच्छेदनानंतरच या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूचा उलगडा होईल.