शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

खैरेंवर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन

By admin | Updated: November 2, 2015 03:13 IST

खा.चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात महसूल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वाळूज एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली आहे. अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला नसल्यामुळे सोमवारी

औरंगाबाद : खा.चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात महसूल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वाळूज एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली आहे. अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला नसल्यामुळे सोमवारी महसूल प्रशासनाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय अधिकारी व कर्मचारी संघटनांनी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास मराठवाड्यात आंदोलन करून संपावर जाण्याचा इशारा संघटनांनी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. शनिवारी अहमदनगर तसेच औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयांत द्वारसभा घेऊन कर्मचारी संघटनांनी खा.खैरे यांनी तहसीलदार रमेश मुंडलोड यांना शिवीगाळ करण्याच्या घटनेचा निषेध केला. औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्तालयापर्यंत मोर्चाही काढून डॉ.उमाकांत दांगट यांना निवेदन दिले. ‘लिफ्ट’ मिळविण्याचा प्रयत्न वाळूज येथील धार्मिक स्थळे हटविण्याच्या कारवाईत त्यांनी पोलीस व महसूल प्रशासनावर आगपाखड केली. शिवाय तहसीलदारांना शिवीगाळही केली. हिंदुत्वाच्या मुद्यावर महाभारत घडले असतानाही शिवसेनेतील एकही आमदार, संघटनेचा प्रतिनिधी खैरे यांच्या समर्थनार्थ पुढे आलेला नाही. पालकमंत्र्यांच्या गटातील कुणीही खैरे यांना या प्रकरणात ‘लिफ्ट’ दिलेली नाही. खैरे सध्या अडगळीला आहेत. वाळूज, बजाजनगरच्या प्रकरणात जर त्यांना पुन्हा ‘लिफ्ट’ मिळाली तर ते पुन्हा आपल्या मानगुटीवर बसतील, अशी भीती उर्वरितांना असल्याची चर्चा आहे.भाजपाची कोंडी...भाजपाने बजाजनगर प्रकरणात खैरेंच्या निषेधाची भूमिका घेतली, तर दुसरीकडे पाडापाडी झालेल्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पाहणी केली. मुळात भाजपाची या प्रकरणात कोंडी झाली आहे. खैरे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या विरोधात भाषण केल्यामुळे भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर वगळता पक्षातून या प्रकरणावर कुणीही बोलले नाही. पश्चिम मतदारसंघातून भाजपाला नेतृत्व नाही. त्यामुळे पक्षाने याप्रकरणी खैरेंचा निषेध करून प्रकरण थांबविले. शिवाय खैरे मोठे होतील, या भीतीनेदेखील कुणी पुढे आले नसल्याची चर्चा आहे. पोलिसांची गोचीपोलिसांची सध्या गोची झाली आहे. चार दिवसांपूर्वी प्रकरण घडले आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलीस ठाण्यात महसूल विभागातील सर्व संघटनांनी फिर्याद दिली आहे. परंतु पोलिसांनी फक्त तक्रार नोंदवून घेतली आहे. खैरे यांनी न्यायालयाची बेअदबी केली आहे की नाही, याचा अहवाल न्यायालयाने मागविल्याचे समजते. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली मनपा निवडणूक मतदानामुळे रविवारी सायंकाळपर्यंत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी विलंब के ल्याचे बोलले जात असले तरी पोलिसांची गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत गोची झाल्याचे दिसते आहे.