शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: April 4, 2016 14:21 IST

मुख्यमंत्र्यांनी 'भारत माता की जय' वक्तव्यावर ठाम राहत खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही असं विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ४ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये 'भारत माता की जय' बोलण्यावरुन केलेल्या वक्तव्यावरुन विरोधकांनी विधानसभेत गदारोळ घालत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम राहत खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही असं विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे. 
 
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधक जाणूनबुजून गोंधळ घालत आहेत, मतांचं राजकारण करत आहेत असा आरोप केला आहे. मुख्यमंत्री पद असो किंवा नसो 'भारत माता की जय' बोलावेच लागेल. 'भारत माता की जय' कालदेखील म्हंटलं होतं आजही म्हणू असंदेखील मुख्यमंत्री बोलले आहेत. 
 
पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना आरएसएस कार्यकर्ता म्हणून बोललात की, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून असा खोचक सवालही यावेळी विचारला. मी जाती धर्मावर बोललेलो नाही, देशाबद्द्ल बोललेलो आहे. ज्या लोकांचं देशावर प्रेम नाही, जे लोक मुद्दामुन वाद वाढवत आहेत त्यांना उद्देशून बोललो असल्यांच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये बोलताना 'भारत माता की जय बोलण्यास नकार देणा-यांना देशात राहण्याचा हक्क नसल्याचं' केलेल्या वक्तव्यावरुनदेखील वाद निर्माण झाला होता. मात्र माध्यमांनी सोयीस्करपणे केवळ ‘भारतमाता की जय’बाबतचा काही भाग उचलून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात ४५ मिनिटे राज्यातील दुष्काळ आणि विकास कामांबद्दल बोललो. तर अवघी ५ मिनिटे ‘भारतमाता की जय’ आणि शनी शिंगणापूर वादाबद्दल मत मांडले. मात्र माध्यमांनी सोयीस्करपणे केवळ ‘भारतमाता की जय’बाबतचा काही भाग उचलून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला होता.