शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
4
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
6
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
7
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
8
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
9
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
10
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
11
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
12
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
13
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
14
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
15
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
16
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
17
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
18
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
19
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
20
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

भाताला यंदा ६० रुपये अधिक भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2016 02:39 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाताला (तांदूळ) ६० रुपये अधिक हमी भाव शासनाने दिला असून यंदा प्रति क्विंटल अ-श्रेणीतील भाताला १५१० रुपये तर सर्वसाधारण भाताला १४७० रुपये हमी भाव निश्चित करण्यात आला आहे.

जयंत धुळप, अलिबाग गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाताला (तांदूळ) ६० रुपये अधिक हमी भाव शासनाने दिला असून यंदा प्रति क्विंटल अ-श्रेणीतील भाताला १५१० रुपये तर सर्वसाधारण भाताला १४७० रुपये हमी भाव निश्चित करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांतच जिल्ह्यात विविध ठिकाणी शासनाच्या माध्यमातून भात खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा पणन अधिकारी बी.आर.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.गतवर्षी रायगड जिल्ह्यात एकूण ५५ हजार ६१२ क्विंटल भात खरेदी झाली होती. यंदा त्यात विक्रमी वाढ होणार असून यंदा सुमारे ४ लाख क्विंटल भात खरेदी होणे अपेक्षित असून यंदा आॅनलाइन पद्धतीने भात खरेदी करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०१६-१७ मध्ये मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांनी नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था जिल्हा मार्केटिंग संस्था रायगड यांच्यामार्फत जिल्ह्यातील खालापूर, महाड, पनवेल, सुधागड तालुक्यातील मंजूर केंद्रावर भात खरेदी सुरु करण्यात येणार आहे. खरीप पणन हंगाम कालावधीत २४ आॅक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ तर रब्बी पणन हंगाम कालावधी १ मे ते ३० जून २०१७ असा राहाणार आहे. भात खरेदीच्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीचा ७/१२ चा उतारा आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान वा भरडधान्य खरेदी करण्यात येईल. या धानाची खरेदी ही आॅनलाइन पध्दतीने होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.