शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

जागा वाटप सन्मानाने न झाल्यास विधानसभा निवडणूक स्वबळावर !

By admin | Updated: August 4, 2014 20:34 IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

अकोला : लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी कॉँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सन्मानजनक जागा वाटप न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी अकोल्यात आयोजित निर्धार मेळाव्यात दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) जयदत्त क्षीरसागर, अमरावती विभागाचे प्रभारी आ. ख्वाजा बेग आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करीत शेतमालावरील आधारभूत किंमत अत्यल्प वाढविले असल्याचे सांगितले. मोदी सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला असून, या फसवेगिरीला जनता उत्तर देईल. भाजप नेते ह्यखोटं बोलावं पण रेटून बोलावं,ह्ण या उक्तीप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ५ रुपयात मुंबईत जेवण मिळत असल्याच्या वक्तव्याचा समाचारही पवार यांनी घेतला. जनतेने दिलासा मिळावा, यासाठी मोदी सरकार निवडून दिले. मात्र देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच असून, पेट्रोल, डिझेल, सिमेंट, खते, बियाणे यांचेही भाव गगनाला भिडत आहेत. १९७७ मध्ये इंदिरा गांधीचे सरकार भुईसपाट झाले. मात्र, नंतर लगेच १९८0 मध्ये पुन्हा इंदिरा गांधी यांनी सरकार स्थापन केले, याची आठवणही पवार यांनी करून दिली. विहिंपचे प्रवीण तोगडिया यासारखे नेते भावना भडकविण्याचे काम करीत असून, सरकार समाजात फूट पाडत असल्याचा आरोप पवार यांनी केला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ह्यरोजाह्ण तोडल्याच्या कथित घटनेचाही पवार यांनी समाचार घेतला. प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा आदर करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने ह्यआपह्णचा दिल्लीतच नव्हे तर महाराष्ट्रातही दारुण पराभव झाला, असेही ते म्हणाले.