शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदे आधीच मागे घेतले असते तर ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला नसता - प्रवीण तोगडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 17:06 IST

Pravin Togdiya Slams Central Government : प्रायश्चित्त करायचे असेल तर मृतक शेतकऱ्यांच्या परिवाराला एक कोटी रुपये मदत द्यावी, असे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी स्पष्ट केले.

बुलडाणा : मुस्लीम स्त्रियांच्या सन्मानासाठी कायदे केले जातात, सोबतच ज्यांनी देशावर आक्रमण केले त्याचा फोटो अफगाणिस्तानातील संसदेत लावण्यासाठी ५०० कोटी दिले जातात; मात्र कृषी कायद्याविरोधात आंदोलन बळी गेलेल्या ७०० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत दिली जात नाही, असे परखड मत व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कृषी कायदे परत घेतल्याबद्दल अभिनंदन. पण हेच पाऊल १० महिन्याआधी उचलले असते तर ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला नसता. याचे प्रायश्चित्त करायचे असेल तर मृतक शेतकऱ्यांच्या परिवाराला एक कोटी रुपये मदत द्यावी, असे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी स्पष्ट केले.

बुधवारी बुलडाण्यातील एका मंगल कार्यालयात ८ डिसेंबर रोजी आयोजित हिंदू मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका व्यक्त केली. कृषी कायदे लवकर परत घेतले असते तर ७०० आया-बहिणींच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले नसते. म्हणून या परिवारांना केवळ ७०० कोटींची मदत देणे खूप काही कठीण नाही. मोदी सरकारने त्यांना तत्काळ मदत करावी, अशी आग्रही मागणी सुद्धा तोगडिया यांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांना आणि सैनिकांना दगडं मारणारे खरे देशविरोधी आहेत. पोलीस यंत्रणा ही देशाचा सन्मान आहे. त्यांचा मान राखलाच पाहिजे. तर आतापर्यंत हिंदूंनी कधीच पोलिसांचा अपमान केला नसल्याचेही ते सांगायला विसरले नाहीत. सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम अदा न करता ते धार्मिकस्थळातच केले जावे असे वक्तव्यही त्यांनी केले.

शिवसेना खरी देशभक्तयावेळी हिंदू म्हणजे अफाट आहे. मग तो कोणत्याही पक्षातील असो. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षातील नेते, कार्यकर्ते जे कोणी हिंदू असतील ते माझेच आहेत. तर शिवसेना कोणाही सोबत जावो ते खरे हिंदू आणि राष्ट्रभक्तच आहेत. कारण त्यांच्या पूर्वजांनी कधीच तुष्टीकरणाचे समर्थन केले नाही. तेव्हा शिवसेना हा पक्ष खरा राष्ट्रभक्त आहे; मात्र अभिनेत्री कंगना रनौत संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

टॅग्स :Politicsराजकारणbuldhanaबुलडाणा