शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

आयडॉलमध्ये मराठी भाषा दिन साजरा

By admin | Updated: February 28, 2017 02:24 IST

बदलत्या काळानुसार भाषांमध्येही बदल होताना दिसत आहेत.

मुंबई : बदलत्या काळानुसार भाषांमध्येही बदल होताना दिसत आहेत. व्यवसाय-उद्योगधंदा, कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये बोली भाषेपेक्षा प्रमाण भाषेचा वापर वाढत असून बोली भाषेचा वापर कमी होत आहे. बोली भाषेचा वापर करणारी लोक गावंढळ समजली जात असल्याने त्याचा वापर टाळला जातो. हीच प्रथा पुढच्या काही वर्षांत रूढ झाल्यास बोली भाषा नष्ट होईल. बोली भाषा टिकवण्यासाठी साहित्य निर्मितीत बोली भाषा वापरली जाणे आणि लोकांनी बोली भाषेचा उपयोग करणे आवश्यक असल्याचे मत लेखक महेश लीला पंडित यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) ‘मराठी भाषा दिना’निमित्त आयोजित केलेल्या ‘अनुवादाचे मोती मराठीत’ या अनुभव कथनाच्या कार्यक्रमात पंडित बोलत होते. पंडित पुढे म्हणाले, भाषेचे जेवढे जास्त प्रोटोटाइप असतील तेवढी तुमची भाषा प्रगल्भ असते. बोली भाषेमध्ये प्रमाण भाषेची सरमिसळ झाली आहे. यामुळे बोली भाषेची कत्तल होत आहे. त्यावर प्रमाण भाषेचे आक्रमण होत आहे. कोणत्याही प्रमाण भाषेच्या अगोदर बोली भाषा असते. म्हणून बोली भाषा वाचणे महत्त्वाचे आहे. आयडॉलच्या संचालिका व अनुवादिका डॉ. अंबुजा साळगावकर यांनी सांगितले की, अनुवाद म्हणजे शब्दापुढे शब्द नसतात, ते मनाला भावले पाहिजे. सर्वसामान्यांच्या भाषेत ते लिहिणे आवश्यक असते. या वेळी रुडयार्ड किपलिंग, विद्यापीठ गीत, अ‍ॅलेक्स इन वंडरलँड, रवींद्रनाथ टागोर, एपीजे अब्दुल कलाम अशा त्यांनी केलेल्या विविध अनुवादासंबंधीची माहिती दिली .याप्रसंगी छायाचित्रकार प्रकाश कदम म्हणाले, मराठीत बोला, मराठीत संवाद साधा असे सांगून मराठी पाऊल पडते पुढे ऐवजी मराठी पाऊल पडते मागे अशी आज अवस्था असू ही खंताची बाब आहे़ (प्रतिनिधी)