शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

आयडॉलमध्ये मराठी भाषा दिन साजरा

By admin | Updated: February 28, 2017 02:24 IST

बदलत्या काळानुसार भाषांमध्येही बदल होताना दिसत आहेत.

मुंबई : बदलत्या काळानुसार भाषांमध्येही बदल होताना दिसत आहेत. व्यवसाय-उद्योगधंदा, कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये बोली भाषेपेक्षा प्रमाण भाषेचा वापर वाढत असून बोली भाषेचा वापर कमी होत आहे. बोली भाषेचा वापर करणारी लोक गावंढळ समजली जात असल्याने त्याचा वापर टाळला जातो. हीच प्रथा पुढच्या काही वर्षांत रूढ झाल्यास बोली भाषा नष्ट होईल. बोली भाषा टिकवण्यासाठी साहित्य निर्मितीत बोली भाषा वापरली जाणे आणि लोकांनी बोली भाषेचा उपयोग करणे आवश्यक असल्याचे मत लेखक महेश लीला पंडित यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) ‘मराठी भाषा दिना’निमित्त आयोजित केलेल्या ‘अनुवादाचे मोती मराठीत’ या अनुभव कथनाच्या कार्यक्रमात पंडित बोलत होते. पंडित पुढे म्हणाले, भाषेचे जेवढे जास्त प्रोटोटाइप असतील तेवढी तुमची भाषा प्रगल्भ असते. बोली भाषेमध्ये प्रमाण भाषेची सरमिसळ झाली आहे. यामुळे बोली भाषेची कत्तल होत आहे. त्यावर प्रमाण भाषेचे आक्रमण होत आहे. कोणत्याही प्रमाण भाषेच्या अगोदर बोली भाषा असते. म्हणून बोली भाषा वाचणे महत्त्वाचे आहे. आयडॉलच्या संचालिका व अनुवादिका डॉ. अंबुजा साळगावकर यांनी सांगितले की, अनुवाद म्हणजे शब्दापुढे शब्द नसतात, ते मनाला भावले पाहिजे. सर्वसामान्यांच्या भाषेत ते लिहिणे आवश्यक असते. या वेळी रुडयार्ड किपलिंग, विद्यापीठ गीत, अ‍ॅलेक्स इन वंडरलँड, रवींद्रनाथ टागोर, एपीजे अब्दुल कलाम अशा त्यांनी केलेल्या विविध अनुवादासंबंधीची माहिती दिली .याप्रसंगी छायाचित्रकार प्रकाश कदम म्हणाले, मराठीत बोला, मराठीत संवाद साधा असे सांगून मराठी पाऊल पडते पुढे ऐवजी मराठी पाऊल पडते मागे अशी आज अवस्था असू ही खंताची बाब आहे़ (प्रतिनिधी)