शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

जवानांच्या कोर्सेसबाबत होणार विचार

By admin | Updated: May 2, 2016 01:05 IST

नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनदेखील राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानांच्या माथी २८ ते ३२ कोर्सेस मारले जातात. या कोर्सेसच्या नावाखाली जवानांच्या होत

मुंबई : नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनदेखील राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानांच्या माथी २८ ते ३२ कोर्सेस मारले जातात. या कोर्सेसच्या नावाखाली जवानांच्या होत असलेल्या कोंडीबाबत ‘लोकमत’मध्ये वाचा फोडण्यात आली. त्यात जवानांच्या साप्ताहिक सुटीबरोबरच त्यांच्या अतिरिक्त कोर्सेसबाबतचा अभिप्राय १६ गटांतील समादेशकांकडून मागविण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी हे आदेश दिले आहेत. पुण्यातील दौंड येथे राज्य राखीव पोलीस दलाचे एकमेव नानवीज प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रातून नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनदेखील जवानांना कामादरम्यान प्रत्येकी एक ते दोन महिने कालावधीचे २८ ते ३२ कोर्समुळे त्यांच्या नाकीनऊ येत आहे. नऊ महिन्यांत जे काही शिकवले जाते त्याचाच अधिकांश भाग या कोर्सेसमध्ये असतो. तरीही हे कोर्सेस बळजबरीने त्यांच्याकडून करून घेतले जातात. याचा परिणाम त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्यांबरोबर जिल्हा बदलीवरही होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने २४ आणि २५ एप्रिलच्या अंकात ‘जवानांचीच छळछावणी’द्वारे जवानांची व्यथा मांडली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जवानांनी आपल्या व्यथा मांडून वरिष्ठांच्या सुरू असलेल्या कारभाराबाबत खंत व्यक्त केली. अनेकदा जवानांच्या तक्रारी ऐकण्यासाठी भरलेल्या दरबारात वरिष्ठांचा कौतुक सोहळाच पार पडतो. अशात त्यांच्या मागण्या दुर्लक्षितच राहत असत. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने जवानांची दखल घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या साप्ताहिक सुटीबरोबर प्रशिक्षण केंद्रात सुरू असलेले कोर्सेस सुरू ठेवायचे की नाही याबाबत १६ गटांतील समादेशकांडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी हे आदेश दिले आहेत. समादेशकांनी सर्व गटांतील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे संमेलन घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात; शिवाय त्यांचे विचार, मागण्या या अहवालात नमूद करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)कोर्सेसबाबत १६ गटांतील समादेशकांडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य राखील पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी हे आदेश दिले आहेत. एसआरपीएफच्या जवानांच्या प्रश्नांबाबत ‘कोर्सेसच्या नावाखाली जवानांची गळचेपी’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते.