शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जवानांच्या कोर्सेसबाबत होणार विचार

By admin | Updated: May 2, 2016 01:05 IST

नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनदेखील राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानांच्या माथी २८ ते ३२ कोर्सेस मारले जातात. या कोर्सेसच्या नावाखाली जवानांच्या होत

मुंबई : नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनदेखील राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानांच्या माथी २८ ते ३२ कोर्सेस मारले जातात. या कोर्सेसच्या नावाखाली जवानांच्या होत असलेल्या कोंडीबाबत ‘लोकमत’मध्ये वाचा फोडण्यात आली. त्यात जवानांच्या साप्ताहिक सुटीबरोबरच त्यांच्या अतिरिक्त कोर्सेसबाबतचा अभिप्राय १६ गटांतील समादेशकांकडून मागविण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी हे आदेश दिले आहेत. पुण्यातील दौंड येथे राज्य राखीव पोलीस दलाचे एकमेव नानवीज प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रातून नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनदेखील जवानांना कामादरम्यान प्रत्येकी एक ते दोन महिने कालावधीचे २८ ते ३२ कोर्समुळे त्यांच्या नाकीनऊ येत आहे. नऊ महिन्यांत जे काही शिकवले जाते त्याचाच अधिकांश भाग या कोर्सेसमध्ये असतो. तरीही हे कोर्सेस बळजबरीने त्यांच्याकडून करून घेतले जातात. याचा परिणाम त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्यांबरोबर जिल्हा बदलीवरही होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने २४ आणि २५ एप्रिलच्या अंकात ‘जवानांचीच छळछावणी’द्वारे जवानांची व्यथा मांडली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जवानांनी आपल्या व्यथा मांडून वरिष्ठांच्या सुरू असलेल्या कारभाराबाबत खंत व्यक्त केली. अनेकदा जवानांच्या तक्रारी ऐकण्यासाठी भरलेल्या दरबारात वरिष्ठांचा कौतुक सोहळाच पार पडतो. अशात त्यांच्या मागण्या दुर्लक्षितच राहत असत. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने जवानांची दखल घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या साप्ताहिक सुटीबरोबर प्रशिक्षण केंद्रात सुरू असलेले कोर्सेस सुरू ठेवायचे की नाही याबाबत १६ गटांतील समादेशकांडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी हे आदेश दिले आहेत. समादेशकांनी सर्व गटांतील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे संमेलन घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात; शिवाय त्यांचे विचार, मागण्या या अहवालात नमूद करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)कोर्सेसबाबत १६ गटांतील समादेशकांडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य राखील पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी हे आदेश दिले आहेत. एसआरपीएफच्या जवानांच्या प्रश्नांबाबत ‘कोर्सेसच्या नावाखाली जवानांची गळचेपी’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते.