शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
2
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
3
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
5
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
6
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
7
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
8
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
9
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
10
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
11
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
12
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
13
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
14
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
15
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
16
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
17
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
18
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
19
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
20
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना

जवानांच्या कोर्सेसबाबत होणार विचार

By admin | Updated: May 2, 2016 01:05 IST

नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनदेखील राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानांच्या माथी २८ ते ३२ कोर्सेस मारले जातात. या कोर्सेसच्या नावाखाली जवानांच्या होत

मुंबई : नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनदेखील राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानांच्या माथी २८ ते ३२ कोर्सेस मारले जातात. या कोर्सेसच्या नावाखाली जवानांच्या होत असलेल्या कोंडीबाबत ‘लोकमत’मध्ये वाचा फोडण्यात आली. त्यात जवानांच्या साप्ताहिक सुटीबरोबरच त्यांच्या अतिरिक्त कोर्सेसबाबतचा अभिप्राय १६ गटांतील समादेशकांकडून मागविण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी हे आदेश दिले आहेत. पुण्यातील दौंड येथे राज्य राखीव पोलीस दलाचे एकमेव नानवीज प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रातून नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनदेखील जवानांना कामादरम्यान प्रत्येकी एक ते दोन महिने कालावधीचे २८ ते ३२ कोर्समुळे त्यांच्या नाकीनऊ येत आहे. नऊ महिन्यांत जे काही शिकवले जाते त्याचाच अधिकांश भाग या कोर्सेसमध्ये असतो. तरीही हे कोर्सेस बळजबरीने त्यांच्याकडून करून घेतले जातात. याचा परिणाम त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्यांबरोबर जिल्हा बदलीवरही होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने २४ आणि २५ एप्रिलच्या अंकात ‘जवानांचीच छळछावणी’द्वारे जवानांची व्यथा मांडली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जवानांनी आपल्या व्यथा मांडून वरिष्ठांच्या सुरू असलेल्या कारभाराबाबत खंत व्यक्त केली. अनेकदा जवानांच्या तक्रारी ऐकण्यासाठी भरलेल्या दरबारात वरिष्ठांचा कौतुक सोहळाच पार पडतो. अशात त्यांच्या मागण्या दुर्लक्षितच राहत असत. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने जवानांची दखल घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या साप्ताहिक सुटीबरोबर प्रशिक्षण केंद्रात सुरू असलेले कोर्सेस सुरू ठेवायचे की नाही याबाबत १६ गटांतील समादेशकांडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी हे आदेश दिले आहेत. समादेशकांनी सर्व गटांतील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे संमेलन घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात; शिवाय त्यांचे विचार, मागण्या या अहवालात नमूद करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)कोर्सेसबाबत १६ गटांतील समादेशकांडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य राखील पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी हे आदेश दिले आहेत. एसआरपीएफच्या जवानांच्या प्रश्नांबाबत ‘कोर्सेसच्या नावाखाली जवानांची गळचेपी’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते.