शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

परीक्षा प्राधिकरण स्थापण्याचा विचार

By admin | Updated: December 4, 2014 23:46 IST

विनोद तावडे : कुलगुरूंनी गुणवत्तेवर भर द्यावा

कोल्हापूर : राज्यातील विद्यापीठांवर परीक्षांचा ताण अधिक असून, तो कमी करण्याबाबत परीक्षांचे प्राधिकरण स्थापन करण्याचा विचार आहे. त्याबाबत प्राथमिक स्वरूपात राज्यपालांसमवेत चर्चा झाली आहे. हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये याबाबत कुलगुरू, प्र-कुलगुरूंची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविणार आहोत. कुलगुरूंचा योग्य मान राखला जाईल. त्यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीवर भर द्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज, गुरुवारी येथे केले. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री तावडे यांनी शिवाजी विद्यापीठातील अधिकारी, व्यवस्थापन व विद्या परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, विभागीय शिक्षण सहसंचालक आर. एन. कांबळे, आमदार अमल महाडिक प्रमुख उपस्थित होते.मंत्री तावडे म्हणाले, विद्यापीठासाठी कुलगुरूंनी राजकारण्यांच्या दारात, मंत्रालयात हेलपाटे मारू नयेत. तसे होणे शैक्षणिक गुणवत्तावाढीला मारक ठरणारे आहे. कुलगुरूंचा योग्य मान राखला जाईल. त्यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीवर भर द्यावा. ज्याप्रमाणे काही लोकांना पंढरीच्या वारीला जाता येत नाही; पण ते वारी येण्यापूर्वी आणि गेल्यानंतर रस्त्यांची स्वच्छता, अडथळे दूर करतात. शैक्षणिक विकासातील अडथळे दूर करण्याची सरकारची भूमिका आहे. मंत्रालयातील अधिकारी प्राध्यापकांच्या वेतनावर खर्च होणारे २९ हजार कोटी रुपये खर्च म्हणून दाखवितात. मात्र, तो खर्च नसून प्राध्यापकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठीची केलेली गुंतवणूक आहे. विद्यापीठांमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून ती समाजाच्या समोर आली पाहिजे. त्यासाठी प्राध्यापकांनी संशोधनाचा दर्जा वाढवावा. (प्रतिनिधी)‘कार्बन क्रेडिट’ राबवाशिवाजी विद्यापीठाचे उपक्रम, पर्यावरणविषयक नवीन प्रयोग चांगले आहेत. यापुढचे पाऊल म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ‘कार्बन क्रेडिट’ ची संकल्पना राबवावी, अशी सूचना मंत्री तावडे यांनी केली. ते म्हणाले, यातंर्गत काही गुण देण्याचे नियोजन करावे. त्यातून पर्यावरण रक्षण विद्यार्थ्यांपर्यंत लवकर पोहोचेल.