शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाच्या ‘जीआर’मध्ये बदलाचा विचार

By admin | Updated: February 19, 2016 01:50 IST

राज्य एका वर्षात टँकरमुक्त होईल; शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांचा आशावाद.

अकोला : जलयुक्त शिवार अभियानाची कामे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या जुन्या शासननिर्णयात (जीआर) बदल करुन नवीन शासन निर्णय जारी करण्याचा शासनाचा विचार आहे. गाव हे घटक धरण्याऐवजी लघू पाणलोट क्षेत्रालाच घटक धरण्यात येईल, असे केल्यास राज्य एका वर्षात टँकरमुक्त होईल आणि राज्यातील नाले, नद्या बारमाही वाहू लागतील, असा दावा खान्देशातील शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी लोकमतशी बोलताना केला.एक वर्षापासून जलयुक्त शिवार अभियानात राज्यात नाल्यांचे खोलीकरण करण्यात येत असून, साखळी व सिमेंट बंधारे बांधण्यात येत आहेत; परंतु सध्याच्या शासन निर्णयानुसार गाव हा घटक धरू न नाला खोलीकरण, बंधार्‍यांची कामे केली जात आहेत. त्यामुळे माथा ते पायथा पाण्याचे संवर्धन होत नसल्याने कामात तांत्रिकदृष्ट्या बदल करावे लागणार आहेत. प्रत्येक नदीच्या पाणलोट क्षेत्रातील प्रत्येक लघू पाणलोट अंतर्गत लहान-मोठय़ा नाल्यांवर ३00 ते ५00 मीटर अंतरावर तांत्रिक अभ्यास करू न छोटे बंधारे बांधणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. लघू पाणलोटाशिवाय जलयुक्त शिवार अभियान यशस्वी होणे अशक्य आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून या विषयावर विचारमंथन केले. या संदर्भातील सर्व तांत्रिक बाजू लक्षात आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवीन शासननिर्णयाचा मसुदा तयार करू न देण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या त्यावर काम सुरू असल्याचे सुरेश खानापूरकर, जलतज्ज्ञ यांनी सांगीतले.