शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

जलयुक्त शिवार अभियानाच्या ‘जीआर’मध्ये बदलाचा विचार

By admin | Updated: February 19, 2016 01:50 IST

राज्य एका वर्षात टँकरमुक्त होईल; शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांचा आशावाद.

अकोला : जलयुक्त शिवार अभियानाची कामे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या जुन्या शासननिर्णयात (जीआर) बदल करुन नवीन शासन निर्णय जारी करण्याचा शासनाचा विचार आहे. गाव हे घटक धरण्याऐवजी लघू पाणलोट क्षेत्रालाच घटक धरण्यात येईल, असे केल्यास राज्य एका वर्षात टँकरमुक्त होईल आणि राज्यातील नाले, नद्या बारमाही वाहू लागतील, असा दावा खान्देशातील शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी लोकमतशी बोलताना केला.एक वर्षापासून जलयुक्त शिवार अभियानात राज्यात नाल्यांचे खोलीकरण करण्यात येत असून, साखळी व सिमेंट बंधारे बांधण्यात येत आहेत; परंतु सध्याच्या शासन निर्णयानुसार गाव हा घटक धरू न नाला खोलीकरण, बंधार्‍यांची कामे केली जात आहेत. त्यामुळे माथा ते पायथा पाण्याचे संवर्धन होत नसल्याने कामात तांत्रिकदृष्ट्या बदल करावे लागणार आहेत. प्रत्येक नदीच्या पाणलोट क्षेत्रातील प्रत्येक लघू पाणलोट अंतर्गत लहान-मोठय़ा नाल्यांवर ३00 ते ५00 मीटर अंतरावर तांत्रिक अभ्यास करू न छोटे बंधारे बांधणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. लघू पाणलोटाशिवाय जलयुक्त शिवार अभियान यशस्वी होणे अशक्य आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून या विषयावर विचारमंथन केले. या संदर्भातील सर्व तांत्रिक बाजू लक्षात आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवीन शासननिर्णयाचा मसुदा तयार करू न देण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या त्यावर काम सुरू असल्याचे सुरेश खानापूरकर, जलतज्ज्ञ यांनी सांगीतले.