शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

इचलकरंजी ‘टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स--राज्यातील पहिलेच शहर

By admin | Updated: December 19, 2014 00:31 IST

’कविता गुप्ता यांची घोषणा : निर्यात वृद्धीसाठी केंद्र सरकारकडून निवड,

इचलकरंजी : केंद्र सरकारने इचलकरंजी शहराची ‘टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स’ म्हणून निवड केली असून, या परिसरातील उद्योजकांनी त्यांची उत्पादने निर्यात करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी सरकार सर्वतोपरी साहाय्य करील, अशी घोषणा केंद्र सरकारच्या अतिरिक्त महासंचालिका कविता गुप्ता यांनी केली. टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स म्हणून निवड झालेले इचलकरंजी हे महाराष्ट्रातील पहिलेच शहर आहे.केंद्र सरकारच्या व्यापार व उद्योग मंत्रालयाच्यावतीने निर्यात बंधू योजनेअंतर्गत झालेल्या उद्योजक-व्यापाऱ्यांच्या बैठकीत कविता गुप्ता बोलत होत्या. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहातील आपल्या प्रमुख भाषणात महासंचालिका गुप्ता म्हणाल्या, निर्यात वृद्धीसाठी आज ही बैठक आयोजित केली आहे. आपली दर्जेदार उत्पादने निर्यात करण्यासाठी उद्योजकांनी एक पाऊल पुढे टाकले तर सरकार दोन पावले पुढे येईल. सूत व कापड उद्योजकांच्या सोयीसाठी सामूहिक सेवा केंद्र उघडल्यास सरकार एक खिडकी योजनेप्रमाणे उद्योजक-व्यापाऱ्यांना सहकार्य करेल. सुरूवातीला इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी स्वागत केले व प्रास्ताविकात येथील वस्त्रोद्योगाच्या प्रगतीचा आढावा घेतला. नजीकच्या वर्षात इचलकरंजीतून प्रती महिना २५ लाख मीटर कापड निर्यात करण्याची ग्वाही कोष्टी यांनी दिली. विदेश व्यापार संचनालयाचे उप महासंचालक आर. सी. कालरा म्हणाले, कपड्याबरोबर चांदीचे दागिने, फौंड्री-इंजिनिअरिंग उद्योगाची उत्पादने सुद्धा येथून निर्यात करण्यासाठी उद्योजक-व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा.माजी मंत्री प्रकाश आवाडे, डी. जी. लोकेश, नीतेश सुरी, रवी कुमार, रत्नाकर बॅँकेचे अमित राज, भारतीय निर्यात ऋण गॅरंटी निगमचे वि. भा. सावर्डेकर, पिडीएक्सएलचे संचालक सुनील पाटील, आदी उपस्थित होते.तीन वर्षांच्या सर्वेक्षणानंतर निवडटाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्ससाठी इचलकरंजीची निवड करताना गेल्या तीन वर्षांचा मागोवा घेण्यात आला. तेथील विविध प्रकारच्या कपड्यांची वार्षिक निर्यात ७५० कोटी रुपयांहून अधिक असल्यामुळेच इचलकरंजीची निवड झाल्याचे महासंचालिका कविता गुप्ता यांनी स्पष्ट केले.