शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

माझी तयारी होती, टाळी उद्धवने टाळली!

By admin | Updated: October 10, 2014 05:56 IST

भाजपाने शिवसेनेबरोबरची युती तोडल्यानंतर एकत्र येण्याकरिता आपण हात पुढे केला होता. मात्र उद्धवनेच टाळाटाळ केली

मुंबई : भाजपाने शिवसेनेबरोबरची युती तोडल्यानंतर एकत्र येण्याकरिता आपण हात पुढे केला होता. मात्र उद्धवनेच टाळाटाळ केली. त्यामुळे नाइलाजाने मनसेने आपले उमेदवार उभे केले, अशी कबुली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. मात्र त्याच वेळी निवडणुकीनंतर शिवसेना-मनसे एकत्र येण्याचे संकेतही त्यांनी दिले. राज ठाकरे यांनी शिवसेना-मनसे हे पक्ष एकत्र येण्याबाबत पडद्याआड झालेल्या ‘त्या’ हालचालींची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, शिवसेनेबरोबरची युती भाजपाने तोडली त्या दिवशीच बाजीराव दांगट हे आपल्याकडे आले व त्यांनी शिवसेना-मनसे यांनी एकत्र येण्याचा आग्रह धरला. त्यानंतर उद्धव यांचा फोन नंबर आपल्याकडे नसल्याने दांगट यांनी ‘मातोश्री’वर जाऊन फोन लावून आमचे बोलणे करून दिले. त्या वेळी भाजपाने युती तोडल्याबद्दल उद्धव यांनी नाराजी प्रकट केली. त्या वेळी आपणच आता काय करायचे, असे उद्धव यांना विचारले व युतीकरिता प्रस्ताव दिला, असे राज यांनी सांगितले. त्या वेळी आमच्यासमोर तीन पर्याय होते. एक निवडणूकपूर्व जागावाटपात समझोता करायचा, निवडणूक प्रचारात परस्परांवर टीका टाळायची आणि निवडणुकीनंतर एकत्र यायचे. जागावाटपातील समझोत्याकरिता मनसेतर्फे बाळा नांदगावकर तर शिवसेनेकडून अनिल देसाई यांच्यात चर्चा व्हावी याकरिता २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रयत्न केले गेले. मात्र शिवसेनेकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस मनसेच्या उमेदवारांना बी फॉर्म दिले.निवडणुकीनंतर तुम्ही दोघे एकत्र येणार का व तुम्ही दोघे एकत्र येण्यात कुणाचा अहंकार आडवा येत आहे, असा सवाल राज यांना केला असता महाराष्ट्राचे हित हे कुणाच्याही अहंकारापेक्षा मोठे आहे. मात्र सध्या आपण केवळ पक्षाच्या विजयाचा विचार करीत आहोत. निवडणुकीनंतर याबाबतचा विचार केला जाऊ शकतो, असे स्पष्ट संकेत राज यांनी दिले. (प्रतिनिधी)