शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

माझी तयारी होती, टाळी उद्धवने टाळली!

By admin | Updated: October 10, 2014 05:56 IST

भाजपाने शिवसेनेबरोबरची युती तोडल्यानंतर एकत्र येण्याकरिता आपण हात पुढे केला होता. मात्र उद्धवनेच टाळाटाळ केली

मुंबई : भाजपाने शिवसेनेबरोबरची युती तोडल्यानंतर एकत्र येण्याकरिता आपण हात पुढे केला होता. मात्र उद्धवनेच टाळाटाळ केली. त्यामुळे नाइलाजाने मनसेने आपले उमेदवार उभे केले, अशी कबुली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. मात्र त्याच वेळी निवडणुकीनंतर शिवसेना-मनसे एकत्र येण्याचे संकेतही त्यांनी दिले. राज ठाकरे यांनी शिवसेना-मनसे हे पक्ष एकत्र येण्याबाबत पडद्याआड झालेल्या ‘त्या’ हालचालींची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, शिवसेनेबरोबरची युती भाजपाने तोडली त्या दिवशीच बाजीराव दांगट हे आपल्याकडे आले व त्यांनी शिवसेना-मनसे यांनी एकत्र येण्याचा आग्रह धरला. त्यानंतर उद्धव यांचा फोन नंबर आपल्याकडे नसल्याने दांगट यांनी ‘मातोश्री’वर जाऊन फोन लावून आमचे बोलणे करून दिले. त्या वेळी भाजपाने युती तोडल्याबद्दल उद्धव यांनी नाराजी प्रकट केली. त्या वेळी आपणच आता काय करायचे, असे उद्धव यांना विचारले व युतीकरिता प्रस्ताव दिला, असे राज यांनी सांगितले. त्या वेळी आमच्यासमोर तीन पर्याय होते. एक निवडणूकपूर्व जागावाटपात समझोता करायचा, निवडणूक प्रचारात परस्परांवर टीका टाळायची आणि निवडणुकीनंतर एकत्र यायचे. जागावाटपातील समझोत्याकरिता मनसेतर्फे बाळा नांदगावकर तर शिवसेनेकडून अनिल देसाई यांच्यात चर्चा व्हावी याकरिता २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रयत्न केले गेले. मात्र शिवसेनेकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस मनसेच्या उमेदवारांना बी फॉर्म दिले.निवडणुकीनंतर तुम्ही दोघे एकत्र येणार का व तुम्ही दोघे एकत्र येण्यात कुणाचा अहंकार आडवा येत आहे, असा सवाल राज यांना केला असता महाराष्ट्राचे हित हे कुणाच्याही अहंकारापेक्षा मोठे आहे. मात्र सध्या आपण केवळ पक्षाच्या विजयाचा विचार करीत आहोत. निवडणुकीनंतर याबाबतचा विचार केला जाऊ शकतो, असे स्पष्ट संकेत राज यांनी दिले. (प्रतिनिधी)