शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

मला शास्त्रज्ञ व्हायचंय...

By admin | Updated: June 12, 2017 02:27 IST

देशातील नामांकित शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘आयआयटी-जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षेत औरंगाबादच्या डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा ओंकार देशपांडे याने

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशातील नामांकित शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘आयआयटी-जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षेत औरंगाबादच्या डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा ओंकार देशपांडे याने देशात आठवा क्रमांक पटकावला. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी ओंकारचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आयआयटीत प्रवेश घेतल्यानंतर संशोधन करून शास्त्रज्ञ व्हायचे, असे या वेळी ओंकारने सांगितले.‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षेचा निकाल रविवारी घोषित करण्यात आला. देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी ओंकार देशपांडे याने देशात ८ वा क्रमांक पटकावला. यानिमित्त ओंकारसह त्याच्या आईवडिलांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी बोलताना ओंकार म्हणाला, नववी-दहावीत असतानाच मी ‘जेईई’च्या बेसिकची तयारी सुरू केली होती. तेव्हाच ‘आयआयटी’त शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी ११वी आणि १२वीमध्ये विशेष प्रयत्न केले. ओंकारचे अभिनंदन करून राजेंद्र दर्डा म्हणाले, देशात पहिल्या दहामध्ये स्थान मिळविणे ही अभिमानाची बाब आहे. बहुतेक विद्यार्थी आयआयटीच्या तयारीसाठी राजस्थानातील कोटाची निवड करतात. मात्र, ओंकारने औरंगाबादेत राहून मिळविलेले यश हे शहरासाठी निश्चित कौतुकास्पद आहे. ओंकारचे वडील डॉ. माणिक देशपांडे, आई डॉ. विशाखा देशपांडे, काका श्याम देशपांडे यांच्यासह ‘लोकमत’चे संपादक चक्रधर दळवी, निवासी संपादक प्रेमदास राठोड, वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला, सहायक उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारे, नगीन संगवी आदी या वेळी उपस्थित होते.सोशल मीडियापासून दूरअकरावी, बारावीच्या वर्षामध्ये स्मार्ट फोनपासून दूर राहणेच पसंत केले. केवळ संभाषणासाठी मोबाइल वापरला. सोशल मीडिया कधी तरी अर्धा-पाऊणतास लॅपटॉपवरपाहिला. घरात टीव्ही तासाभरापेक्षा अधिक पाहिला नाही. चित्रपटसुद्धा एकाच वेळी तीन तास पाहिला नाही, तर रोज अर्धा-अर्धा तास करून पाहिल्याचे त्याने सांगितले. आता आयआयटीत प्रवेश मिळाल्यामुळे स्मार्ट फोन घेणार असल्याचे ओंकार म्हणाला.लहानपणापासूनच गुणवत्ता जोपासलीओंकारचे दहावीपर्यंतचे शिक्षण टेंडर केअर होम शाळेत पूर्ण झाले. दहावीला ९६.६० टक्के गुण मिळविले होते. यानंतर देवगिरी महाविद्यालयात ११वी सायन्सला प्रवेश घेतला. दहावीत असतानाच राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा उत्तीर्ण झालो. ११वीत ‘किशोर वैज्ञानिक’मध्ये देशभरात २४वा क्रमांक पटकावला होता. यानंतर बारावी परीक्षेत ८९.५४ टक्के मिळविले. ‘सीईटी’त १९२ गुण, बिटसॅटमध्ये ४३८ आणि केमिस्ट्री आॅलिम्पियाडमध्ये सेकंड लेव्हलपर्यंत पात्र ठरलो असल्याचे ओेंकारने सांगितले.मुंबई आयआयटीला प्राधान्य देशात आठवा क्रमांक आल्यामुळे कोणत्याही आयआयटीमध्ये प्रवेश मिळणार आहे. मात्र, मुंबई आयआयटीला सर्वाधिक प्राधान्य राहील. यात कॉम्प्युटर इंजिनीअरिंंगला प्रवेश घेऊन संशोधनाकडे वळायचे असल्याचेही ओंकारने सांगितले.असा केला अभ्यास‘आयआयटी’मध्ये जाण्याचा निर्णय नववी-दहावीमध्ये असतानाच केला होता. यासाठी बेसिक तयारी तेव्हापासून सुरू केली. ११वीमध्ये असताना खासगी शिकवणी लावली. वर्गात साडेपाच तास शिकविलेल्या अभ्यासक्रमांचा उर्वरित दिवसांतील ६ ते ७ तासांमध्ये अभ्यास केला. शक्यतो शिकविलेला अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करण्याची सवय लावली होती. अभ्यासानंतर झोपण्याचा नियम कटाक्षाने पाळला. किमान ८ तास झोप घेतली. सकाळी ६ ते ७ वाजता उठण्याची सवय लावल्याचे ओंकारने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळेच हे यश मिळाल्याचे ओंकारने स्पष्ट केले.