शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुझे तो गंगाने बुलाया है!

By admin | Updated: May 10, 2014 00:55 IST

पवित्र नगरीत प्रत्येक माणूस मात्र गल्लीबोळांत गंगेचं राजकारण करताना दिसतो. ‘‘ना मुझे किसीने भेजा है! ना मै यहां आया हूं! मुझे तो गंगाने बुलाया है!’’

गजानन जानभोर

वाराणशी आसक्ती, निवृत्ती आणि मुक्ती या जीवनमृत्यूच्या कळा प्रकट करणार्‍या काशीत पाऊल ठेवणारा सामान्य माणूस गंगेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय परत जात नाही. गंगेबद्दलचा पवित्र भाव आयुष्यभर मनात असतो, पण त्याचं भांडवल तो कधी करीत नाही. या पवित्र नगरीत प्रत्येक माणूस मात्र गल्लीबोळांत गंगेचं राजकारण करताना दिसतो. ‘‘ना मुझे किसीने भेजा है! ना मै यहां आया हूं! मुझे तो गंगाने बुलाया है!’’ असे ‘हरघडी’ सांगणार्‍या नरेंद्र मोदींना यापूर्वी गंगेची हाक कधीच ऐकू आली नाही? दहा वर्षांपूर्वी केंद्रात त्यांचे सरकार होते. पंधरा वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेवर आहेत, काही काळासाठी उत्तरप्रदेशातही सत्तेवर येऊन गेले पण गंगेचे अश्रू त्यांना दिसले नाही. तिच्या आरतीसाठी म्हणे त्यांना परवानगी मिळाली नाही. गंगेच्या घाटावर रोज संध्याकाळच्या आरतीत सहभागी होणारे भक्त कुणाची परवानगी घेऊन येतात? मोदींना त्याची गरज का वाटते? ठाउक नाही! भक्ती आणि राजकारणातील हा मुलभूत फरक असावा कदाचित! केजरीवालांनी वाराणशीत पाऊल ठेवताच गंगेत स्रान केले. माहितीच्या अधिकाराच्या चळवळीतून केजरीवालांनी राजकारणास सुरुवात केली. या कायद्यातंर्गत एक प्रश्न तरी गंगेबाबत सरकारला विचारला का कधी? मोदींना आरतीच्या परवानगीची गरज भासते तशी केजरीवालांना प्रश्न विचारण्यासाठी परवानगी हवी असते का? गंगेच्या काठावर ५८ लोकसभा मतदारसंघ येतात. यात उत्तरप्रदेशचे २४, पश्चिम बंगालमधील २०, बिहारचे ११ आणि उत्तराखंडचे तीन मतदारसंघ. ऐन निवडणुकीच्या काळातच राजकीय पक्षांना तिच्या प्रकृतीची काळजी का वाटते? या प्रश्नाचे उत्तर या ५८ मतदार संघातील राजकारणात दडलेले आहे. यावेळी तर खुद्द देशाच्या पंतप्रधानांचे भवितव्य तिच्यावर अवलंबून आहे, मग उमाळा दाटून येणे स्वाभावाविकच. २७ वर्षांपूर्वी ‘गंगा अ‍ॅक्शन प्लान ’ तयार करण्यात आला. पण गंगा स्वच्छ झाली का? नाही! रामाचे नाव घेऊन गंगाजल वाटणार्‍यांना तीस वर्षांपूर्वी राजकपूर ने ‘....... गंगा मैली हो गई’असा धोक्याचा इशारा दिला पण ओलेत्या कपड्यातील गंगास्रानच तेवढे आपण लक्षात ठेवले. आता २०२० पर्यंत गंगा पूर्णत: स्वच्छ आणि तिच्यासाठी नवीन कायदा तयार करण्यात येईल असे सांगितले जाते. पाच वर्षांपासून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे रखडला आहे. सरकारने नेमकी हीच फाईल बासनात बांधून का ठेवली? या विषयावर संसदेचे कामकाज ठप्प पडल्याचेही कानावर आले नाही.

च्मतांचा प्रवाह दुभंगू नये यासाठी गंगेच्या स्वच्छतेच्या पोकळ चर्चा सुरु आहेत. त्या पुढेही सुरुच राहतील. पुढच्याही निवडणुकीत ती कुणाला तरी बोलावून घेणार आहे. काशीच्या घाटांवर दिसणारी गर्दी मतदानानंतर नेत्यांच्या मागोमाग हळहळू ओसरेल. घरी परतताना प्रत्येक जण सोबत गंगाजल घेऊन जाईल, आपले मन आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी. गंगेचे काय?.. ती मात्र तशीच राहील.