शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
5
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
6
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
7
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
8
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
9
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
10
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
11
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
12
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
13
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
14
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
15
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
16
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
17
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
18
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
19
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
20
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   

मुझे तो गंगाने बुलाया है!

By admin | Updated: May 10, 2014 00:55 IST

पवित्र नगरीत प्रत्येक माणूस मात्र गल्लीबोळांत गंगेचं राजकारण करताना दिसतो. ‘‘ना मुझे किसीने भेजा है! ना मै यहां आया हूं! मुझे तो गंगाने बुलाया है!’’

गजानन जानभोर

वाराणशी आसक्ती, निवृत्ती आणि मुक्ती या जीवनमृत्यूच्या कळा प्रकट करणार्‍या काशीत पाऊल ठेवणारा सामान्य माणूस गंगेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय परत जात नाही. गंगेबद्दलचा पवित्र भाव आयुष्यभर मनात असतो, पण त्याचं भांडवल तो कधी करीत नाही. या पवित्र नगरीत प्रत्येक माणूस मात्र गल्लीबोळांत गंगेचं राजकारण करताना दिसतो. ‘‘ना मुझे किसीने भेजा है! ना मै यहां आया हूं! मुझे तो गंगाने बुलाया है!’’ असे ‘हरघडी’ सांगणार्‍या नरेंद्र मोदींना यापूर्वी गंगेची हाक कधीच ऐकू आली नाही? दहा वर्षांपूर्वी केंद्रात त्यांचे सरकार होते. पंधरा वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेवर आहेत, काही काळासाठी उत्तरप्रदेशातही सत्तेवर येऊन गेले पण गंगेचे अश्रू त्यांना दिसले नाही. तिच्या आरतीसाठी म्हणे त्यांना परवानगी मिळाली नाही. गंगेच्या घाटावर रोज संध्याकाळच्या आरतीत सहभागी होणारे भक्त कुणाची परवानगी घेऊन येतात? मोदींना त्याची गरज का वाटते? ठाउक नाही! भक्ती आणि राजकारणातील हा मुलभूत फरक असावा कदाचित! केजरीवालांनी वाराणशीत पाऊल ठेवताच गंगेत स्रान केले. माहितीच्या अधिकाराच्या चळवळीतून केजरीवालांनी राजकारणास सुरुवात केली. या कायद्यातंर्गत एक प्रश्न तरी गंगेबाबत सरकारला विचारला का कधी? मोदींना आरतीच्या परवानगीची गरज भासते तशी केजरीवालांना प्रश्न विचारण्यासाठी परवानगी हवी असते का? गंगेच्या काठावर ५८ लोकसभा मतदारसंघ येतात. यात उत्तरप्रदेशचे २४, पश्चिम बंगालमधील २०, बिहारचे ११ आणि उत्तराखंडचे तीन मतदारसंघ. ऐन निवडणुकीच्या काळातच राजकीय पक्षांना तिच्या प्रकृतीची काळजी का वाटते? या प्रश्नाचे उत्तर या ५८ मतदार संघातील राजकारणात दडलेले आहे. यावेळी तर खुद्द देशाच्या पंतप्रधानांचे भवितव्य तिच्यावर अवलंबून आहे, मग उमाळा दाटून येणे स्वाभावाविकच. २७ वर्षांपूर्वी ‘गंगा अ‍ॅक्शन प्लान ’ तयार करण्यात आला. पण गंगा स्वच्छ झाली का? नाही! रामाचे नाव घेऊन गंगाजल वाटणार्‍यांना तीस वर्षांपूर्वी राजकपूर ने ‘....... गंगा मैली हो गई’असा धोक्याचा इशारा दिला पण ओलेत्या कपड्यातील गंगास्रानच तेवढे आपण लक्षात ठेवले. आता २०२० पर्यंत गंगा पूर्णत: स्वच्छ आणि तिच्यासाठी नवीन कायदा तयार करण्यात येईल असे सांगितले जाते. पाच वर्षांपासून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे रखडला आहे. सरकारने नेमकी हीच फाईल बासनात बांधून का ठेवली? या विषयावर संसदेचे कामकाज ठप्प पडल्याचेही कानावर आले नाही.

च्मतांचा प्रवाह दुभंगू नये यासाठी गंगेच्या स्वच्छतेच्या पोकळ चर्चा सुरु आहेत. त्या पुढेही सुरुच राहतील. पुढच्याही निवडणुकीत ती कुणाला तरी बोलावून घेणार आहे. काशीच्या घाटांवर दिसणारी गर्दी मतदानानंतर नेत्यांच्या मागोमाग हळहळू ओसरेल. घरी परतताना प्रत्येक जण सोबत गंगाजल घेऊन जाईल, आपले मन आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी. गंगेचे काय?.. ती मात्र तशीच राहील.