शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

काही मिनिटांत झालं होत्याचं नव्हतं

By admin | Updated: July 31, 2014 11:03 IST

माळीण हे एक हसतं खेळतं गाव. गावाला चार वाड्या अणि सुमारे साडेसातशे लोकवस्तीचे गावठाण. बहुतांश आदिवासी समाज. आज सकाळी काही मिनिटांत हे हसतं खेळतं गाव नष्ट झालं.

नातेवाइकांना गावच दिसेना : मारुती मंदिर २५ फूट पुढे सरकलेघोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेले माळीण हे एक हसतं खेळतं गाव. गावाला चार वाड्या अणि सुमारे साडेसातशे लोकवस्तीचे गावठाण. बहुतांश आदिवासी समाज. आज सकाळी काही मिनिटांत हे हसतं खेळतं गाव नष्ट झालं. येथील मुख्य व्यवसाय हा भातशेती. त्याचबरोबर पशुपालन आणि बाजूच्या डोंगरातून हिरडा गोळा करण्याचा जोडधंदा येथील ग्रामस्थ करतात. गावात शिक्षणाचे प्रमाण चांगले असल्यामुळे अनेक जण पुणे, मुंबई, मंचर, घोडेगाव, चाकण परिसरात नोकरीस आहेत. लांबलेल्या पावसामुळे गावातील भातशेती धोक्यात आली होती. ग्रामस्थ पावसाची वाट पाहत होते. गेल्या आठवड्यापासून चांगला पाऊस सुरू झाला. गेल्या दोन दिवसांपासून तर पावसाचा जोर अधिक वाढला. मुसळधार पावसामुळेच डोंगराचा महाकाय कडा कोसळला आणि संपूर्ण गावच होत्याचं नव्हतं झालं. रडायलाही कोणी राहिले नाहीदीडशे ते दोनशे जण मृत्युमुखी पडल्याची भीती; मात्र माळीण गावात आक्रोश नव्हता, कारण रडायला कोणी शिल्लकच राहिले नव्हते. संपूर्ण कुटुंबेच्या कुटुंबेच उद्ध्वस्त झाली. मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली. पुण्या-मुंबईला नोकरीनिमित्त स्थायिक झालेले नातेवाईकच केवळ शिल्लक राहिले आहेत. माळीण गावातील घटनेची माहिती समजल्यावर दुपारनंतर येथील ग्रामस्थांचे नातेवाईक घटनास्थळी येऊ लागले होते. मात्र, त्यांना गावच दिसत नव्हतं. दिसत होता केवळ चिखलाचा मोठा ढीग. एनडीआरएफने सर्व रस्ते बंद केल्याने माळीण गावाजवळ असलेल्या एका शाळेत येथील ग्रामस्थांचे नातेवाईक आक्रोश करीत होते. एखादा मृतदेह सापडला, की आपला कोणी आहे का? असे पाहत होते. ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे एक वृद्ध गृहस्थ आले. सापडलेल्या मृतदेहात आपला जावई आहे का? हे पाहण्यासाठी मदत करा, अशी विनंती केली. त्यांनी मृतदेह पाहिला आणि हंबरडा फोडला. कारण सापडलेल्या मृतदेहात त्यांचा जावई होता. महाकाय कड्याबरोबर आलेल्या प्रचंड चिखलाच्या लोंढ्यामुळे गावातील मारुतीचे मंदिर सुमारे २५ फूट पुढे सरकले गेले. सुमारे २० ते २५ फूट उंची असलेल्या या मंदिराच्या कळसाचा काही भाग केवळ चिखलाखाली गाडला गेलेला दिसत होता. या मारुती मंदिराच्या ढिगाऱ्याखालीच २५ ते ३० मुले दबली गेली असावीत, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या मारुती मंदिरात तरुण मंडळाचे बॅन्जो आदी साहित्य होते. त्यामुळे येथे कायमच तरुणांचा राबता असायचा, असे ग्रामस्थांनी सांगितले. माळीण गावाकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. संपूर्ण तालुक्यातून आलेल्या रुग्णवाहिका, जेसीबी आणि बघ्यांची गर्दी यामुळे कोंडीत भर पडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन कार्यमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आदीवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांचा ताफा साडेपाच वाजण्याच्या सुमारास अडिवरे गावात पोहोचला. वाहतूक कोंडीमुळे त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास अर्धा तास उशीर झाला. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील चारच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. त्यांनाही वाहतूककोंडीमुळे सुमारे चार किलोमीटर पायी जावे लागले. अडिवरे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी जखमींची विचारपूस केली.माळीण गावातील कार्यकर्ते आणि बाजार समितीचे संचालक सावळेराम लेंभे सकाळी नातीला सोडण्यासाठी माळीण फाट्यावर गेले होते. नातीला सोडून घरी येऊन पत्नीसह चिंचेची वाडीकडे शेतात भातलावणीसाठी निघाले असता रस्त्यातच त्यांना दरड कोसळल्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी जाऊन पाहिले असता संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गेले होते. या प्रलयातून ते थोडक्यात बचावले.सकाळी लवकर ही घटना घडली, तसेच पाऊस असल्याने ग्रामस्थांनी जनावरांना गोठ्यातून बाहेरच काढले नव्हते. त्यामुळे दरड कोसळल्यावर सर्व जनावरे जागेवरच ढिगाऱ्याखाली गाडली गेली. जेसीबीच्या साहाय्याने ढिगारे उपसत असताना एक जीपच सापडली. चिखलामध्ये पूर्ण गाडून गेल्यामुळे मदत पथकाला सुरूवातीला ती दिसली नाही. या जीपमध्ये प्रवासी होते की नाही, याबाबत कोणालाही सांगता आले नाही. (वार्ताहर)