शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्यास मी जबाबदार - राजू शेट्टी

By admin | Updated: June 5, 2017 18:21 IST

राज्यातील सरकार निवडून आणण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. सरकारला पाठिंबा दिल्याचा आता पश्चाताप होत आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 5 - राज्यातील सरकार निवडून आणण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे.  सरकारला पाठिंबा दिल्याचा आता पश्चाताप होत आहे. तीन वर्षांत सरकारने शेतकऱ्यांच्या भावाना दुखावल्या आहेत. सरकरमध्य़े आम्ही सहभागी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्यास मीही तेवढाच जबाबदार आहे. त्यामुळे लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करू, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. तसेच सदाभाऊंबाबतचा अंतिम निर्णयही कार्यकारिणीच्या बैठकीत घतला जाईल असेही  ते म्हणाले. 
कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना राजू शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या विरोधात जाल, तर परिणाम वाईट होतील, असा इशारा यावेळी त्यांनी सरकारला दिला आहे.
दरम्यान, शेतकरी संपाचा आज पाचवा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव यासह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. 
दरम्यान काही दिवसांपूर्वीच दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बैठक झाली होती. या बैठकीत महायुतीतील सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. राजू शेट्टीही या बैठकीला उपस्थित होते.