पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या तोटयासंदर्भातील चौकशी अधिकार्यांनी सहकार कायद्याच्या कलम ८३ अन्वये सादर केलेल अहवालात आपल्याला थेटपणे जबाबदार धरलेले नाही असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदनाव्दारे केला आहे. याप्रकरणात शिवसेना, भाजप, शेकाप, मनसेसह सर्वपक्षीय संचालकांची नावे घेतली जात असली तरी अद्याप जबाबदारी निित झालेली नाही. कलम ८८ अन्वये चौकशी पूर्ण झाल्यानंतर जबाबदारी निित करण्यात येईल, त्यानंतर संबंधितांविरूध्द नियमानुसार योग्य कारवाई होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.राज्य सहकारी बँकेच्या तोटयाला तत्कालिन संचालक मंडळ जबाबदार असल्याचा निष्कर्ष चौकशी अधिकार्यांनी काढला आहे. परंतु त्या अहवालामध्ये जबाबदारी निित केलेली नाही, त्यामुळे अकारण सगळयांकडे संशयाने पाहिले जात आहे, त्यामुळे लवकरच जबाबदारी निित केली जावी अशी आपली भुमिका असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.तोटयाची जबाबदारी निित करण्यासाठी कलम ८८ अन्वये अर्धन्यायीक स्वरूपाची चौकशी सुरू करण्यात आली असून या चौकशीचा अहवाल आल्यानंतरच बँकेच्या तोटयास जबाबदार कोण हे स्पष्ट होईल. राज्य शासन देखील याप्रकरणातील खर्या दोषींचा शोध घेण्यासाठी आग्रही असून त्यासाठीच कलम ८३ आणि कलम ८८ अन्वये बँकेच्या व्यवहारांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य बँकेसंदर्भातील काही प्रकरणांची सुनावणी उच्च न्यायालयातही सुरू असल्याने त्यासंदर्भात अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही, परंतु चौकशी अद्याप पूर्ण झाली नसताना, तोटयाची जबाबदारी निित केली नसताना कुणालाही दोषी समजून त्याच्यावर आरोप करणे योग्य ठरणार नाही, असे पवार यांनी पाठविलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे.
राज्य सहकारी बँकप्रकरणी मला थेट जबाबदार धरलेले नाही : अजित पवार
By admin | Updated: May 31, 2014 22:14 IST