शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

मी बाई भाजीवाली, फॉरेनची...

By admin | Updated: March 8, 2016 09:40 IST

‘शेती’ शब्द ऐकला तरी बहुतांश तरुणांच्या कपाळावर आठी येते. नव्या सिंचन पद्धती, नवी पिके आणि निर्यात यांचे सूत्र जमवता आले तर शेतीमधूनही चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते.

ओंकार करंबेळकर,  मुंबई‘शेती’ शब्द ऐकला तरी बहुतांश तरुणांच्या कपाळावर आठी येते. नव्या सिंचन पद्धती, नवी पिके आणि निर्यात यांचे सूत्र जमवता आले तर शेतीमधूनही चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते. हेच गणित जमवले सायली चुरीने आणि ‘निसर्ग अ‍ॅग्रो’ ही कंपनी स्थापन केली. ती परदेशी (एक्झॉटिक) भाज्या आणि फळांचे उत्पादन आणि विक्री करते.सुरुवातीच्या काळात भारतातील हॉटेल्स किंवा मुंबई-गोव्याला येणाऱ्या क्रुझवर परदेशी भाज्यांना मागणी असे. त्यांना युरोपीय दर्जाची भाजी व फळे पुरवणे हे अवघड काम होते. हे आव्हान सायलीने आई-वडीलांच्या मदतीने स्वीकारले आणि पंचतारांकित हॉटेल्समधून त्यांच्या भाज्यांना मागणी वाढू लागली. ही हॉटेल्स रंग, वास, चवी आणि गुणधर्मांच्या नियमांचे पालन केले तरच माल स्वीकारतात. आपले उत्पादन त्या तोडीचे व्हावे यासाठी सायली प्रयत्न करत असते.आजकाल भारतीयांचे परदेशात जाणे वाढले आहे. परदेशातील भाज्यांची, फळांची गुणवत्ता पाहिल्यानंतर त्यांना भारतातही तशाच गुणवत्तेची आणि सेंद्रिय उत्पादने हवी असतात. ही गरज ओळखून सायलीने व्यवसाय वाढीसाठी नवे प्रकल्प हाती घेतले. तर तिचे आई-वडील- मकरंद व अंजली यांनी संशोधनावर लक्ष केंद्रित केले. रंगीबेरंगी सिमला मिरच्या, अस्पॅरॅगस, ड्रॅगन फ्रूट, ब्रोकोली, विविध प्रकारच्या पालेभाज्या, परदेशी टोमॅटो, वांगी अशा भाज्यांना परदेशात पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू झाला. युरोपात माल पाठविण्यासाठी कडक अटी व प्रमाणांचे पालन करावे लागते. त्यात तिला यश मिळाले. गंमत म्हणजे भारतात तयार झालेल्या थायी भाज्यांची गुणवत्ता, त्यांचा रंग, वास थायलंडमधील मूळ भाज्यांपेक्षा चांगला असल्याचे मत इंग्लंडमधील लोकांनी नोंदविले. आता भाज्या आणि फळांचे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) करून त्या अधिक काळ टिकाव्यात यासाठी सायली प्रयत्न करत आहे. मालदिवच्या रुक्ष वालुकामयमृदेत पिके घेण्यासाठी सायलीआणि तिच्या आई-बाबांनी मदत केली आहे. काहीतरी नवे करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध तिने घेतला. त्यांना शेतावर नेऊन प्रशिक्षण दिले. बंगळुरू, कोलकाता, उटी, पणजी, नैनितालची बाजारपेठ या नव्या शेतकऱ्यांना मिळाली. शेतीमध्येही स्टार्ट-अप्स आहेत हे सायलीने सिद्ध केले आहे. पुन्हा शेताकडे चलातरुणांनी शहरात येण्यापेक्षा गावातच शेतीचा विकास करता येतो का ते पाहणे गरजेचे आहे असे सायली सांगते. शेती हा सन्मानाचा व्यवसाय आहे. योग्य उत्पादने आणि पद्धत वापरल्यास शेतीत यश मिळवता येते, यावर तिचा ठाम विश्वास आहे.