शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

दांभिक पुरोगामी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 04:12 IST

राज्यसभेवर अलीकडेच एका छत्रपतींची नियुक्ती झाल्यावर ‘जाणते राजे’ असलेल्या एका नेत्याने आता फडणवीस छत्रपतींची नियुक्ती करू लागले, अशी धूर्त टिप्पणी

पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) : राज्यसभेवर अलीकडेच एका छत्रपतींची नियुक्ती झाल्यावर ‘जाणते राजे’ असलेल्या एका नेत्याने आता फडणवीस छत्रपतींची नियुक्ती करू लागले, अशी धूर्त टिप्पणी करून अस्मितेच्या द्वेषाग्नीवर फुंकर घातली होती, असे सांगत ज्येष्ठ समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांनी उजव्या असहिष्णू प्रवृत्तीपेक्षा असे दांभिक पुरोगामी अधिक धोकादायक असल्याची टीका केली.‘पुरोगामी महाराष्ट्र आणि वाढती असहिष्णुता’ या विषयावर डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडपात संपन्न झालेल्या परिसंवादाचे डॉ. कवठेकर हे अध्यक्ष होते. राकेश वानखेडे यांनीही कवठेकर यांच्या सुरात सूर मिसळत पवार यांनाच लक्ष्य केले. शेतकरी आत्महत्येबाबत ‘जाणते राजे’ मूग गिळून गप्प बसतात आणि जातीय लढ्यात असभ्य वक्तव्ये करून जातीय विद्वेष निर्माण करतात, असे वानखेडे म्हणाले. याच परिसंवादात बोलताना कवयित्री नीरजा यांनी मात्र हिंदुत्ववादी शक्तींच्या असहिष्णुतेला लक्ष्य केले. समानतेवर आधारलेली आपली समाजव्यवस्था धर्मव्यवस्थेवर आधारित करण्याची धडपड सुरू असल्यानेच सध्या पुरोगामी विचारवंत, दलित, महिला यांना लक्ष्य केले जात आहे. विचार पटला नाही, तर खून करण्यापर्यंत मजल मारण्याच्या विकृतीची सुरुवात नथुराम गोडसे याच्यापासून झाली. सध्याचे सरकार आपल्या पाठीशी उभे राहील, याची खात्री वाटत असल्यानेच हिंसाचाराचे झाड बहरले आहे, असे नीरजा म्हणाल्या. प्रा. कवठेकर म्हणाले की, देशातील असहिष्णुता १९९० नंतर वाढू लागली. कारण, त्याच सुमारास मंडल आयोगावरून वाद पेटला आणि बाबरी मशिदीचे पतन झाले. या दोन्ही घटना एकमेकांच्या प्रतिक्रिया होत्या, असा अनेकांचा ग्रह आहे. पवार यांच्या त्या वक्तव्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, जातीची बंधने दूर केली पाहिजेत, असे म्हणणारे जातीयतेला कशी फुंकर घालतात, त्याचे हे उदाहरण आहे. मात्र, विचारवंत याबाबत मौन बाळगतात आणि अप्रत्यक्षपणे असहिष्णुतेला खतपाणी घालतात. उजवे जेवढे असहिष्णू आहेत, तेवढेच डावे असहिष्णू आहेत. उजवे काय भूमिका घेणार, हे तरी माहीत असते. त्यामुळे त्यांचा प्रतिवाद करण्याची तयारी करता येते. परंतु, डाव्यांकडून अपेक्षा एका भूमिकेची असते आणि ते भूमिका वेगळीच घेतात. त्यामुळे असहिष्णू प्रवृत्तीपेक्षा दांभिक पुरोगामी, उदारमतवादी म्हणवणाऱ्यांची सोयीची सहिष्णुता अधिक धोकादायक आहे.कवयित्री नीरजा म्हणाल्या की, सहिष्णुता म्हणजे भारतीयत्व, असे पं. नेहरू यांनी म्हटले होते व विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात असहिष्णुता हा भारताचा स्वभाव नाही, असे स्पष्ट केले आहे. १९९० नंतर देशातील साम्यवादी-समाजवादी गट मागे पडून भांडवलशाही-उजव्या विचारसरणीच्या हातात सत्ता गेल्यानंतर देशातील असहिष्णुता वाढीस लागली आहे. बाबरी ते गोध्रा या घटना त्याचे प्रत्यंतर आहे. उदारीकरणानंतर तर आर्थिक विकास, हाच मुख्य विकास हे जीवनाचे सूत्र बनले आहे. मूल्यविकास आणि समानतेवरील आधारित समाजव्यवस्था मागे पडून धर्मव्यवस्थेवरील समाजव्यवस्थेचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळेच दाभोलकर-पानसरे यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंतांना लक्ष्य केले जात आहे. दलित व स्त्रिया यांच्या संरक्षणाकरिता केलेल्या कायद्यांचा गैरवापर केला जात असल्याची आवई उठवून हे कायदे रद्द करण्याची धडपड सुरू आहे. अशा वातावरणातही छोट्या पुरोगामी चळवळी सुरू असून तोच आशेचा किरण असल्याचे त्यांनी नमूद केले.राकेश वानखेडे म्हणाले की, आपण कधीच सहिष्णू नव्हतो. आपल्या अनेक संतांचे मृत्यू नैसर्गिक नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे व राजाराम महाराज हे असहिष्णुतेचे बळी ठरले. पेशवाईत तर असहिष्णुतेचा कळस झाला होता. (विशेष प्रतिनिधी)अंमलबजावणीचा आढावा घ्या!महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील मंडळींना १९९० नंतर सांसदीय राजकारणाची चटक लागली. राजकारणात त्यांनी अनेक तडजोडी केल्या. पुरोगामी चळवळी थांबल्याने निर्माण झालेली पोकळी सुटाबुटांतील एनजीओंनी भरली. लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेवर आघात झाला. सध्या तर जातीयवादाचे समर्थन करणाऱ्यांना ज्ञानपीठ दिले जात आहे, तर खोटा इतिहास लिहिणाऱ्यांना महाराष्ट्रभूषण देऊन गौरवले जात आहे. प्रा. राजेंद्र दास म्हणाले, जेव्हापासून आपली फक्त कमावण्याची मानसिकता झाली, तेव्हापासून प्रत्येक माणसाला किमतीचा टॅग लावू लागलो. हा माणूस किती उपयोगाचा आहे, हे पाहून संबंध ठेवू लागलो, तेव्हापासून असहिष्णुता बोकाळली. सर्व क्षेत्रांतील सत्ताकारणाकरिता उपद्रवमूल्य असलेली माणसे हाताखाली ठेवू लागलो. पक्षांपेक्षा गटांचे प्राबल्य सर्व प्रकारच्या सत्ताकारणात वाढले. ज्या शालेय शिक्षणात मूल्यशिक्षणाद्वारे संस्कार व्हायला हवे होते, ते न झाल्याचे हे परिणाम आहेत.राकेश वानखेडे म्हणाले, आपण कधीच सहिष्णू नव्हतो. आपल्या अनेक संतांचे मृत्यू नैसर्गिक नाहीत. शिवाजी महाराज, संभाजीराजे व राजाराम महाराज हे असहिष्णुतेचे बळी ठरले. मूल्यविकास आणि समानतेवर आधारित समाजव्यवस्था मागे पडून धर्मव्यवस्थेवरील समाजव्यवस्थेचे महत्त्व वाढले. त्यामुळेच दाभोलकर-पानसरे यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंतांना लक्ष्य केले जात आहे.