शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

आजारपणाला कंटाळून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

By admin | Updated: April 11, 2017 17:56 IST

शहरातील साई रोड परिसरात राहणाऱ्या हरिश्चंद्र संगाप्पा अकनगिरे (७५) यांनी आजारपणाला कंटाळून आपली पत्नी कालिंदाबाई हरिश्चंद्र अकनगिरे (६०) यांचा गळा आवळून खून केला.

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 11 : शहरातील साई रोड परिसरात राहणाऱ्या हरिश्चंद्र संगाप्पा अकनगिरे (७५) यांनी आजारपणाला कंटाळून आपली पत्नी कालिंदाबाई हरिश्चंद्र अकनगिरे (६०) यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी घडली.मूळचे रेणापूरचे असलेले अकनगिरे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून आर्वी येथे वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हरिश्चंद्र आकनगिरे आणि कालिंदाबाई हे दाम्पत्य आजारी होते. या आजारपणामुळे दोघेही त्रस्त होते. पहाटेच्या वेळी मुलगा धर्मपाल हरिश्चंद्र अकनगिरे हे आपल्या पत्नी व मुला-बाळांसह हनुमान जयंतीनिमित्त नजिकच्या मंदिरात पहाटे गुलाल उधळण्याच्या कार्यक्रमाला गेले होते. दरम्यान, इकडे घरी हरिश्चंद्र आणि कालिंदाबाई हे दोघेच होते. यावेळी पत्नी कालिंदाबाई यांचा गळा आवाळून पती हरिश्चंद्र यांनी खून केला. त्यानंतर स्वत: छताच्या कडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा आणि सून घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुलगा धर्मपाल अकनगिरे यांनी आर्वी गावचे दहा वर्षे सरपंच म्हणून काम केले आहे. सध्या ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. या कुटुंबात कुठलाही ताण तणाव अथवा वाद नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा कौटुंबिक वातावरणात हा प्रकार घडल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.रात्रीच गप्पा झाल्या...सोमवारी रात्रीच्या भोजनानंतर मुलगा, सून आणि हरिश्चंद्र व कालिंदाबाई यांच्यामध्ये गप्पा झाल्या. तसा कुठलाही तणाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला नाही. घरात आनंदी वातावरण होते. अशा वातावरणात ही घटना घडल्यामुळे मुलगा धर्मपाललाही धक्का बसला आहे.आजारपणाला कंटाळून केले कृत्य?हरिश्चंद्र आणि कालिंदाबाई हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते. दरम्यान, या आजारपणाला कंटाळून हरिश्चंद्र अकनगिरे यांनी आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला असावा, असा संशय पोलीस आणि कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.