शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

पत्नीच्या आत्महत्येबद्दल पतीला शिक्षा

By admin | Updated: December 13, 2015 01:36 IST

विवाहित शेजारणीशी अनैतिक संबंध ठेवून, तिच्यासोबत राजरोसपणे राहायला लागल्यानंतर, आपल्या लग्नाच्या बायकोचा अनन्वित छळ करून, तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या

मुंबई: विवाहित शेजारणीशी अनैतिक संबंध ठेवून, तिच्यासोबत राजरोसपणे राहायला लागल्यानंतर, आपल्या लग्नाच्या बायकोचा अनन्वित छळ करून, तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील एका पतीला, मुंबई उच्च न्यायालयाने पाच वर्षांचा कारावास ठोठावला आहे.पेण तालुक्यातील जांभुळटेप गावातील काशीबाई या महिलेने १८ वर्षांचा संसार व तीन मुले झाल्यानंतर, २५ जुलै २००० रोजी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह तीन दिवसांनी मिळाला होता. काशीबाईचा भाऊ मनोहर याने केलेल्या फिर्यादीवरून नागोठणे पोलिसांनी काशीबाईचा पती भगवान तुकाराम भोईर, त्याचे जिच्याशी विवाहबाह्य संबंध होते ती भारती उर्फ कुसुम भोईर व दामोदर नथु भोईर अशा तिघांविरुद्ध भादंवि कलम ४९८(अ) (विवाहितेचा छळ करणे) आणि ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) या गुन्ह्यांसाठी खटला भरला होता. रायगड सत्र न्यायालयाने फेब्रुवारी २००२ मध्ये तिन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. या विरुद्ध सरकारने उच्च न्यायालयात केलेले अपील न्या. शालिनी फणसाळकर जोशी यांनी मंजूर केले व आरोपी भगवान भोईरला कलम ४९८ (अ) साठी दोन वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि कलम ३०६ साठी पाच वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. शिक्षा भोगण्यासाठी भगवानने तीन आठवड्यांत पोलिसांकडे हजर व्हायचे आहे. भारती व दामोदर यांना निर्दोष ठरविणारा सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला गेला.शेजारी आणि नात्यात असलेल्या गजानन भोईर (एसटी कंडक्टर) याची पत्नी भारती हिच्याशी विवाहबाह्य संबंध जुळल्यापासून, भगवान याने काशीबाईचा छळ सुरू केला. तो काशीबाईला सोडून भारतीसोबत पेण येथे वेगळा राहू लागला. तिन्ही मुलांनाही तो घेऊन गेला. काशीबाईला तो चरितार्थासाठी एक रुपयाही देत नसे, उलट तिने पिकविलेले शेतही त्याने कापून नेले. भगवान याने काशीबाईला राहत्या घरातूनही निघून जाण्यास फर्मावले. ऐकले नाही, तेव्हा तिच्या घराची वीज तोडली व घराचा दरवाजाही उखडून काढून नेला. नीचपणाची परिसीमा म्हणजे, एक दिवस भगवान याने काशीबाईच्या घरी येऊन तिच्या गुप्तांगात लाकूड घुपसले. रक्तबंबाळ झालेल्या काशीबाईला त्यावेळी चार दिवस नागोठणे येथील आयपीसीएल इस्पितळात दाखल करावे लागले होते.या घटनेनंतर प्रदीर्घ काळ लोटला असला, तरी भगवान याने काशीबाईचा ज्या क्रूरपणे छळ केला ते पाहता, शिक्षेच्या बाबतीत त्याला अजिबात दया दाखविता येणार नाही, असे न्या. फणसाळकर-जोशी यांनी नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)सत्र न्यायालयाचे ताशेरेभारती व भगवान यांच्या अनैतिक संबंधांमुळे भारतीच्या पतीनेही तिच्यापासून घटस्फोट घेतला. काशीबाईचा भाऊ, मावशी व भारतीचा पती यांच्या साक्षींतून भगवानने काशीबाईचा कसा व किती छळ केला, हे नि:संदिग्धपणे सिद्ध होत असूनही, सत्र न्यायालयाने ‘अशा साधारण घटना संसारात घडतच असतात,’असे म्हणून भगवानला निर्दोष सोडले होते. सत्र न्यायालयाचा हा दृष्टिकोन असंवेदनशील व विकृत आहे, असे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले.