शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

होर्डिंग्जचा दंड शेतकऱ्यांसाठी

By admin | Updated: February 19, 2016 03:45 IST

आदेश दिल्यानंतरही बेकायदा होर्डिंग्ज लावून उच्च न्यायालयाचा अवमान करणारे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पराग अळवणी आणि मनसे कार्यकर्ते सचिन गुंजाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना दंड ठोठावत

मुंबई : आदेश दिल्यानंतरही बेकायदा होर्डिंग्ज लावून उच्च न्यायालयाचा अवमान करणारे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पराग अळवणी आणि मनसे कार्यकर्ते सचिन गुंजाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना दंड ठोठावत ही रक्कम शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नाम फाउंडेशनला देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. स्वत:च्या स्टेट्सला शोभेल असा दंड भरावा, अशा कानपिचक्याही न्यायालयाने नेत्यांना दिल्या. बेकायदेशीर होर्डिंग हटवण्यासंदर्भात सातारा येथील सुस्वराज्य फाउंडेशन व अन्य काही जणांनी केलेल्या याचिकांवर न्या. अभय ओक व न्या. सी.व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही गणेशोत्सव, नवरात्रौत्सवाच्या काळात बेकायदेशीर होर्डिंग मुंबईत झळकले. या प्रकाराची दखल घेत उच्च न्यायालयाने शेलार, आमदार अळवणी आणि गुंजाळ यांना अवमान नोटीस बजावली. शेलार यांनी खंडपीठाने बजावलेल्या नोटीसवर समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने उच्च न्यायालयाने या सर्वांना दंड भरण्याची शिक्षा सुनावली. २५ हजार रुपये महापालिकेला द्याआशिष शेलार, पराग अळवणी आणि मनसेचे सचिन गुंजाळ यांना प्रत्येकी २५ हजार रुपये महापालिकेला होर्डिंग काढण्यासाठी आलेला खर्च म्हणून देण्याचा आदेश दिला. मात्र दंडाची रक्कम निश्चित केली नाही. ‘तुम्ही तुमच्या स्टेट्सप्रमाणे दंडाची रक्कम द्या. पक्षाचे नेते आहात. साधा पक्षकार्यकर्ता २० हजार रुपये भरेल. तुम्ही किती दंड भरणार ते सांगा? प्रत्येकाने त्या रकमेतील २५ हजार रुपये महापालिकेला द्यायचे; तर उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या संस्थेला (नाम) द्या,’ असा टोला लगावत खंडपीठाने २६ फेब्रुवारीला शेलार, अळवणी आणि गुंजाळ यांना ‘नाम’ फाउंडेशनच्या नावे डीडी तयार ठेवण्याचे निर्देश दिले. ‘न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यास सहा महिने कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात येते. त्यापेक्षा दंड भरणे, हे चांगले आहे. तुम्ही (पक्ष कार्यकर्ते) होर्डिंग आणि फ्लेक्ससाठी पाच-सात हजार रुपये खर्च करता. त्यामुळे ते पैसे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी द्या. अशा प्रकारे बेकायदेशीररीत्या होर्डिंग लावणाऱ्यांना आमचा स्पष्ट संदेश जाऊ द्या. जेणेकरून कोणीही ही चूक पुन्हा करणार नाही,’ असे खंडपीठाने म्हटले.